पोस्ट्स

स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक

    स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक अकोला, दि. 9 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे बंधनकारक असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी स्पष्ट केले. शासकीय वसतिगृह सुविधेची जागेची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासुन वंचित राहतात. त्यामुळे मागावर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली.   योजनेत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत्ः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार ...

केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. ९ : अकोला येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे मंजुरी व अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे. तेथील प्रवेशप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   केंद्रिय विद्यालयाच्या इमारत, प्रवेशप्रक्रिया आदी व्यवस्थेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक आज झाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, साबांवि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार आदी अधिकारी उपस्थित होते. यंदा प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळेसाठी हरिहरपेठेतील जि. प. शाळेची जागा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असून, तिथे लवकरच शाळा सुरू होणार आहे. शाळेची प्रव...

विशेष लेख राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण

  विशेष लेख     राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण   शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरता दिलासा देणे पुरेसे नसून शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, उत्पादनक्षम बनेल आणि भविष्यात कर्जाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही, अशी दीर्घकालीन व्यवस्था उभी करणे आवश्यक ठरते.   याच व्यापक दृष्टिकोनातून राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिली जात आहे.   कर्जमुक्तीचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा असला, तरी त्यामागील व्याप...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा अकोला, दि. ७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केल्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.   राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना   2026   जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2017   मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत ,   तर   2019   मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. यावेळीही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येत आहे. अल्पमुदतीची थकीत पीककर्जे ,   तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. योजनेचे वैशिष्ट्ये असे की, पूर्वी दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता ,   म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे दोन लाख दहा हजार कर्ज असेल तर तो शेतकरी   अपात्र ठरत होता. आता मात्र अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हि...

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग.  8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.  शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी वि...

वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

  वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य                                                                     – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक   मुंबई , दि. ७ : राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील प्रभू यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की ...

‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा

    ‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा अकोला, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पातून आज दिवसभरात नदीपात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळेनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दि. ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता जलाशय पातळी ४४९.४८ मी., उपयुक्त पाणी साठा   २४.८१ द.ल.घ.मी. व टक्केवारी ७०.१५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.   ०००

मतदार नोंदणीच्या कामात कसूर खपवून घेणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा विनापरवानगी रजा विनावेतन करणार

        मतदार नोंदणीच्या कामात कसूर खपवून घेणार नाही   जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा विनापरवानगी रजा विनावेतन करणार अकोला, दि. ६ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या विशेष मतदार नोंदणीचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम राबविला जात आहे. हे काम विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर रजेवर गेल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व क्षेत्रीय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे २९ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला रजा घेता येणार नाही आणि मुख्यालयही सोडता येणार नाही.   हा आदेश डावलून जर कोणी अधिकारी परस्पर रजेवर गेला, तर त्याची ती रजा 'विनावेतन' केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कडक शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल ज्य...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026  नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन अकोला, दि. ६ : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026" साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत.  देशातील विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बालकांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील भारतीय बालके पात्र आहेत. साहस, समाजसेवा, पर्यावरण संरक्षण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी बालक स्वतः, पालक, संस्था किंवा इतर व्यक्ती नामांकन सादर करू शकतात. सर्व अर्ज केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. इच्छुक बालके, पालक, शैक्षणिक संस्था तसेच संबंधितांनी अधिक माहितीसाठी "awards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व पात्र बालकांचे नामांकन ...

शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश सुरू

  शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश सुरू अकोला, दि. 6 : येथील मलकापूर परिसरातील शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.   संस्थेत इयत्ता पहिली ते सातवीदरम्यान मुलांना प्रवेश मिळेल. वयोमर्यादा ६ ते १६ वर्षे. विद्यार्थी कर्णबधीर असावा. जिल्हा शल्यचिकित्सकाचे  ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. संस्थेत प्रवेश विनामूल्य असून, निवास, भोजन, अंथरूण-पांघरूण, शालेय साहित्य व इतर आवश्यक सुविधा विनामूल्य मिळतील. गरजूंनी दि. ३१ जुलैपूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे किंवा शासकीय मूकबधीर विद्यालय, महसूल वसाहत, सिद्धेश्वर देऊळ परिसर, मलकापूर, अकोला येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क : 9028395441 किंवा 9850779260. 000 --