खराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन
अकोला , दि. 31( जिमाका)- जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यातही ज्या गावांना इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते यांना जोडणारे रस्ते खराब आहेत व ज्यामुळे गावांशी संपर्क , दळण वळणास अडचणी येत आहेत , अशा रस्त्यांची माहिती ग्रामपंचायतींनी पालकमंत्री कार्यालयास कळवावी , असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. त्यासाठी खराब रस्त्याच्या छायाचित्र शक्य झाल्यास व्हिडीओ व एक पत्र पालकमंत्री कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , अकोला येथे पाठवावे , असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याबैठकीत निर्णय घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेणे शक्य होईल , असेही ना.कडू यांनी कळविले आहे. ०००००