पोस्ट्स

पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो; भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी

  ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अ नेक संधी   अकोला , दि. २४   : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे चा कणा म्हणून समोर येत असून , राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा २.८% , तर कृषी उत्पन्नातील वाटा तब्बल २५.१% इतका मोठा आहे. एकीकडे राज्याची श्रमशक्ती (१५-५९ वयोगट) २०३६ पर्यंत ९.०५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असताना , दुसरीकडे दुग्धव्यवसायातील वाढत्या संधी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सध्या दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे उत्पादन १६.६२ MMT ( ६.७%) इतके असून वार्षिक उत्पादन वाढीचा दर ३.६% असला , तरी भारतीय आरोग्य परिषदेच्या मानकांनुसार प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन ३५८ ग्रॅम दुधाची गरज आहे. सद्यस्थितीत ही उपलब्धता केवळ ३०० ग्रॅम असून , ही ५८ ग्रॅमची तूट भरून काढण्यासाठी राज्यात दुग्धोत्पादनाला ...

खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

इमेज
 खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा  निविष्ठांची उपलब्धता ठेवा; गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करणार जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २४ : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नये, तसेच बोगस बियाणे, खते, किटकनाशक यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी  येथे दिले. खरीप पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिका-यांनी गुरुवारी बैठकीद्वारे घेतला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. तुषार जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  बियाणे विक्रीत कुठेही गैरप्रकार घडता कामा नये. त्यासाठी कृषी भरारी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. बियाण्याची गुणवत्ता, बियाणे व इतर निविष्ठा उपलब्धता यादृष्टीने परिपूर्ण नियोजन व्हावे, असेही निर्देश त्यांनी दिले. अकोला जिल्ह्यात खरीपासाठी २०२५ या वर्षात ४ लक्ष ३१ हजार ८८४ हे. क्षेत्र होते. आगामी हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ लक्ष ३७ हजार १०० हे. आहे. येत्या खर...

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

  ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान अकोला, दि. २४ : जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणूक होणा-या ग्रामपंचायतींत अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई, करतवाडी अकोट, करतवाडी रेल्वे, मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव, वाईमाना, अकोला तालुक्यातील सांगवी मोहाडी, रामगाव, सोनाळा, येवता, बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना, उजळेश्वर, निंबी बु., राजनखेड, पातूर तालुक्यातील तुलंगा खु., बाभुळगाव आदी गावांचा समावेश आहे. ०००००००

आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ

  आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ अकोला, दि. २३ :   देशभरात राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची सुरूवात होत असून, पहिला टप्प्यात स्वगणना १ मे   ते १५ मे दरम्यान होणार आहे. स्वगणनेद्वारे नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात. अधिकाधिक नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.             स्वगणनेची सुविधेमुळे नागरिकांना स्वत: माहिती भरता येणे शक्य आहे. प्रत्यक्ष घर गणना प्रगणकाद्वारे१६ मे   ते १४ जून दरम्यान होणार आहे.       स्व-गणना प्रक्रिया ऑनलाईन नोंदणीचे टप्पे: https://se.census.gov.in   या अधिकृत पोर्टलवर जा. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करा. आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडा. गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करा. विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. माहितीची खात्री करून 'फायनल सबमिशन' करा. त्या...

अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा · अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल

  अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा ·          अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल    महामंडळाने अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून ,  लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन    अण्णासाहेब   पाटील   आर्थिक   मागास   विकास   महामंडळाचे व्यवस्थापकीय   संचालक   विजयसिंह देशमु ख   यांनी केले आहे.          महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी   www.udyog. mahaswayam.gov.in   हे संकेतस्थळ कार्यान्वित असून ,  महामंडळाची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्यामुळे लाभार्थ्यांना...

पनीर खाताय? ते दुधाचे आहे का ते तपासा

  पनीर खाताय? ते दुधाचे आहे का ते तपासा अकोला, दि. २२ : काही उपाहारगृहे, खाद्यगृहे आदी आस्थापनांत पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग प्रकारातील पदार्थ दिला जाऊ शकतो. पनीर दुधाचे आहे का ते तपासणे आवश्यक आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जाहिरात व जनजागृती यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदा असून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भय व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्ट नसून पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. पनीर व चीज अॅनालॉगमध्ये मूलभूत फरक : अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अॅडिटिव्ह नियम), २०११ मधील नियम २.१.११ नुसार "पनीर" हे केवळ दुधापासून बनविलेले पदार्थ आहे. परंतु "चीज अॅनालॉग" हा दूध व्यतिरिक्त...

'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश

  ' एल-निनो 'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क ' जिल्हा चारा सुरक्षा आराखडा ' तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश   भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार , २०२६ च्या मान्सूनवर ' एल-निनो ' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. ' एल-निनो ' मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ' जिल्हा नियोजन व विकास समिती ' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता , मका , ज्वारी , बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) , अकोला यांना तात...

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान शासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण

इमेज
    राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान शासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण अकोला, दि. २१ :   राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत शासकीय कर्मचारी या गटात गव्हर्नमेंट ॲसेट मॅपिंगकरिता प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलसेवक ऋषिकेश आंग्रे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज प्रदान करण्यात आला. नागरी सेवा दिन   2026   आणि   ‘ राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा   2025-26’   अंतर्गत पारितोषिक वितरण सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. कौशल्य ,   रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ,   मुख्य सचिव राजेश अग्रवाल ,   सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते. ई-भूमिती हा एक अभिनव जीआयएस-आधारित डिजिटल उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्याच्या निर्मिती व अंमलबजावणीत श्री. आंग्रे या...