पोस्ट्स

जिल्ह्यात साखर निर्बंध साठा आदेश लागू

  जि ल्ह्यात साखर निर्बंध साठा आदेश लागू अकोला, दि. २१ : केंद्र शासना च्या जीवनावश्यक वस्तु अंतर्गत   साखर साठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साखर व्यावसायिकांना साख रेची ४ हजार क्विंटल इतकी साठा मर्यादा ( स्टॉक होल्डिंग‍ लिमीट) निश्चित करण्यात आली आहे. जि ल्ह्या तील नाग रि कांना साखर वेळेत उपलब्ध व्हावी ,   साखरेच्या किमती नियंत्रीत राहा व्यात , साखरचे साठेबाजी हो ऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. केंद्रशासना च्या अधिसूचनेत नमुद केलेला साठा मर्यादा आणि इतर अटी निर्बंध आदेश सं पू र्ण जिल्ह्यामध्ये लागू राहतील. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू अंतर्गत साख रेच्या व्यावसा यि कां ना ४ हजार क्विंटलपर्यंत चा साखर साठा करता येईल. तशी   निर्बंध मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून , संपुर्ण जिल्हयात सदरहू साखर मर्यांदा निर्बंध आदेश पुढील    आदेशापर्यंत लागू राहतील. यासंबंधी कार्यक्षेत्रात   पुरवठा विभाग यंत्रणेद्वारे वेळोवेळी भेटीदरम्यान पडताळणी करण्यात येईल. सर्व साखर व्यापा-यांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर h...

जिल्हा उद्योग केंद्रप्रमुखांच्या पदनामात बदल 

    जिल्हा उद्योग केंद्रप्रमुखांच्या पदनामात बदल    अकोला, दि. २१: जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयप्रमुखाचे पदनाम आता ‘महाव्यवस्थापक’ऐवजी आता ‘ उपायुक्त  (उद्योग व सेवा)’ असे झाले आहे. तसा शासन निर्णय उद्योग व खनिकर्म विभागाने निर्गमित केला आहे. विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आकृतीबंधात नविन पदनामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने उद्योग आयुक्तालयाने परिपत्रक काढून कार्यालयीन कामकाजात सुधारित पदनामाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये यापुढे  उपायुक्त (उद्योग व सेवा) असे पदनाम वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ०००

द्रवनत्र पात्रांच्या वाहतुकीसाठी निविदा मागविल्या

द्रवनत्र पात्रांच्या वाहतुकीसाठी निविदा मागविल्या अकोला, दि. २१ : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत द्रवनत्र पात्रांची वाहतूक करण्यासाठी मिनीट्रक वाहतूकधारकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदांबाबतच्या नियम व अटी अर्जाचा नमुना सदर कार्यालयामार्फत शुल्क एक हजार रूपये भरून कार्यालयात उपलब्ध होईल. निविदा दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील. निविदामध्ये वाहतूक दर प्रतिकिलोमीटर असा असावा. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार निविदा समितीने राखून ठेवले आहेत. दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निविदा समितीसमोर उघडण्यात येतील. अशी माहिती जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. ०००  

रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम -जिल्हाधिकारी

    रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम -जिल्हाधिकारी अकोला, दि. २१ : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने लोकनेते,माजी मंत्री स्व. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित या शिबिरात उद्घाटक   म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होत्या. अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या शिबिरात रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ किशोर मालोकार, सचिव प्रभजीत सिंह बछेर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे,बहुजन पत्रकार संघाचे मार्गदर्शक अँड सुधाकर खुमकर,अध्यक्ष अनिल मोहोरे,जावेद जकारिया आदी उपस्थित होते. शासन व समाजाचा दुवा असणारा पत्रकार वर्ग हा खऱ्या अर्थाने आरोग्यमय झाला पाहिजे, यासाठी सातत्याने अशा आरोग्यदायी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षां मीना यांनी करून या उ...

महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर

  माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती अर्थात जलसंधारण दिन महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर                                                                                                                                                   ...

विशेष लेख जलसंधारण : काळाची गरज

इमेज
जलसंधारण : काळाची गरज  राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा जलसंधारण दिन त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे. या जलसंधारण अभियानाच्या निमित्ताने जलसंधारणाच्या विविध उपाययोजनाविषयी माहिती देणारा हा लेख....  कमी पाण्यामध्ये जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांमध्ये तसेच उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. त्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर केला जाऊ शकतो व कमी पाण्यात बहारदार शेतीचा प्रयोग करता येऊ शकतो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजनांचा कल्पकतेनं वापर केला पाहिजे.  मृद व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात. ज्...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत मुंबई,दि.१८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होत आहेत. त्यामुळे किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस निकामी झालेल्या अनेक रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली आहे. मात्र, अशा शस्त्रक्रियांसाठी खाजगी रूग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मुख्यमं...

अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा ; रिक्त पदे तातडीने भरा ; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा रिक्त पदे तातडीने भरा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अकोला, दि. १९ : अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असून, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यावर भर द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने आज येथे दिले. त्याचप्रमाणे, रिक्त पदांची भरती तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. समितीचे सदस्य आमदार सर्वश्री. जगन्नाथ अभ्यंकर, डॉ.अशोक माने, संजय मेश्राम, गजानन लवटे उपस्थित होते. समितीच्या अवर सचिव जयश्री म्हात्रे,जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक (वन्यजीव) राहुल तोलिया, महाबीज महाव्यवस्थापक डॉ.संजय गरकल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व अधिकारी...

माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन! ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!"

 विशेष लेख  माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन!   ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!"  ​ पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाची चळवळ आता  मर्यादित स्वरूपात राहिली नसून डिजीटल विश्वातही तितक्याच ताकदीने पोहोचणार आहे. दि १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या ‘जलसंधारण सप्ताहा’चे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने राज्यातील तरुण-तरुणींसाठी ‘रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन’ या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय रील स्पर्धेची घोषणा केली आहे. ​आजची तरुण पिढी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. याच सर्जनशीलतेचा उपयोग करून माती व पाण्याचे महत्त्व सांगणारा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ​ स्पर्धेत भाग कोण घेऊ शकतं?  ​महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील सर्व युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. राज्यभरातून १०,००० हून अधिक रील्स गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स...

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

  महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन अकोला, दि १८: शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure ...