पोस्ट्स

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत) मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला हे वसतीगृह समाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत आहे. शैक्षणीक सत्र 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे (गुणवंत) शासकीय वसतिगृह अकोला या वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्ग 11 वी ते 12 वी पर्यंत अकोला या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना टक्केवारी नुसार व शासन निर्णयानुसार वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करावयाचा कालावधी वर्ग 10 वी नंतरच्या अभयासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2026 पर्यंत आहे. http://hmas.mahait.org . वेबसाईट वर भरण्यात यावे. वसतीगृहामध्ये खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत सोयी सुवीधा पुरविण्यात येतात 1) राहण्याची व्यवस्था, 2) नास्ता व भोजनाची तसेच 3) स्टेशनरी भत्ता 4) गणवेश भत्ता (5) मासीक निर्वाह भ...

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेबाबत.

  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेबाबत. अकोला, दि. 25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचेमार्फत सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाकरीता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 14 डिसेंबर 2022 नुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे. सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 10 जुलै 2026 पर्यंत राहील. याची जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीस्तव वर नमुद शासन निर्णय चे अवलोकन करावे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळविले आहे.

विकसित भारत-जी राम जी अधिनियम : ग्रामीण रोजगारनिर्मिती; स्थलांतर कमी होणार

  विकसित भारत-जी राम जी अधिनियम : ग्रामीण रोजगारनिर्मिती; स्थलांतर कमी होणार अकोला, दि. 25 : भारत सरकारने ग्रामीण भारताच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत "विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात विकसित भारत-जी राम जी अधिनियम 2025 (VB G RAMG) हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात 1 जुलै 2026 पासून लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. ग्रामीण विकासाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, 'विकसित भारत 2047' या राष्ट्रीय संकल्पनेवर पूरक अशी आधुनिक, सर्वसमावेशक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि उत्पादकता-केंद्रित ग्रामीण विकास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. दिनांक 30 जून 2026 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 हा बंद होणार असून नवीन कायद्यांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षामध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. या वाढीव रोजगार हमीमुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास, उपजीविकेची सुरक्षितता मजबूत...

जिल्ह्यात 1 लाख 15 हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार

 28 जून रोजी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम; अकोला जिल्ह्यात 1 लाख 15 हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार  दि. 25  राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, 28 जून 2026 रोजी अकोला जिल्ह्यात व्यापक पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय  नावंदर आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशील कुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात येणार* असून, जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 438 बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 87 हजार 174 तर शहरी भागातील 28 हजार 244 बालकांचा समावेश आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात *तीन सदस्यीय 581 बूथ पथके तसेच दोन सदस्यीय 602 गुच्छ पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय 72 ट्रान्झिट, 83 मोबाईल आणि 63 विशेष पथके कार्यरत राहणार असून, लस...

ऐतिहासिक निर्णय : महाराष्ट्र की सबसे बड़ी किसान ऋणमुक्ति योजना

ऐतिहासिक निर्णय : महाराष्ट्र की सबसे बड़ी किसान ऋणमुक्ति योजना किसान राज्य की ग्रामीण अर्थव्यवस्था की रीढ़ हैं। अनियमित वर्षा , ओलावृष्टि , सूखा , अतिवृष्टि तथा बाढ़ जैसी प्राकृतिक आपदाओं के कारण आर्थिक संकट में फंसे किसानों को राहत प्रदान करने तथा उन्हें पुनः फसल ऋण उपलब्ध कराकर कृषि क्षेत्र को अधिक सशक्त बनाने के उद्देश्य से महाराष्ट्र सरकार ने राज्य के इतिहास की सबसे बड़ी ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर किसान ऋणमुक्ति योजना- 2026' लागू करने का ऐतिहासिक निर्णय लिया है। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर एक कुशल प्रशासक तथा प्रजाहित को समर्पित लोककल्याणकारी शासक थीं। कृषि , सिंचाई , जल संरक्षण और ग्रामीण अर्थव्यवस्था को सुदृढ़ बनाने में उनके योगदान को आज भी आदर्श माना जाता है। किसानों की समस्याओं को समझकर उन्हें न्याय दिलाने का उनका दृष्टिकोण अनुकरणीय था। उनकी 300 वीं जयंती वर्ष के अवसर पर किसानों के कल्याण से जुड़ी इस महत्त्वपूर्ण योजना को उनके नाम से समर्पित कर राज्य सरकार ने उनके कार्यों को श्रद्धांजलि अर्पित की है। राज्य सरकार इससे पहले भी किसानों के ऋणभार को कम करने के लिए छत्र...

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

  महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय   शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस , गारपीट , दुष्काळ , अतिवृष् टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक , रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती , सिंचन , जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.   शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी कर...

महा-एआय मॉडेलद्वारे डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  महा-एआय मॉडेलद्वारे डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने  शासनाचे महत्त्वाचे पाऊल -           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •           महासारथी , महाडीबीटी २.० , डिजिटल हयातीचा दाखला आणि राज्याच्या महा एआय मॉडेलचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण   मुंबई , दि. २४ : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या नवीन उपक्रमांमुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने , सुलभतेने आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधानभवन येथे महासारथी , महाडीबीटी २.० , सेवा केंद्रांचे मानकीकरण , डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि राज्याच्या एआय मॉडेलच्या लोकार्पणप्रसंगी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार , माहिती इलेक्ट्रॉनिक...

पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' सुशिक्षित युवक- युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी

    पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' सुशिक्षित युवक- युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी अकोला, दि. 24 : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात   येत्या २९ जुन, २०२६ रोजी सकाळी १० वा. 'पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्हयातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्या मधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र करते. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता प्रिसीजन मॅपिग जिआयएस प्रा. लि. अमरावती, धुत ट्रान्समिशन लि. छत्रपती संभाजीनगर, अश्पा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि, नागपूर, क्वेस कॉर्प लिमिटेड, पुणे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक, नागपूर ...

केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूसकांती) कापूस पीक प्रात्यक्षिकात लागवड अंतराचे काटेकोर पालन करावे अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन

    केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान   ( कापूसकांती) कापूस पी क प्रात्यक्षिका त लागवड अंतराचे काटेकोर पालन क रावे अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन                 अकोला, दि. २४ : केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान ( कापूस कांती) सन २०२६-२७ अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी कापूस पी क प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी ,   कृ षी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांच्यामार्फत राबविण्या साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या   शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी , कृ षी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर निवड झाली आहे. या शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी /   कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी पेरणी करतांना लागवड अंतराचे काटेकोर पालन करा वे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.   पी क प्रात्यक्षिके : क्लोजर स्पे...

जिल्ह्यात पावसाची शक्यता

    जिल्ह्यात पावसाची शक्यता   अकोला, दि. 24 : जिल्ह्यात दि. 24 जून ते 28 जूनपर्यंत काही ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. वीज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000