पोस्ट्स

सणांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

                                                                                                                                                                                                                                              सणांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू अकोला, दि. १६ : गुढीपाडवा, रमजान ईद आदी सण लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ३७...

बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे कालबाह्य बियाण्याचा लिलाव

    बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे कालबाह्य बियाण्याचा लिलाव अकोला, दि. १६ : येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे तपासणीअंती कालबाह्य झालेल्या ३० क्विंटल सोयाबीन बियाण्याचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. पशुखाद्य उत्पादक संस्था तथा पशुपालकांनी लिलावात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिलाव दि. २४ मार्च रोजी दु. १२ वा. बीज परीक्षण प्रयोगशाळा परिसर, नीळकंठ सूतगिरणीसमोर, शिवणी, अकोला येथे होईल.   लिलावापूर्वी प्रयोगशाळेत बियाण्याची प्रतवारी कार्यालयीन वेळेत पाहता येईल.   लिलावाच्या अटी व शर्ती प्रयोगशाळेच्या सूचनाफलकावर पहावयास मिळतील. ०००

जिल्ह्यात १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

  जिल्ह्यात १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ अकोला, दि. १६ : जिल्ह्यातील १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे.     मूर्तिजापूर तालुक्यातील लोणसणा, बपोरी, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2 ( हिंगणा शिकारी), मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव आदी ७ वाळूघाटांना तेरावी मुदतवाढ देण्यात आली आहे. अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादूरा, सागद, नागद, मांजरी या ७ वाळूघाटांच्या ई-लिलावाला पंधरावी मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाळूघाटांच्या ऑनलाईन ई-निविदा दि. २३ मार्चला दु. 12 वा. पर्यंत स्वीकारण्यात येतील. तांत्रिक लिफाफा व त्यानंतर आर्थिक लिफाफा दि. २४ मार्चला उघडण्यात येईल. ई-लिलाव प्रक्रिया दि. २५ मार्चला सकाळी १० ते दु. १ वा. दरम्यान होईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे यांनी दिली. ०००  

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. १३ : कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रोजगार आदी क्षेत्रांत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी बँकांनी आपली जबाबदारी ओळखून पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.      जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या (डीएलसीसी) बैठकीत त्या बोलत होत्या. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक तथा प्र. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरिश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, ‘नाबार्ड’चे श्रीराम वाघमारे यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते.   केंद्र व राज्य शासनातर्फे कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, उद्योग, रोजगार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी पतपुरवठ्याला साह्यभूत अनेक योजना राबविल्या जातात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडूनही कर्जपुरवठ्याची कार्यवाही वेळेत झाली पाहिजे. अनेक बँकांची कामगिरी समाधानकारक न...

सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण सुरक्षित एचपीव्ही लसीकरणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

इमेज
  सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण सुरक्षित एचपीव्ही लसीकरणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा       अकोला, दि. १३ : एचपीव्ही लस   सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नसून, लस अत्यंत सुरक्षित आहे. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी व्यापक जनजागृती करून लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. एचपीव्ही लस ीकरणाच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मेश्राम, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते. एचपीव्ही लस ही चौदा वर्षे वय पूर्ण झालेल्या व पंधरा वर्षांआतील मुलींना दिली जाणार आहे. जिल्ह्यात ९ हजार २९ विद्यार्थीनी पात्र आहेत. आरोग्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरण होणार आहे. सर्व्हायकल कॅन्सर व भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने लस सुरक्षित व उपयुक्त...

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य यंत्रणेचा आढावा उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना रूग्णालये सुसज्ज ठेवण्याचे निर्देश

इमेज
  जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य यंत्रणेचा आढावा उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना रूग्णालये सुसज्ज ठेवण्याचे निर्देश अकोला, दि. १३ : तापमानाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशी औषधे, उपचार साहित्य उपलब्ध ठेवावे. उष्मालाटेपासून बचावासाठी आवश्यक दक्षतेबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   जिल्हा संसर्गजन्य आजार प्रतिबंध समिती, नियमित लसीकरण कार्यक्रम,   प्राणीजन्य आजार प्रतिबंध समिती, हवामान बदल व मानवी आरोग्य कार्यक्रम टास्क फोर्स आदी विविध बैठका जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मेश्राम, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते.   जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात ४५.२. से. इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले. उष्मा...

संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्यावे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश

इमेज
  संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.  बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते. कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे....

विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा

इमेज
  विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा  तपासणीची  निश्चित कार्यपद्धती मुंबई, दि. 11 : आरोग्य विमा कंपन्यांकडून दावा मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तपासणीची निश्चित कार्यपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे.   भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडून राज्यातील तक्रारी प्राप्त करुन त्यावर अभ्यास व उपाययोजना करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.                                                                           ...

‘महाबीज’तर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १० शाळांना ग्रंथसाहित्य भेट जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते वितरण

इमेज
  ‘महाबीज’तर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १० शाळांना ग्रंथसाहित्य भेट जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते वितरण अकोला, दि. ११ : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळांना ग्रंथालयांसाठी विविध विषयांची पुस्तके आणि दर्जेदार कपाट अशा वाचन साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजभवनात हा कार्यक्रम झाला. महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ, उपजिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक प्रशासन डॉ. संजय गरकल, कंपनी सेक्रेटरी विनय वर्मा, डॉ. जितेंद्र काठोळे यांच्यासह महामंडळाचे सर्व विभागप्रमुख आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.     डिजीटल युगात विद्यार्थ्यांचा कल स्क्रीनकडे वाढत असताना त्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवणे काळाची गरज आहे. या ग्रंथालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी केले.   गुणवत्ता वाढीसाठी पुस्तका...

किडनीच्या सुरक्षिततेसाठी योग्य सवयी आवश्यक

  किडनीच्या सुरक्षिततेसाठी योग्य सवयी आवश्यक   दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मुत्रपिंड आरोग्य दिन   साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये मुत्रपिंडांच्या (किडनीच्या) आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि किडनीचे आजार टाळण्यासाठी योग्य सवयी अंगीकारण्यास प्रेरित करणे हा आहे.   मुत्रपिंडाचे महत्त्व   मानवी शरीरात दोन मुत्रपिंडे असतात. ती रक्तातील अपायकारक पदार्थ व अतिरिक्त पाणी गाळून लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम करतात. तसेच शरीरातील पाणी-मीठ संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीत मदत करणे हीही त्यांची महत्त्वाची कार्ये आहेत.   मुत्रपिंडाचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळेवर तपासणी यामुळे किडनीचे आजार टाळता येतात. मुत्रपिंड विकार लक्षणे - लघवीत बदल: खूप जास्त किंवा खूप कमी लघवी होणे, लघवीतून फेस येणे किंवा रक्त जाणे। सूज : पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे। थकवा आणि अशक्तपणा: सतत थकवा जाणवणे किंवा ऊर्जा कमी वाटणे त्वचेवर खा...