स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

 स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार

प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी

१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

 

मुंबईदि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून)तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी२०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक १ जानेवारी२०२५ ते ३१ डिसेंबर२०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.

 

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाट्यमंदिर इमारत्तदुसरा मजलासयानी मार्गप्रभादेवीमुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेशया सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ नियमावली व प्रवेशिकाया शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२५ Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतीलप्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी२०२६ ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.

 

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक /प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाट्यमंदिर इमारतदुसरा मजलासयानी मार्गप्रभादेवीमुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक १ जानेवारी२०२६ ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पाठवावेअसे आवाहन सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

 

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिकाअसा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३० जानेवारी२०२६ हा राहील.

विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी२०२६ ते ३० जानेवारी २०२६) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीतअसे सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमुंबई यांनी कळविले आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा