पोस्ट्स

अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’

 अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’ अकोला, दि. 12 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांचे सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच समूहांच्या आर्थिक जीवनमानात वाढ करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 20 फेब्रुवारी ते दि. 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत लाल बहादुर शास्त्री स्टेडियम, सुंदराबाई खंडेलवाल टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे भरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनासोबतच विभागीय व मिनी सरस प्रदर्शनांचाही समावेश असून या माध्यमातून महिला उद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे, असे आवाहन उमेदचे जिल्हा अभियान संचालक यांनी केले आहे.

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून

इमेज
    नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल   जिल्ह्यांतील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद अकोला, दि. 12 : जिल्ह्याचे भूषण असलेला मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला, समृद्ध वनसंपदा आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव येत्या दि. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान उत्साहात साजरा होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर महोत्सव होत असल्यामुळे जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत.   जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग, अकोट वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने निसर्गप्रेमींसाठी नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या सहकार्याने नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, स्थानिक संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझमबाबत जनजागृती करण्याचा हेतू असून, स...

गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता

इमेज
गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता   भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत ,  गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अग्रणी संत नामदेव महाराज (इ.स. १२७० – १३५०) आणि शीख धर्माचे नववे गुरु ,  श्री गुरु तेग बहादुर साहिब (इ.स. १६२१ – १६७५) हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले. या दोघांमध्ये सुमारे तीन शतकांचे कालांतर असले ,  तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यास मूलभूत विचारधारेत लक्षणीय समानता आढळून येते. ही समानता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला  “ हिंद दी चादर ”   हा विशेष उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.   हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. नागपूर आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विभाग ,  राज्यस्तरीय समन्वय समिती आणि शीख सिकलीगर ,  बंजार ,  लबाना ,  मोहयाल ,   सिंधी ,  वाल्मिकी ,  उदासीन व भगत नामदेव सं...

महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके

    महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा   रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके अकोला, दि. 11 : जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरूवात झाली असून, दि. 5 मार्चपर्यंत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी आपले सरकार या पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाईन नोंदणीचा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके यांनी केले आहे.          राज्यात तुती लागवड करून शेतकरी रेशीम कोष निर्मितीपासून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असल्याने या उद्योगात दरवर्षी वाढ होत आहे. तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन करून एक एकर क्षेत्रात दुसऱ्या वर्षी पासून दोन लक्षपेक्षा जास्त उत्पन्न महाराष्ट्रातील शेतकरी मिळवत आहेत. मोठ्या प्रमाणात रेशीम कोष उत्पादन होत असल्याने त्यासाठी महाराष्ट्रातील जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती नागपूर या जिल्ह्य...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवाद सातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम प्रत्येक अडचण सोडवून अनेक योजनांचा लाभ मिळवून देणार जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवाद सातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम प्रत्येक अडचण सोडवून अनेक योजनांचा लाभ मिळवून देणार जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. ११ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून त्यांची प्रत्येक अडचण जिल्हा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडविण्यात येईल, तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिली.   जिल्ह्यातील गत दोन वर्षांतील सुमारे पावणेदोनशे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून संवाद कार्यक्रमाचे आयोजन नियोजनभवनात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी या कुटुंबांशी थेट संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या व या कुटुंबांच्या अडचणी तत्काळ सोडवून, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भरपाई कशातूनही होत नाही. मात्र, अशा कुटुंबांच्या अडच...

वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

        वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ अकोला, दि. 10 : जिल्ह्यातील 8 वाळूघाटांच्या ई-लिलावाला दहावी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, म्हैसांग, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादुरा, सागद, नागद व मांजरी येथील वाळूघाट आहेत. ई-लिलाव वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून त्याबाबतचे शुध्दीपत्रक https://mahatenders.gov.in व https://www.akola.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.     इतर 10 घाटांच्या लिलावालाही मुदतवाढ त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील 10 वाळूघाटांच्या लिलावाला आठवी मुदतवाढ देण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कोळसरा-1, खापरवाडा-2 (खैरी), लोणसणा, बपोरी, पिंगळा दापुरा, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2, हिंगणा शिकारी, मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तसेच तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव या ठिकाणांचा समावेश आहे.   या ई-लिलाव प्रक्रियेत दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वा. पर्यंत ई-निविदा (ई-टेंडर) ऑनलाईन स्वीकारण्यात येतील. दि. 18 फेब्रुवारीस तांत्रिक लिफाफा   उघडण्या...

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ साजरा इंटरनेटचा विवेकपूर्ण वापर आवश्यक मान्यवरांचे आवाहन

इमेज
    जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ साजरा इंटरनेटचा विवेकपूर्ण वापर आवश्यक मान्यवरांचे आवाहन अकोला, दि. 10 : ई-महाजालाचा जीवनाची विविध अंगे व्यापून टाकणारा विस्तार व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या काळात इंटरनेटचा वापर विवेक व सजगता बाळगून करणे आवश्यक आहे, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.   जिल्हा माहितीविज्ञान कार्यालयातर्फे ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ नियोजनभवनात साजरा करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, निखिल खेमनार, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अति. जि. मा. विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, सायबर सेलच्या पोलीस अधिकारी मनीषा तायडे   यांच्यासह अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी सर्वांना इंटरनेट सुरक्षित वापराची शपथ देण्यात आली. डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टबाबत श्रीमती वाजपेयी यांनी सविस्तर सादरीकरण केले. सायबर सेलतर्फे आशिष आमले यांनी सजग ऑनलाईन व्यवहार व दक्षतेबाबत माहिती दिली. महाजालातील आपली माहि...

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक एमआयडीसी क्षेत्रातील कामे पूर्णत्वास जाण्यासाठी कार्यक्षम पाठपुरावा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक एमआयडीसी क्षेत्रातील कामे पूर्णत्वास जाण्यासाठी कार्यक्षम पाठपुरावा करा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. 10 : औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र वीज उपकेंद्र, 100 फुटी जोडणी रस्ता, स्वतंत्र जलवाहिनी पूर्णत्वास जाण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे, कामे अपूर्ण ठेवणा-या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे निकेश गुप्ता, अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, लघुउद्योग भारतीचे पंकज बियाणी, आशिष चंदराणा, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, केदार पवार, महावितरणच्या अधिक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, साबांवि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.   महान प्रकल्प ते एमआय...

नरनाळा महोत्सव चित्ररथाचा शुभारंभ

इमेज
  नरनाळा महोत्सव चित्ररथाचा शुभारंभ   अकोला, दि. 10 : सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनाळा महोत्सव दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, महोत्सवाबाबत जनजागृतीसाठी चित्ररथाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज झाला. हा चित्ररथ जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून महोत्सव उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महेश परंडेकर, निखील खेमनार, अधिक्षक श्याम धनमने, ऋषिकेश आग्रे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जंगल सफारी, साहसी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समावेश आहे. महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’, ‘शिवशंभू गर्जना’, तसेच प्रसिद्ध गायक कैलास खेर यांची ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ असे नामवंत कलावंतांचा समावेश असलेले कार्यक्रम महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. महोत्सवाबाबत चित्ररथाच्या माध्यमातून गावोगाव माहितीचा प्रसार ...

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; अर्ज मागविले

  गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; अर्ज मागविले अकोला, दि. 9 :समाजकल्याण कार्यालयातर्फे गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर तयार पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबवली जाते. त्यासाठी 28 फेब्रुवारीपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील असल्यास 80 हजार व शहरातील असल्यास 1 लाखापेक्षा अधिक असू नये. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक. वय 18 पेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला भाड्याने, कराराने, खरेदीने वा विनामूल्य मात्र, अधिकृत ताब्यात दिलेली असावी किंवा त्याच्या स्वयंमालकीची असावी. लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेली अनुसूचित जातीची व्यक्ती, घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, दिव्यांग व्यक्ती असा असेल. इच्छूकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, पोलीस वसाहतीजवळ, अकोला येथे अर्ज करावेत. ०००