पोस्ट्स

८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

  ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण   मुंबई ,  दि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९ , ७५ , २९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन ,  मुंबई येथे  ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी ’  योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ,  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ,  उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत ,  शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ,  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल ,  कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून ,  अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी ,  अकोला ₹३६.७६ कोट...

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजना

  संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजना अकोला, दि. २५: ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजनांचा समावेश असून, कामे वेळेत पूर्ण व्हावीत. कुठेही टंचाई उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च, तसेच एप्रिल ते जून दरम्यान सर्व कामे मिळून २६२ गावांसाठी ३१४ विविध उपाययोजना व त्यासाठी चार कोटी २७ लक्ष ४० हजार रू. च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान १२ गावांसाठी १५ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला.   आराखड्यात अकोला तालुक्यातील १६, बार्शीटाकळी तालुक्यातील ६७, बाळापूर तालुक्यातील २३, पातूर तालुक्यातील ५६, मूर्तिजापूर तालुक्यातील ३९, अकोट तालुक्यातील ३३ व तेल्हारा तालुक्यातील २८ अशा एकूण २६२ गावांचा समावेश आहे. विहिर अधिग्रहणाची १२७, विहीर खोलीकरण, गाळ काढणे ९, नळयोजना विशेष ...

कोषागारे ३१ मार्चला सुरू राहतील

  कोषागारे ३१ मार्चला सुरू राहतील अकोला, दि. २५ : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सार्वजनिक सुट्टी असली तरीही भारतीय स्टेट बँक, कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालये मंगळवारी (३१ मार्च) सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. आर्थिक वर्षातील ३१ मार्च हा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी महावीरजयंतीची सार्वजनिक सुट्टी आहे. मार्चअखेरीस शासनाचा निधी अखर्चित राहू नये व शासनाच्या जमा-खर्चाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व त्याचरोजी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँक, कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती मीना दिले आहेत. ०००

सामाजिक न्याय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

इमेज
   सामाजिक न्याय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ अकोला, दि. २५: जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या सहकार्याने सामाजिक न्याय योजनांचे प्रदर्शनाचा शुभारंभ येथील उपविभागीय कार्यालय (तहसील) येथे आज झाला. शासनाकडून अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी गोपाळ वाघमारे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी यावेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची नागरिकांना थेट माहिती व मार्गदर्शन मिळत असल्याने प्रदर्शन उपयुक्त आहे. अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले. सामाजिक न्याय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांसाठी माहितीपूर्ण प्रदर्शन आहे, असे प्रतिपादन श्री. वाघमारे यांनी केले. श्री. पवार यांनी...

निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २८२ ग्रा. पं. क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग मिळविण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने निक्षयमित्रांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. क्षयरोगमुक्त भारत अभियान-१०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ, विनोद करंजीकर, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे डॉ. सम्यक खैरे यांच्यासह मान्यवर निक्षयमित्र उपस्थित होते. जिल्ह्यात निक्षयमित्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. क्षयरोगमुक्त भारत अभियानात निक्षय...

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी  राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई. दि. 24 : महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली  खारघर, नवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण २,५०७ टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडी) उपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत ३२२६ बालकांवर श्री सत्य साई संजीवनी...

जागतिक क्षयरोग दिन : जनजागृतीतून क्षयरोगावर नियंत्रणाची दिशा

 *जागतिक क्षयरोग दिन : जनजागृतीतून क्षयरोगावर नियंत्रणाची दिशा* दरवर्षी २४ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर *जागतिक क्षयरोग दिन* म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये क्षयरोग (टीबी) या गंभीर संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्नांना गती देणे. २४ मार्च १८८२ रोजी जर्मन शास्त्रज्ञ Robert Koch यांनी क्षयरोगाचे जिवाणू Mycobacterium tuberculosis शोधून काढले, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सन २०२६ साठी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे – “Yes, We Can End TB: Leadership Powered” (होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो – नेतृत्व समर्थित). या घोषवाक्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध माध्यमांतून जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. क्षयरोगाचा इतिहास आणि उपचारातील प्रगती क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत: * १९२१ मध्ये BCG Vaccine ही पहिली लस विकसित करण्यात आली. * १९४०-५० च्या दशकात Streptomycin आणि Isoniazid यांसारख्या प्रतिजैविकांचा शोध लागला, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी झाले. क्षयरोग...

ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

इमेज
      ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा     अकोला, दि. २३ : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येकाला ग्राहक म्हणून सुरक्षेचा,माहितीचा,म्हणणे मांडण्याचा,निवड करण्याचा अधिकार आहे. ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी सजगता महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्राहकांचे हक्क राखून व्यवहारातील विश्वासार्हता टिकवणे, वृद्धिंगत करणे ही सशक्त समाजाची ओळख असते. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. कुलकर्णी ...

‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण

इमेज
  ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण नियोजनभवनात सामूहिक गायन; शहिदांना अभिवादन अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन झाले. थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड , मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार उपस्थित होते. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले. आजही व सदैव हे गीत युवकांसाठी स्फूर्तीदायी आहे, अशी भावना विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. ०००

वेध जनगणनेचे : विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  वेध जनगणनेचे : विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ  आज नियोजनभवनात झाला. जनगणना कक्षाचा शुभारंभही यावेळी झाला. विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक जनगणना महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने अचूक नोंदी घेणे आवश्यक आहे. संकलनातून कोणतीही माहिती सुटता कामा नये, तसेच कुठल्याही नोंदीची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी केले. प्रशिक्षणातून जनगणना प्रक्रियेची प्रत्येक तरतूद समजून घेऊन त्यानुसार परिपूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,सहायक संचालक (जनगणना) प्रवीण भगत, ऋषीकेश पाठारे, जिल्हा  प्रश...