स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक
स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक अकोला, दि. 9 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे बंधनकारक असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी स्पष्ट केले. शासकीय वसतिगृह सुविधेची जागेची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासुन वंचित राहतात. त्यामुळे मागावर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली. योजनेत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत्ः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार ...