पोस्ट्स

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

  नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन अकोला, दि. 14 : नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.   पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  करण्यात आले आहे. ०००

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

  नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन अकोला, दि. 14 : नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.   पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन   करण्यात आले आहे. ०००

टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

    टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा   अकोला, दि. 13 : टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत 9 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक रामी रेड्डी यांनी केले आहे.   ही स्पर्धा दि. 8 मार्चला होईल. शालेय स्तरावरही स्पर्धेचे 7 मार्चला आयोजन केले जाणार आहे.  इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत पत्र लिहीता येईल. कमाल शब्दमर्यादा ८०० आहे.  इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत प्रवर अधिक्षक विभागीय टपाल कार्यालय, अकोला या कार्यालयास जमा करावे. सर्कल स्तरावर 25 हजार, 10 हजार व 5 हजार रू. आणि प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. राष्ट्रीय स्तर 50, 25 व 10 हजार रू. अशी पहिली तीन बक्षीसे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण होण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ००  

श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम

    श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष   नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम अकोला ,   दि. १३ :    ‘ हिंद दी चादर ’   श्री गुरु तेग बहादुर सहिब जी यांच्या 350 वी शहिदी   समागम शताब्दी   महोत्सवानिमित्त नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजिण्यात आला आहे.  त्यानिमित्त शासनातर्फे विविध जिल्ह्यात अनेक उपक्रम घेण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नागपूर व नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडले असून ,   आता खारघर येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.  श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी   समागम शताब्दी   वर्षानिमित्त गौरवशाली इतिहास सर्वाना माहित व्हावा , त्यांचे अतुलनीय शौर्य, कार्य व    बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता महोत्सव घेण्यात येत आहे.  श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे धार्मिक स्व...

श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन

    श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन अकोला, दि. 13 : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी अकोला येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने त्यांच्या अतुलनीय शौर्यावर व कर्तृत्वावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.   दि. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग होणार असून, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे   दोन्ही कार्यक्रम जुन्या शहरातील गोडबोले प्लॉटमध्ये शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृह येथे सायं. 5 ते रा. 9 या वेळेत होणार आहेत. या मंगलप्रसंगी अधिकाधिक अकोलेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्...

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथन गुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

  नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथन गुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन अकोला, दि.   13 : नरनाळा निसर्ग महोत्सवात गुंतवणूकदारांची परिषद (इन्व्हेस्टर्स मीट) दि. 17 फेब्रुवारी रोजी दु. 2 वा. मेळघाट टायगर रिट्रीट, शहानूर येथे आयोजित करण्यात आली असून, पर्यटन विकासाच्या शक्यता, संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे.   जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   जिल्हा प्रशासन आणि अकोट वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या सहकार्याने नरनाळा महोत्सवाचे आयोजन दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. मेळघाटचे वनवैभव व ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता व नानाविध संधी आहेत. त्याबाबत परिषदेद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या परिषदेत गुंतवणूकदारांना हेरिटेज टुरिझम, इको-टुरिझम,   साहसी पर्यटन, हॉस्पिटॅलिटी. पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळ विकास, व्यवसाय सुलभता, संबंधित योजना याबाबत जाणून घेता येणार आहे.   तरी अधिकाधिक गुंतवणू...

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 🌳 जिल्ह्यांतील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद

  नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून   निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल   🌳  जिल्ह्यांतील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद अकोला, दि. 13 : जिल्ह्याचे भूषण असलेला मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला, समृद्ध वनसंपदा आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव येत्या दि. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान उत्साहात साजरा होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर महोत्सव होत असल्यामुळे जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत.   जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग, अकोट वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने निसर्गप्रेमींसाठी नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या सहकार्याने नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, स्थानिक संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझमबाबत जनजागृती करण्याचा हेतू अ...

अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’

 अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’ अकोला, दि. 12 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांचे सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच समूहांच्या आर्थिक जीवनमानात वाढ करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 20 फेब्रुवारी ते दि. 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत लाल बहादुर शास्त्री स्टेडियम, सुंदराबाई खंडेलवाल टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे भरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनासोबतच विभागीय व मिनी सरस प्रदर्शनांचाही समावेश असून या माध्यमातून महिला उद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे, असे आवाहन उमेदचे जिल्हा अभियान संचालक यांनी केले आहे.

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून

इमेज
    नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल   जिल्ह्यांतील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद अकोला, दि. 12 : जिल्ह्याचे भूषण असलेला मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला, समृद्ध वनसंपदा आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव येत्या दि. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान उत्साहात साजरा होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर महोत्सव होत असल्यामुळे जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत.   जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग, अकोट वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने निसर्गप्रेमींसाठी नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या सहकार्याने नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, स्थानिक संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझमबाबत जनजागृती करण्याचा हेतू असून, स...

गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता

इमेज
गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता   भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत ,  गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अग्रणी संत नामदेव महाराज (इ.स. १२७० – १३५०) आणि शीख धर्माचे नववे गुरु ,  श्री गुरु तेग बहादुर साहिब (इ.स. १६२१ – १६७५) हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले. या दोघांमध्ये सुमारे तीन शतकांचे कालांतर असले ,  तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यास मूलभूत विचारधारेत लक्षणीय समानता आढळून येते. ही समानता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला  “ हिंद दी चादर ”   हा विशेष उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.   हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. नागपूर आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विभाग ,  राज्यस्तरीय समन्वय समिती आणि शीख सिकलीगर ,  बंजार ,  लबाना ,  मोहयाल ,   सिंधी ,  वाल्मिकी ,  उदासीन व भगत नामदेव सं...