1264 अहवाल प्राप्त, 343 पॉझिटीव्ह, 461 डिस्चार्ज, 27 मृत्यू

 

           अकोला,दि.15(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1264 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 921  अहवाल निगेटीव्ह तर 343 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 461  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 27 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 180 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 49735(37776+11782+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 343+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 180= एकूण पॉझिटीव्ह- 523.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 238230 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 235254 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2586 नमुने होते. आजपर्यंत एकूण 238150 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 200374 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

343 पॉझिटिव्ह

           आज  दिवसभरात 343 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 151 महिला व 192 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-26, अकोट-16, बाळापूर-12, तेल्हारा-59, बार्शी टाकळी-54, पातूर-47, अकोला-129. (अकोला ग्रामीण-34, अकोला मनपा क्षेत्र-95)

           दरम्यान काल (दि. 14) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 180 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

 

461 जणांना डिस्चार्ज

           दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 22, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, लोहाणा हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, मुलीचे वसतीगृह अकोट येथील 15, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 461 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

27 जणांचा मृत्यू

           आज दिवसभरात 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कुटसा येथील 80 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पातूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजार ता.अकोट येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 26 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते,  देवारी ता.अकोट येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर हिंगणा ता. बाळापूर येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. उगवा येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. रामदासपेठ येथील 87 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 5 रोजी  दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 53 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, शरीफ नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, वल्लभ नगर येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच उरळ ता. बाळापूर येथील 57 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11रोजी दाखल करण्यात आले होते, धानोरा ता.मुर्तिजापूर येथील 63 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसपूर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, पानज ता.अकोट येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 52 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालय येथे तिघांचे मृत्यू झाले. त्यात मुर्तिजापूर येथील 40 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 85 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6820 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 49735(37776+11782+177) आहे. त्यात 891 मृत झाले आहेत. तर 42024 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6820 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ