विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा
विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा - ब्रिजेश सिंह , प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच , १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर ; आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता. आणि आता , ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला , तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा , कुंभाभिषेक , ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती — हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माण...