विशेष लेख जलसंधारण : काळाची गरज
जलसंधारण : काळाची गरज राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा जलसंधारण दिन त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे. या जलसंधारण अभियानाच्या निमित्ताने जलसंधारणाच्या विविध उपाययोजनाविषयी माहिती देणारा हा लेख.... कमी पाण्यामध्ये जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांमध्ये तसेच उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. त्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर केला जाऊ शकतो व कमी पाण्यात बहारदार शेतीचा प्रयोग करता येऊ शकतो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजनांचा कल्पकतेनं वापर केला पाहिजे. मृद व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात. ज्...