पोस्ट्स

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ;

इमेज
  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण अमरावती, दि. 29 : कधी अवेळी पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अतिवृष्टी... अशा एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील बळिराजाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची घोषणा केली असून, या महाकर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटु...

महाकर्जमुक्तीची संजीवनी

      महाकर्जमुक्तीची संजीवनी                                                                                                                                         नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे....

लोकसेवा हक्क अधिनियम : अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा एकही प्रकरण प्रलंबित राहू नये - निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे

इमेज
    लोकसेवा हक्क अधिनियम : अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा एकही प्रकरण प्रलंबित राहू नये -         निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे अकोला, दि. २९ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहित मुदतीत पारदर्शकपणे सेवा मिळणे आवश्यक आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील अनेक कार्यालयांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवांबाबत विविध कार्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा श्री. मालठाणे यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. मालठाणे म्हणाले की, अनेक कार्यालयांनी विहित मुदतीत कार्यवाही न केल्याने टाईमलाईन स्कोअरमध्ये ते मागे असल्याचे दिसते. सर्व कार्यालयांमिळून १ एप्रिल २६ पासून आतापावेतो १ लाख ११ हजार ६३ प्रकरणे प्राप्त झाली. त्यात ९३ हजार ७२१ प्रकरणी निपटारा झाल्याचे दिसते. विविध कार्यालयांचा टाईमलाईन स्कोअर कमी असल्याने ...

मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

  मराठी न शिकविणाऱ्या  शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे   मुंबई , दि. २९ : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी  न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द  करण्यात येईल , असे  शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी  विधानसभेत सांगितले. शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की , मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करणेही शाळांसाठी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळा तपासणी व भेटीदरम्यान मराठी विषयाच्या अध्यापनाची तसेच प्रत्येक वर्गातील मराठी परीक्षेची पडताळणी केली जाणार आहे. अभ्यासक्रमात राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून , महात्मा ज्योतिराव फुले...

पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजचे हरित पाऊल

इमेज
 पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजचे हरित पाऊल 'कार्यालय तेथे वड' उपक्रमांतर्गत महाबीज मुख्यालयात वटवृक्ष लागवड अकोला, दि. २९: वड हे दीर्घायुषी पर्यावरणपूरक वृक्ष असून, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येक कार्यालय परिसरात वड वृक्षांची लागवड व्हावी असे आवाहन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने महाबीज मुख्यालयात 'कार्यालय तेथे वड लागवड' कार्यक्रमात ते बोलत होते. व्यवस्थापकीय संचालक श्री.स्वामी यांच्या संकल्पनेतून वटपौर्णिमा निमित्त महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा अंतर्गत येणारी सर्व कार्यालय परिसर बिज प्रक्रिया केंद्र, गोडावून येथे 'कार्यालय तेथे वड' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजने वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. एस. एस. गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुण...

कोषागारातर्फे ‘डीडीओं’ना नवीन सेवार्थ प्रणालीचे धडे

इमेज
  कोषागारातर्फे ‘डीडीओं’ना नवीन सेवार्थ प्रणालीचे धडे   अकोला, दि. २९ : लेखा व कोषागारे संचालक यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हा कोषागारातर्फे त्याचे विविध कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचा-यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण गुरूवारी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्याम धनमने व जिल्हा कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा शुभारंभ झाला. अपर कोषागार अधिकारी सविता भगत, अपर कोषागार अधिकारी मीनाक्षी पवार तसेच अपर कोषागार अधिकारी मोना मोहोड व मोठ्या संख्येने अकोला जिल्हा व तालुक्यातील कार्यालयप्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते. शासकीय कामकाज कागदविरहित, गतिमान व अधिक पारदर्शक करण्यासाठी वित्त विभागातर्फे अधिकारी, कर्मचारी यांची सेवार्थ प्रणालीत ई-वेतन देयके तयार केली जातात.   या प्रणालीत सुधारणा करून आता नवीन सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नवीन प्रणालीचा वापर करताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने अमरावतीचे लेखा व कोषागारे सहसंचालक यांनी विभागातील स...

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात कार्यक्रम प्रशासकीय विदेच्या अचूक वापरातून व्यापक लोकहित साधावे - प्रा. संजय खडककार

इमेज
  जिल्हा सांख्यिकी कार्यालयात कार्यक्रम प्रशासकीय विदेच्या अचूक वापरातून व्यापक लोकहित साधावे -         प्रा. संजय खडककार अकोला, दि. २९ : प्रशासकीय विदेचा योजना व धोरणांसाठी वापर करून त्याआधारे व्यापक लोकहित साधणे आवश्यक आहे. त्यासाठी सांख्यिकी विभाग व विदा तज्ज्ञांनी योगदान द्यावे, असे आवाहन तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. संजय खडककार यांनी आज येथे केले. राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त जिल्हा सांख्यिकी कार्यालयात ‘प्रशासकीय विदेच्या (डेटा) संभाव्य क्षमतेचा वापर’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. डॉ. उमेश घोडेस्वार, सांख्यिकी उपायुक्त अरविंद सुने, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती सदानशिव आदी उपस्थित होते. प्रा. खडककार म्हणाले की, प्रशासकीय विदा ही केवळ आकडेवारी नव्हे, तर प्रगतीचे उपाय सुचविणारे साधन आहे. तिचे रूपांतर ज्ञानात व पर्यायाने व्यापक लोकहित साधण्यात व्हावे.   डॉ. घोडेस्वार म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य, वितरण व्यवस्था, महसूल, कृषी अशा कितीतरी क्षेत्रातील विदा प्रशासकीय पातळीवर...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत) मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला हे वसतीगृह समाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत आहे. शैक्षणीक सत्र 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे (गुणवंत) शासकीय वसतिगृह अकोला या वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्ग 11 वी ते 12 वी पर्यंत अकोला या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना टक्केवारी नुसार व शासन निर्णयानुसार वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करावयाचा कालावधी वर्ग 10 वी नंतरच्या अभयासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2026 पर्यंत आहे. http://hmas.mahait.org . वेबसाईट वर भरण्यात यावे. वसतीगृहामध्ये खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत सोयी सुवीधा पुरविण्यात येतात 1) राहण्याची व्यवस्था, 2) नास्ता व भोजनाची तसेच 3) स्टेशनरी भत्ता 4) गणवेश भत्ता (5) मासीक निर्वाह भ...

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेबाबत.

  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेबाबत. अकोला, दि. 25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचेमार्फत सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाकरीता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 14 डिसेंबर 2022 नुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे. सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 10 जुलै 2026 पर्यंत राहील. याची जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीस्तव वर नमुद शासन निर्णय चे अवलोकन करावे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळविले आहे.

विकसित भारत-जी राम जी अधिनियम : ग्रामीण रोजगारनिर्मिती; स्थलांतर कमी होणार

  विकसित भारत-जी राम जी अधिनियम : ग्रामीण रोजगारनिर्मिती; स्थलांतर कमी होणार अकोला, दि. 25 : भारत सरकारने ग्रामीण भारताच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत "विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात विकसित भारत-जी राम जी अधिनियम 2025 (VB G RAMG) हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात 1 जुलै 2026 पासून लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. ग्रामीण विकासाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, 'विकसित भारत 2047' या राष्ट्रीय संकल्पनेवर पूरक अशी आधुनिक, सर्वसमावेशक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि उत्पादकता-केंद्रित ग्रामीण विकास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. दिनांक 30 जून 2026 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 हा बंद होणार असून नवीन कायद्यांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षामध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. या वाढीव रोजगार हमीमुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास, उपजीविकेची सुरक्षितता मजबूत...