पोस्ट्स

जलयुक्त शिवार अभियान २.० पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधा-याचे भूमिपूजन ग्रा. पं. कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

इमेज
   जलयुक्त शिवार अभियान २.० पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधा-याचे भूमिपूजन ग्रा. पं. कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण अकोला, दि. १ : जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधा-यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे कोल्हापुरी पद्धत बंधा-याचे भूमिपूजन, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर आदी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान शासकीय यंत्रणा व ग्रामस्थ, शेतकरी यांच्या समन्वयाने राबविले जात असून, महाराष्ट्राला शाश्वत सिंचनाकडे नेणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. बंधा-यामुळे गावात पाणी उपलब्धता वाढून पेयजलाबरोबरच सिंचनासाठीही लाभ होणार आहे. क...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन; पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल . पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
  महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन; पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल . पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर महाराष्ट्रात व्यापक विकासाचे पर्व सुरू अकोला, दि. १ : 'विकसित भारत २०४७'च्या ध्येयाला जोडून घेत महाराष्ट्र राज्य अनेक लोककल्याणकारी योजना आणि ठोस निर्णयांच्या माध्यमातून व्यापक प्रगतीकडे दमदार पावले टाकत आहे. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.   महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे झाला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, राष्ट्रध्वज वंदन, पथसंचलन, चित्ररथ प्रदर्शन आदी कार्यक्रम झाला. आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार वसंतराव खोटरे, प्र. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांड...

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. २८ : राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील बृहन्मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शासकीय जमिनींवरील ०१ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वीची निवासी अतिक्रमणे काही विशिष्ट अटी व शर्तीवर नियमित करण्यात येणार आहेत.   निर्णयाची ठळक वैशिष्ट्येः   पात्रताः ज्या नागरिकांनी ०१ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर केवळ निवासासाठी अतिक्रमण केले आहे आणि जे सध्या तिथे वास्तव्यास आहेत, अशीच अतिक्रमणे नियमित केली जातील.   क्षेत्रफळ व शुल्कः ५०० चौ. फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित केले जाईल.   ५०० ते १५०० चौ. फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी पहिल्या ५०० चौ. फुटांनंतरच्या अतिरिक्त क्षेत्रावर प्रचलित बाजारमूल्याच्या १०% रक्कम आकारली जाईल.   १५०० चौ. फु...

जनगणना 2027 प्रगणकांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

  जनगणना 2027 प्रगणकांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन   अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान 'स्व-गणना' व त्यानंतर प्रगणकांमार्फत दि. 16 मे ते 14 जूनदरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. प्रगणकांना अचूक माहिती सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, "जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. आपल्या एका अचूक माहितीवर पुढील 10 वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच स्व-गणना म्हणजे नागरिक स्वतः मोबाईल‌द्वारे माहिती भरू शकतात. दिनांक 1 ते 15 मे 2026 दरम्यान https://se.census.gov.in या वेबसाईटवर माहिती भरावी. ज्यांनी स्व-गणना केली नसेल तरीसुध्दा त्यांच्या घरी शासनाचा अधिकृत प्रगणक येईल. नागरिकांना विनंती करण्यात येते की, घरी येणाऱ्या प्रगणकाकडे शासनाचे ओळखपत्र व नियुक्ती पत्र असेल. ते खात्री करूनच माहिती द्यावी, कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव...

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवाव्यात  -निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे अकोला, दि. २८ : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वाटचाल व्हावी. नागरिकांना सेवा पुरविताना विहित कालमर्यादेचे पालन व्हावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी आज येथे केले. लोकसेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, अधिक्षक श्याम धनमने, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ आदी उपस्थित होते.   यावेळी विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याची लोकसेवा हक्क शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली. पारदर्शकता, तत्परता व लोकाभिमुखता ही त्रिसुत्री आपल्या कामात अवलंबवावी, असे...

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापनादिन मुख्य शासकीय समारंभ शास्त्री क्रीडांगणावर

  महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापनादिन मुख्य शासकीय समारंभ शास्त्री क्रीडांगणावर अकोला, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापनादिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.१० वा. ध्वजवंदन समारंभ होईल. मुख्य शासकीय समारंभाच्या अनुषंगाने शास्त्री क्रीडांगणाची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट आदी कामे तत्काळ पूर्ण करावीत. पथसंचलनाच्या सरावाच्या दृष्टीने मैदान परिसर सुस्थितीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीद्वारे संबंधित यंत्रणाप्रमुखांना दिले. पथसंचलन तयारी, पेयजल, आरोग्य पथक, रूग्णवाहिका, चित्ररथ आदी सुविधा व तयारीच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आले. ०००  

पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो; भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी

  ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अ नेक संधी   अकोला , दि. २४   : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे चा कणा म्हणून समोर येत असून , राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा २.८% , तर कृषी उत्पन्नातील वाटा तब्बल २५.१% इतका मोठा आहे. एकीकडे राज्याची श्रमशक्ती (१५-५९ वयोगट) २०३६ पर्यंत ९.०५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असताना , दुसरीकडे दुग्धव्यवसायातील वाढत्या संधी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सध्या दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे उत्पादन १६.६२ MMT ( ६.७%) इतके असून वार्षिक उत्पादन वाढीचा दर ३.६% असला , तरी भारतीय आरोग्य परिषदेच्या मानकांनुसार प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन ३५८ ग्रॅम दुधाची गरज आहे. सद्यस्थितीत ही उपलब्धता केवळ ३०० ग्रॅम असून , ही ५८ ग्रॅमची तूट भरून काढण्यासाठी राज्यात दुग्धोत्पादनाला ...