पोस्ट्स

कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक - ॲड आकाश फुंडकर

इमेज
  कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक  - ॲड आकाश फुंडकर मुंबई, दि. २: राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना  करण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)  संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात, किरण मोघे आदी उपस्थित होते. यावेळी विविध उद्योग क्षेत्रांतील असंघटित कामगारांच्या प्रश्नांचे पुनरावलोकन, किमान वेतन सल्लागार मंडळाची स्थापना,  कंत्राटी कामगारांचे प्रश्न, समान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, विविध उद्योगांसाठी किमान वेतन निश्चिती, सफाई तसेच घरकामगारांसाठी स्वतंत्र धोरण, तसेच अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.   यावेळी अॅड. फुंडकर यांनी शासन कामगार कल्याणास...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती साडेतीन हजार किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी

  मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती साडेतीन हजार किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्गांच्या दर्जोन्नतीची कामे करण्यात येणार आहेत. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार निश्चित होणाऱ्या खर्चाच्या अधीन राहून सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील. एआयआयबीकडून कडून प्राप्त होणा...

गांधीग्राम येथे पूर्णा घाटाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

इमेज
  गांधीग्राम येथे पूर्णा घाटाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी अकोला, दि. २ : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील घाटाची   आवश्यक दुरूस्ती, तसेच स्वच्छताकामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. ऑगस्ट महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या कावड उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी गांधीग्राम येथील कावड घाट परिसराची पाहणी केली. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राजेश भारती, पप्पू मोरवाल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कावड उत्सवानिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर पुरेशी वीज व्यवस्था, स्वच्छता करावी. घाटावरील तुटलेले हौद त्वरित दुरुस्त करावे. भाविकांना पूर्णेचे पाणी कावडीत सुरक्षितपणे घेण्यासाठी पुरेशा खोलीपर्यंत पायऱ्या असाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प व्यवस्था करावी. ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. घाट परिसरात वाहनतळ व इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे न...

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा घरपोच

इमेज
    हेल्पलाइन १९६२ व चॅटबॉट द्वारे पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण   अकोला, दि. २ : गेल्या पाच वर्षांत , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड , इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. ' मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स ' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून , यामुळे पशुधनाची वेळेवर , सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे. या उपक्रमाच्या यशानंतर , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ' व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा ' सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे , संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्का...

पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला

    पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला         अकोला, दि. १ : येत्या खरीप हंगामामध्ये अल-निनो च्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाचा अंदाज असून मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. 100 मी.मी पाऊस झाल्यानंतरच   पेरणीचे नियोजन करावे , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.                बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे न वापरता स्वतःजवळील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन ब ी जप्रकिया करून बियाणे म्हणून वापर करावा. सोयाबीन पिकाची पेरणी   रुंद वरंबा व सरी पद्धतीने   ( बीबीएफ ) किंवा बेडवर टोकन पद्धतीने केल्यास बियाण्याची बचत होऊन अधिक उत्पादनाची   हमी असते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. ०००

कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ

      कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ अकोला, दि. १ : राज्यात सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्ह्यात कुष्ठरूग्ण शोध मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यातील मागील पाच वर्षांमध्ये एकही कुष्ठरुग्ण आढळून न आलेल्या ५११ गावांमध्ये विशेष घरोघर सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ४ लाख ४ हजार ८६३ लोकसंख्येची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी घरभेटी देत नागरिकांची कुष्ठरोगासंदर्भात तपासणी करीत आहेत. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करून रोगाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.   सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत ४२८ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ४ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. वेळेत निदान व उपचारामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.   या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ...

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

इमेज
  हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द अकोला, दि. १ : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आधार नोंदणीच्या माध्यमातून एका मुकबधीर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश मिळाले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत या बालकाला आज त्यांच्या कुटुंबाच्या सुपुर्द करण्यात आले. याबाबतची हकीकत अशी की, लोहमार्ग चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचा-या दि. ८ एप्रिल रोजी अकोला रेल्वेस्थानकावर एक बालक एकटेच भटकत असताना आढळले. कर्मचा-यांनी त्याची विचारपूस करून त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृहात येथे दाखल केले. बालक मूकबधीर असल्याने पत्ता शोधण्याचे आव्हान होते. बालकल्याण समितीचे सुनील लाडुलकर यांना सुचना केल्यानुसार शासकीय मुकबधीर विद्यालयाच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानुसार संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. तथापि, त्याद्वारे बालकाचा पत्ता कळू शकला नाही.   त्यानंतर आधार क्रमांकाच्या साह्याने पत्त्याचा शोध सुरू झाला. श्री. लाडुलकर यांनी त्या बालकाची आधार नोंदणी केली. त्यांनी 20 दिवस...

जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा

  जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा अकोला, दि. १ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची सभा दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवन येथे आयोजिण्यात आली आहे. सभेच्या विषयसूचीनुसार गत सभेचे इतिवृत्तवाचन व अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेत- सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यांच्या २०२५-२६ च्या खर्चास मान्यता देणे, सन २०२६-२७ या वर्षाचा नियोजन आढावा आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ०००  

पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा

                                    पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा  प्रशासनाचे आवाहन              अकोला, दि. २९ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.              योजनेमध्ये पारदर्शकता आणणे , गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थींपर्यंतच शासनाचे अर्थसाहाय्य पोहचवणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात २० मे २०२६ पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून , गावपातळीवर याबद्दल जनजागृती करण्य...

‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी

  ‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी अकोला, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, नावात चूक दुरूस्ती करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. या अनुषंगाने आपल्या घरी येणारे बीएलओ  हे शासन नियुक्त कर्मचारी असुन त्यांनी विचारलेली माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातर्फे दि. 30 मे ते 2 जून या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण कागदपत्रांसह शिबिराला भेट देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.   नागरिकांकडून घेतली जाणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ती केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच वापरली जाते. तरी बीएलओ यांना ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि कुटुंबाची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे  नागरिकांनी आपली किंवा कुटुंबाची योग्य ...