पोस्ट्स

महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम वर्षभरात सुरु होणार

    महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम वर्षभरात सुरु होणार ‘ व्हीआयडीसी ’ चे नियोजन, विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार   अकोला-बुलडाण्यालाही लाभ; काटेपूर्णा प्रकल्पाचा साठवणीसाठी वापर अकोला,दि. 5 :   नागपूर-सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसलेल्या विदर्भातील जिल्ह्यांचे संपूर्ण चित्रच बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प सध्या विविध मान्यतांच्या टप्प्यात आहे. या वर्षातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने मंजुरीच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. या प्रकल्पास 2024 मध्ये राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचा सुमारे 94 हजार 912 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प अहवाल मे. सिएन्सीस टेक लिमिटेड या कंपनीने तयार केला असून तो शासनाकडे प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रक्रमावर घेतला असून वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येत आहे. य...

‘अमृत’कडून 10 विद्यार्थ्यांना जीसीसी-टीबीसी परीक्षा शुल्क परतावा

    ‘अमृत’कडून 10 विद्यार्थ्यांना जीसीसी-टीबीसी परीक्षा शुल्क परतावा अकोला, दि. 5 : महाराष्ट्र संशोधन, उत्तीर्ण व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी व कौशल्य विकासाच्या योजना राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून जीसीसी-टीबीसी (शासकीय टंकलेखन व लघुलेखन) परीक्षा शुल्क परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाभ अकोला जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना परतावा मिळाला आहे.   या योजनेत प्रत्येक विद्यार्थ्याला 6 हजार 500 रु. प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.   आर्थिक अडचणीमुळे शिक्षण व प्रशिक्षणाचा खर्च पेलणे कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे प्रशिक्षणाचा भार कमी झाला असून, पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आत्मविश्वास वाढला आहे. अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.     “ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील त...

शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढा समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना

  शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढा समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना अकोला, दि. 5 : विविध शिष्यवृत्ती योजनांचे सुमारे 3 हजार अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून, महाविद्यालयांनी त्याची तत्काळ पूर्तता करण्याची सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता या योजना महाडिबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. सन 2022-23 मध्ये महाविद्यालय स्तरावर 231, सन 2023-24 मध्ये 94 व सन 2024-25 मध्ये 471 एवढे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. या अर्जांची महाविद्यालयाने तात्काळ तपासणी व पडताळणी करावी. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावे जेणेकरून अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे, सन 2025-26 या वर्षातील 2 हजार 780 म...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अकोला, दि. 5 : आदिवासी विकास विभागातर्फे परदेशातील शैक्षणिक संस्थांत 2026-27 या वर्षात पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएडी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. उमेदवार व उमेदवाराचे आई,वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. उमेदवाराच्या पालकांचे,कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. विहीत निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत, तसेच विद्यापीठाची जागतिक क्रमवारी 300 पर्यंत शिथील केली जाईल. अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती आदी माहिती आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra....

अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

    अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अकोला, दि. 4 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दि. 6 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.   मेळाव्यात 3 नामांकित कंपनीव्दारे एकूण 85 पदांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या करावा. दि. ६ फेब्रुवारीस मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष सकाळी ११ ते २ या वेळेत उपस्थित राहावे.   ऑनलाईन सहभागासाठी प्रक्रिया www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. Employment या टॅबवर क्लिक करा. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्...

शेतकरी आत्महत्या प्रकरणी जिल्हा समितीची बैठक; 10 प्रकरणे मदतीसाठी पात्र

इमेज
शेतकरी आत्महत्या 10 प्रकरणे मदतीसाठी पात्र अकोला, दि. 4 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. त्यानुसार 10 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हरिश देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, पोलीस विभाग प्रतिनिधी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत 16 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यावर सर्व बाबी तपासून विचार करण्यात आला. त्यापैकी 10 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. विविध कारणांस्तव अन्य प्रकरणे अपात्र ठरली. बैठकीत 10 प्रकरणे पात्र ठरल्याने संबंधित शेतकरी कुटुंबांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   ०००  

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

इमेज
  जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा     अकोला, दि. 4   : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा अकोला जिल्ह्यात पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.     कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.   जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, शिक्षणाधिकारी योजना संजयकुमार झापे, जिल्हा   शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.रत्नमाला खडके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद टेकाडे,सुभाष भालेराव,प्राथमिक उपशिक्षणाधिका...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात पैलपाड्यात साकारणार मोठी रोपवाटिका

इमेज
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात पैलपाड्यात साकारणार मोठी रोपवाटिका अकोला, दि. 3 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात महाबीज उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून अकोला- मूर्तिजापूर रस्त्यावरील पैलपाडा येथे 2 हेक्टर परिसरात मोठी रोपवाटिका साकारणार आहे. जिल्हा अभियान समितीची बैठक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी महाबीज उत्कृष्टता केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हरिश देशमुख, ‘आत्मा’चे संचालक डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी विवेक बि-हाडे, तुषार ठाकरे यांच्यासह विविध अधिकारी  उपस्थित होते. या प्रकल्पाचा खर्च 60 लक्ष 19 हजार 242 रू. आहे. प्रकल्पाची 2 लक्ष 9 हजार 500 रोपांची क्षमता आहे. ही रोपवाटिका उच्च तंत्रज्ञानाधारित असून, 2 हे. इतक्या क्षेत्रात साकारणार आहे. ०००

नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2; जिल्ह्यात 133 गावांचा समावेश जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आराखड्याला मान्यता

इमेज
  नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2; जिल्ह्यात 133 गावांचा समावेश जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आराखड्याला मान्यता अकोला, दि. 3 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील 133 गावांचा समावेश असलेल्या आराखड्याला आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेतील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.   जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हरिश देशमुख, ‘आत्मा’चे संचालक डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी विवेक बि-हाडे, तुषार ठाकरे यांच्यासह विविध अधिकारी   उपस्थित होते. प्रकल्पाद्वारे लहान शेतक-यांची क्षमता, संसाधनांचा कार्यक्षम वापर, स्पर्धात्मक उत्पादन प्रणालीला चालना देणे, काटेकोर शेती पद्धतीद्वारे कर्ब उत्सर्जन कमी करणे, हवामान अनुकुल तंत्रज्ञानाचा वापर, संस्थात्मक बांधणी व नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार आहे. या माध्यमातून वृक्षलागवड, फळबाग लागवड, खतनिर्मिती, सिंचन, बंदिस्त शेळीपालन, रेशीम शेती अशा अनेक बाबींसाठी शेतक-यांना अर्थसहाय्य मिळणार असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, ...

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका

इमेज
  जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. 2 : नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट मार्चअखेरपर्यंत 100 टक्के पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत जिल्हा लसीकरण टास्क फोर्स, जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समिती, जन्ममृत्यू नोंदणी जिल्हास्तरीय समन्वय समिती आदी विविध बैठका आज झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, तसेच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. लसीकरण कार्यक्रमात बीसीजी, पोलिओ, हिपॅटायटिस बी, रोटाव्हायरस, पेन्टावॅलेंट, पीसीव्ही, एमआर, डीपीटी आदी 8 लसी दिल्या जातात. लसीकरण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 31 हजार 368 उद्दिष्टापैकी 23 हजार 368 लसीकरण डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित लसीकरण विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले....