पोस्ट्स

पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविले

      पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविले अकोला, दि. ३ : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असलेल्या पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कारांसाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.   हे पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय, उत्कृष्ट व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतात. कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग तसेच इतर विविध क्षेत्रांतील असामान्य योगदानाची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात.   अकोला जिल्ह्यातील पात्र व्यक्ती, संस्था तसेच नागरिकांनी योग्य उमेदवारांची नामांकने विहित नमुन्यात सादर करावीत. पद्म पुरस्कारांसाठीची नामांकने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल   https://awards.gov.in   वर ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे.   इच्छुकांनी आपली नामांकने दि. १५ जूनपर्यंत पोर्टलवर सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे. ०००

मराठा आरक्षण संदर्भात कक्ष स्थापन करणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील • जलसंपदा मंत्री कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरू • न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ

  मराठा आरक्षण संदर्भात कक्ष स्थापन करणार                                           - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील •        जलसंपदा मंत्री कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरू •        न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ               मुंबई , दि. 3 : मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणे , कुणबी जात प्रमाणपत्र , जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे ; तसेच प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातील कार्यालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साध...

कृषी विभागाची धडक कारवाई, ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, ३ निलंबित

  खरीप हंगामात बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची विक्री करताना कोणत्याही प्रकारचा काळाबाजार, साठेबाजी किंवा बळजबरीने उत्पादनांची लिंकिंग (एका वस्तूसोबत दुसरी वस्तू घेण्याची सक्ती) खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्या केंद्रांवर अनियमितता आढळली, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळातही ही तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. — जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे     कृषी विभागाची धडक कारवाई, ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, ३ निलंबित अकोला , दि. ३ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कृषि निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी मोठी कार्यवाही केली असून तपासणी आणि सुनावणीअंती ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ३ केंद्रांचे परवाने १ ते २ महिन्याकरिता निलंबित करण्यात आले आहेत. तर इतर ६ केंद्रांना त्...

दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

  अकोला, दि. 3 : सन २०२६-२७ मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार - २०२६ करीता ऑनलाईन अर्ज / नामांकन मागविण्यात आले आहेत. सदर प्रस्ताव दि.३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज / नामांकन स्विकारण्यासाठी खुले करण्यात आले असून सर्व अर्ज / नामांकन हे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच www.awards.gov.in , Rashtriya Puraskar Portal किंवा Department of  Empowerment of Person with Disabilities (DEPWD) या पोर्टलवर सादर करावयाचे आहेत. सदर पुरस्कारासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते, कर्मचारी, व्यक्ती किंवा संबंधीत घटकांनी निर्धारित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. अर्जामध्ये उल्लेखनिय व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती नमुद करणे आवश्यक आहे, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तुषार जाधव यांनी केले.

शासकीय निवासी शाळा गोरेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 3: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव खुर्द (ता. व जि. अकोला) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ग ६ वीमध्ये नवीन प्रवेश तसेच वर्ग ७ वी ते १० वी मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश सामाजिक आरक्षणानुसार करण्यात येणार असून त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थिनींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातींसाठी १० टक्के, विजाभज प्रवर्गासाठी ५ टक्के, दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के आणि एसबीसी प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण राखीव आहे. प्रवेशास इच्छुक पालक व विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पावसाची शक्यता पाऊस *हवामान केंद्राची अटकळ*

अकोला, दि. 2 : जिल्ह्यात दि. 2 जून ते 5 जूनपर्यंत काही ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक - ॲड आकाश फुंडकर

इमेज
  कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक  - ॲड आकाश फुंडकर मुंबई, दि. २: राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना  करण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)  संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात, किरण मोघे आदी उपस्थित होते. यावेळी विविध उद्योग क्षेत्रांतील असंघटित कामगारांच्या प्रश्नांचे पुनरावलोकन, किमान वेतन सल्लागार मंडळाची स्थापना,  कंत्राटी कामगारांचे प्रश्न, समान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, विविध उद्योगांसाठी किमान वेतन निश्चिती, सफाई तसेच घरकामगारांसाठी स्वतंत्र धोरण, तसेच अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.   यावेळी अॅड. फुंडकर यांनी शासन कामगार कल्याणास...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती साडेतीन हजार किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी

  मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती साडेतीन हजार किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्गांच्या दर्जोन्नतीची कामे करण्यात येणार आहेत. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार निश्चित होणाऱ्या खर्चाच्या अधीन राहून सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील. एआयआयबीकडून कडून प्राप्त होणा...

गांधीग्राम येथे पूर्णा घाटाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

इमेज
  गांधीग्राम येथे पूर्णा घाटाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी अकोला, दि. २ : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील घाटाची   आवश्यक दुरूस्ती, तसेच स्वच्छताकामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. ऑगस्ट महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या कावड उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी गांधीग्राम येथील कावड घाट परिसराची पाहणी केली. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राजेश भारती, पप्पू मोरवाल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कावड उत्सवानिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर पुरेशी वीज व्यवस्था, स्वच्छता करावी. घाटावरील तुटलेले हौद त्वरित दुरुस्त करावे. भाविकांना पूर्णेचे पाणी कावडीत सुरक्षितपणे घेण्यासाठी पुरेशा खोलीपर्यंत पायऱ्या असाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प व्यवस्था करावी. ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. घाट परिसरात वाहनतळ व इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे न...

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा घरपोच

इमेज
    हेल्पलाइन १९६२ व चॅटबॉट द्वारे पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण   अकोला, दि. २ : गेल्या पाच वर्षांत , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड , इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. ' मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स ' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून , यामुळे पशुधनाची वेळेवर , सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे. या उपक्रमाच्या यशानंतर , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ' व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा ' सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे , संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्का...