पोस्ट्स

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार अकोला,दि.१४ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.        गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रु...

सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन

  सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी  संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन अकोला, दि. १४ : भारतीय संविधान हे देशाच्या एकता व अखंडतेचा पाया असून सक्षम व सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे कार्य भारतीय संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह  कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, जिल्हा जात पडताळणी उपआयुक्त अमोल यावलीकर, व्याख्यात्या राजेश्वरी सोळंके यांच्यासह सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी आदी उपस्थित होते. श्रीमती मीना म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांनी देशाला संपूर्ण जगाला आदर्शवत अशी राज्यघटना दिली. त्यांचे लेखनकार्य व विचार संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. यावेळी इतर ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन

 > नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन अकोला, दि. 13 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्याकरिता अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेतून गावपातळीवर 'कृषी अवजार बँक' स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्क्यांपर्यंत, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद, माविम पुरस्कृत व इतरमहिला बचत गट तसेच महिलांचे गाव संघ पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. एका गावात एकाच महिला गटाला लाभ देता येईल. त्यामुळे जर एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्या...

रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद

  रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद अकोला, दि. १३ : जिल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अनेक युवकांनी उपस्थित राहून रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय दिला. जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला यांच्यावतीने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे निमित्ताने जिल्हयात आरोग्य अधिकारी   डॉ. अक्षता प्रधान, डॉ. मयुरेश वैराळे , शिल्पा तायडे , मयुरी गायगोले यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय व महाविद्यालय,अकोला येथे रक्तदान शिबीरामध्ये इच्छुक व्यक्तीनी रक्तदान करुन कार्यक्रम साजरा करण्यात आला.   त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,निमवाडी अकोला येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग यांचे विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबददल महिला मेळावा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणुन श्रीमती. सपना लांडे मॅडम व्याख्याता (समाज सेवीका) यांनी महिला विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व शाहु,फुले,आंबेडकर व सावित्रीब...

सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल

        सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल अकोला दिनांक 13  : सामाजिक समता सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा, भीमगीत गायन स्पर्धा व संविधान जागर आदी कार्यक्रम घेण्यात आले.                 सर्वाना समान न्याय,समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभरात दि.08 एप्रिल 2026 पासुन सलग सात दिवस अभिनव पध्दतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.             याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन आज दिनांक 10 एप्रिल 2026 ते दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी अकोला जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला व श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोला यांच्या सयुक्त विद्यमाने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे निमित्ताने श्री.शिवाजी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अकोला येथे भव्य विदर्भस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा  व भीमगीत गायन स्पर्धा...

वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही

    वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही   अकोला, दि. १३ : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक   योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेला आहे. वनहक्क अधिनियम , २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक   कागदपत्रांसह शेतकरी आयडी नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शेतकरी नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना , अनुदान , पीकविमा , नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर ...

जिल्ह्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  जिल्ह्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. 13 : नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दि. 13 एप्रिल ते दि. 17 एप्रिल दरम्यान अकोला, तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती  आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार मुंबई,दि.१३ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.        गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर...

सामाजिक समता सप्ताहात मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन

  सामाजिक समता सप्ताहात मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन अकोला, दि. 13 : समाजकल्याण कार्यालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात स्टँडअप इंडिया योजनेत मार्जिन मनी उपक्रमाबाबत कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शुक्रवारी झाली. जिल्ह्यातील युवक उद्योजक व तरूणांसाठी स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जीन मनी पुरविण्याच्या योजनेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त एम.जी. वाठ हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. युवक उद्योजक रणजीत सरदार व जिल्हा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. धांडे, संत रविदास आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. वटे आदी उपस्थित होते. स्थानिक नवउद्योजक युवक उपस्थित होते. उपस्थित युवक व विध्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती देऊन युवकांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेद्वारे करण्यात आले. स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मार्जीन मनी योजनांचे लाभ देण्यात आलेले जिल्ह्यातील लाभार्थी रणजित सरदार यांचा विभागामार्फत सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ स...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सामाजिक न्याय भवनात मंगळवारी भव्य कार्यक्रम

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सामाजिक न्याय भवनात मंगळवारी भव्य कार्यक्रम अकोला, दि. १३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे सलग सात दिवस विविध कार्यक्रम होत असून, उद्या (१४ एप्रिल) सकाळी ११ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात भव्य कार्यक्रम होणार आहे. सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन दि. ८ एप्रिल रोजी करण्यात झाले. आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले. समाजकल्याण उपायुक्त अमोल यावलीकर, सहायक आयुक्त एम. जी. वाठ, गोपाळ वाघमारे आदी उपस्थित होते. समता सप्ताहात रोज अभिनव व विविध कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांची रचना केली आहे. सामाजिक सप्ताह कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतीचे वितरण घरोघर होत आहे. सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्य...