पोस्ट्स

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अकोला, दि. : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय अकोला यांच्या वतीने मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. या योजनेअंतर्गत सन २०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यास त्यांना गुणक्रमानुसार व उपलब्ध निधीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिका तसेच पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज साहित्यरत्न लो...

विशेष लेख - कर्जमुक्तीचा नवा दिलासा, सक्षम शेतीचा नवा संकल्प

  विशेष लेख कर्जमुक्तीचा नवा दिलासा, सक्षम शेतीचा नवा संकल्प शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीची नसून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. आता योजनेची व्याप्ती वाढल्यामुळे ती व्यापक शेतकरी  हित साधले जाणार आहे. या योजनेत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची व्याप्ती वाढवत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच्या योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या असून, त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा हटविण्यात आली असून, आता अशा प...

श्रावणातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १६ जुलैला पूर्वतयारी आढावा बैठक

  श्रावणातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १६ जुलैला पूर्वतयारी आढावा बैठक अकोला, दि. १३ : श्रावण महिन्याला दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून प्रारंभ होत असून, अकोला जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पारंपरिक कावड व पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाच्या माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. श्रावण महिन्यात १७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार (श्री क्षेत्र धारगड यात्रा) तसेच ७ सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार असून या दिवशी अकोला शहर व ग्रामीण भागात कावड व पालखी मिरवणुका निघणार आहेत. या कालावधीत मोठ्या संख्येने ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जाहीर

  गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी  केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जाहीर अकोला, दि. १३ : :येथील केंद्रीय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी यानिमित्त निर्माण झाली असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व केंद्रीय विद्यालय समितीतर्फे करण्यात आले आहे.  या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती नोंदणी फॉर्म मिळणे आणि सादर करणे यासाठी १५ जुलै ते २८ जुलै अशी मुदत असून (फक्त कामकाजाच्या दिवशी) फॉर्म स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२:३० आणि दुपारी १:०० ते २:३० वाजेपर्यंत अशी आहे. फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २८ जुलै आहे.प्रवेशाची सोडत ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता 'जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला' येथे होईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी ३ ऑगस्ट २०२६ रोजी लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. प्रवेशाचे ठिकाण केंद्रीय विद्यालय अकोला, जिल्हा परिषद हायस्कूल (शहर), ...

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेकरीता

  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेकरीता अकोला, दि. १३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे मार्फत सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाकरीता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 14 डिसेंबर 2022 नुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे. सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत होती. परंतु सदर अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली असून वाढीव अंतिम तारीख दि.22 जुलै 2026 पर्यंत राहील. याची जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळविले आहे.

स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक

    स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक अकोला, दि. 9 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे बंधनकारक असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी स्पष्ट केले. शासकीय वसतिगृह सुविधेची जागेची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासुन वंचित राहतात. त्यामुळे मागावर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली.   योजनेत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत्ः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार ...

केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. ९ : अकोला येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे मंजुरी व अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे. तेथील प्रवेशप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   केंद्रिय विद्यालयाच्या इमारत, प्रवेशप्रक्रिया आदी व्यवस्थेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक आज झाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, साबांवि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार आदी अधिकारी उपस्थित होते. यंदा प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळेसाठी हरिहरपेठेतील जि. प. शाळेची जागा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असून, तिथे लवकरच शाळा सुरू होणार आहे. शाळेची प्रव...

विशेष लेख राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण

  विशेष लेख     राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण   शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरता दिलासा देणे पुरेसे नसून शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, उत्पादनक्षम बनेल आणि भविष्यात कर्जाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही, अशी दीर्घकालीन व्यवस्था उभी करणे आवश्यक ठरते.   याच व्यापक दृष्टिकोनातून राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिली जात आहे.   कर्जमुक्तीचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा असला, तरी त्यामागील व्याप...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा अकोला, दि. ७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केल्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.   राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना   2026   जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2017   मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत ,   तर   2019   मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. यावेळीही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येत आहे. अल्पमुदतीची थकीत पीककर्जे ,   तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. योजनेचे वैशिष्ट्ये असे की, पूर्वी दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता ,   म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे दोन लाख दहा हजार कर्ज असेल तर तो शेतकरी   अपात्र ठरत होता. आता मात्र अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हि...

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग.  8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.  शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी वि...