पोस्ट्स

विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

      विशेष लेख:   भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा -           ब्रिजेश सिंह ,  प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय   भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ,  १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर ;  आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.   आणि आता ,  ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला ,  तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा ,  कुंभाभिषेक ,  ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती — हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माण...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

  ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ अकोला, दि. २५ : _भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतु हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखितांचे ज्ञानभांडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे._ भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे ...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
    एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   • भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश           मुंबई ,  दि. ८ : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे ,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.          मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा  आढावा घेतला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ,  मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी ,  मुख्यमंत्र्यांचे जल -विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे ,  विशेष कार्य अधिकारी प्रिया खान ,  मृद व जलसंधारण आयुक्त अंजली रमेश ,  महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे ...

संशोधन अधिकारी अनिल देव यांचा निवृत्तीनिमित्त गौरव

इमेज
  अकोला, दि. 8 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी अनिल रामदास देव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयातर्फे त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव सोहळा आयोजिण्यात आला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. एन. साळुंके अध्यक्षस्थानी होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (मुलींची) प्राचार्य एस. आर. ठोकरे उपस्थित होते. श्री. देव यांनी कार्यालयीन कामकाजात घेतलेले परिश्रम व विविध उपक्रम राबविण्यात दिलेले योगदान यांचा श्री. साळुंके यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. श्री. ठोकरे यांनीही त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. देव यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांख्यिकी सहायक एन. टी. राखोंडे, मुख्य लिपीक एम. यू. बुटे, किरणताई घोगरे, मनोहर बदरखे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंकज नागे यांनी सूत्रसंचालन केले. बी. बी. सुलताने यांनी आभार मानले. एन. टी. राखोंडे, एम. यू. बुटे, कु. किरण घोगरे, मनोहर बदरखे, भिमराव मोहाडे व संकेत मान...

महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता * अकोल्यातील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन

    महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता * अकोल्यातील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन मुंबई दि. ६ : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून   ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर, जायका आता महाराष्ट्रातही   ¬ ‘मेडिकल केअर सिस्टम ’ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. विशेषतः राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत खालील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष कें...

जिल्ह्यात यंदा तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

  जिल्ह्यात यंदा तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी अकोला, दि. ६ : अकोला जिल्ह्यात २०२६ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला. त्यानुसार रक्षाबंधन (शुक्रवार, २८ ऑगस्ट), ज्येष्ठागौरी पूजन (शुक्रवार, १८ सप्टेंबर) व लक्ष्मीपूजन (दुसरा दिवस- सोमवार, ९ नोव्हेंबर) या तीन दिवशी स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही. ०००

कृषी यांत्रिकीकरण योजनेत बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी अर्ज करावा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 कृषी यांत्रिकीकरण योजनेत  बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी अर्ज करावा   अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन अकोला, दि. ६ : अल-निनो च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये सोयाबीन, तूर, मुंग व उडीद पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी, बियाण्याची बचत व उत्पादन वाढ करण्याच्या हेतूने बी.बी.एफ. पेरणी यंत्र यांचा कृषी यांत्रिकीकरण अभियानातंर्गत समावेश करण्यात आला आहे.  वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट हे याबाबिच्या अनुदानासाठी पात्र राहतील. बी.बी.एफ.पेरणी यंत्र (ट्रॅक्टर ३५ बी.एच.पी. वरील) खरेदीसाठी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /महिला/अल्प/अत्यल्प शेतकरी यांना ५५ हजार रुपये प्रति यंत्र किंवा किमतीच्या ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते व सर्वसाधारण/मोठे शेतकरी यांना ४४ हजार रुपये प्रति यंत्र किंवा किमतीच्या ४० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. याबाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) मार्गदर्शक सूचनांनुसार करावी.  यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी (https://mahadbtmahait.gov.in) या वेबसाईटवर जाऊन ...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत मोठ्या कंपन्यांत कामाचा अनुभव : तरुणांसाठी संधी

    प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत मोठ्या कंपन्यांत कामाचा अनुभव : तरुणांसाठी संधी अकोला, दि. ४ : देशातील तरुणांना मोठ्या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, कौशल्य विकासाला चालना मिळावी आणि रोजगारक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असून दरमहा विद्यावेतन आणि इंटर्नशिपनंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अशी आहे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना? केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरुणांना नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप मिळणार आहे. यामुळे त्यांना कामाचा अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मदत होईल. योजनेचा उद्देश देशात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा आहे. आघाडीच्या कंपन्यांत इंटर्नशिपची संधी देशातील नामांकित व आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादन, ऑटोमोबाईल, आयटी, बँकिंग, वित्त, रिटेल आदी क्षेत्रांमध्ये संधी मिळणार आहे. उद्योगातील प्रत्यक्ष ...

जनगणनेच्या बनावट अर्जापासून सावधान

इमेज
जनगणनेच्या बनावट अर्जापासून सावधान  जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी - नागरिक https:// se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. २. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. #जनगणना२०२७ #Census2027 #SelfEnumeration #IndiaCensus2027