पोस्ट्स

‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

    ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार   वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. ३ : वृक्षक्रांती मिशनतर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा प्रस्ताव असून, त्यांना सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्यातर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील ६० शासकीय कार्यालये व जागांमध्ये या उपक्रमात वृक्षलागवड झाली. यंदाही हा उपक्रम राबविण्याची इच्छा असून, जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, ई-क्लास जमीनीवर, तसेच एमआयडीसीच्या खुल्या जागांवर स्वस्तिक वृक्षलागवडीसाठी नि:स्वार्थ सेवा देण्याची तयारी आहे, असे श्री. नाथन यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील वृक्षलागवडीला चालना मिळण्यासाठी कार्यालयातील जागा, पाण्याची व्यवस्था, रोपे, कुंपण, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी यंत्रणांनी मिशनला सहक...

विशेष लेख मनुष्यबळाच्या कौशल्यवृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’

विशेष लेख  मनुष्यबळाच्या कौशल्यवृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’ भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग, आणि 6 विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी म...

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’

    अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी   2   ते   8   एप्रिलदरम्यान   ‘ महा-साधना सप्ताह ’   अकोला, दि. १ : भारत सरकार ,   क्षमता विकास आयोग ( CBC)   आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने   2   एप्रिल ते   8   एप्रिल   2026   या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे ,   भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.   केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह   2   ते   8   एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत   8   लाख   80   हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी   7   दिवसांत किमान   4   तासांचे अभ्यासक्रम   आय गॉट   कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण क...

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यासह १८ जिल्ह्यांचा समावेश

  हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी ’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यासह १८ जिल्ह्यांचा समावेश मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी ’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी   केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या   औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील ल...

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक

इमेज
  राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक   अकोला-राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला असून एकूण ४३ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे २१ खेळाडू बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील असून जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाची वाढती ताकद अधोरेखित झाली आहे.   राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून प्राविण्य मिळवणाऱ्या या खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने त्यांच्या पुढील प्रशिक्षणास मोठी चालना मिळणार आहे.           महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व प्राविण्यानुसार(सुवर्ण पदक 11250₹, रजत पदक 8950₹, कांस्य पदक 6750₹ तसेच सहभागी खेळाडूंना 3750₹)विविध रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षण, आहार व साहित्य खर्चास मदत होते...

कृषी पुरस्कारांसाठी शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करता येणार दि. १५ एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे ‘एसएओं’चे आवाहन

  कृषी पुरस्कारांसाठी शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करता येणार दि. १५ एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे ‘एसएओं’चे आवाहन अकोला, दि. ३१ : शासनाच्या विविध कृषी पुरस्कारासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाईन प्रणालीवर घरबसल्या अर्ज सादर करता येणार आहे. इच्छूकांनी दि. १५ एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे. कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी , महिला , व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न , वसंतराव नाईक कृषिभूषण , जिजामाता कृषिभूषण , वसंतराव नाईक शेतीमित्र , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी , उद्यानपंडित पुरस्कार , कृषिभूषण (सेंद्रिय शेती) , युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल , महाराष्ट्र रा...

बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला ‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

इमेज
    बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला ‘चाईल्डलाईन’ची सतर्कता अकोला, दि. ३० : बार्शीटाकळीनजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न चाईल्डलाईन व काही स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कता व जलद कार्यवाहीमुळे फसला. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीचा विवाह २४ वर्षीय तरुणासोबत होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन,    'ॲसेस टू जस्टीस', आय. एस. डब्ल्यू. एस.  यांना मिळाली. त्यांच्या टीमने धाडसी कारवाई करत हा विवाह तत्काळ थांबवला. या घटनेत मु लीचे आधीच्या आधारकार्ड वय १७ वर्ष असताना ते वाढवून बनावट कार्ड तयार केल्याचे आढळले. टीमने तत्काळ पोहोचून पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणले. संबंधितांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल माहिती देऊन बाल विवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समुपदेशन आणि कडक इशारा देऊन   बाल कल्याण समितीसमोर दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबद्दल उपस्थितांना सविस्तर ...

शेतक-यांसाठी ‘विशेष डिजिटल शेती शाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

  शेतक-यांसाठी ‘ विशेष डिजिटल शेती शाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन      अकोला, दि. ३० : हवामानातील वाढती अनिश्चितता , पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता   "हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान" सुरू केले आहे.   हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे , कृषी विज्ञान केंद्रे , उमेद , माविम , पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत.   या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल   महिन्यात चार विशेष डिजिटल शेती श...