पोस्ट्स

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. २८ : राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील बृहन्मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शासकीय जमिनींवरील ०१ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वीची निवासी अतिक्रमणे काही विशिष्ट अटी व शर्तीवर नियमित करण्यात येणार आहेत.   निर्णयाची ठळक वैशिष्ट्येः   पात्रताः ज्या नागरिकांनी ०१ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर केवळ निवासासाठी अतिक्रमण केले आहे आणि जे सध्या तिथे वास्तव्यास आहेत, अशीच अतिक्रमणे नियमित केली जातील.   क्षेत्रफळ व शुल्कः ५०० चौ. फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित केले जाईल.   ५०० ते १५०० चौ. फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी पहिल्या ५०० चौ. फुटांनंतरच्या अतिरिक्त क्षेत्रावर प्रचलित बाजारमूल्याच्या १०% रक्कम आकारली जाईल.   १५०० चौ. फु...

जनगणना 2027 प्रगणकांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

  जनगणना 2027 प्रगणकांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन   अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान 'स्व-गणना' व त्यानंतर प्रगणकांमार्फत दि. 16 मे ते 14 जूनदरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. प्रगणकांना अचूक माहिती सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, "जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. आपल्या एका अचूक माहितीवर पुढील 10 वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच स्व-गणना म्हणजे नागरिक स्वतः मोबाईल‌द्वारे माहिती भरू शकतात. दिनांक 1 ते 15 मे 2026 दरम्यान https://se.census.gov.in या वेबसाईटवर माहिती भरावी. ज्यांनी स्व-गणना केली नसेल तरीसुध्दा त्यांच्या घरी शासनाचा अधिकृत प्रगणक येईल. नागरिकांना विनंती करण्यात येते की, घरी येणाऱ्या प्रगणकाकडे शासनाचे ओळखपत्र व नियुक्ती पत्र असेल. ते खात्री करूनच माहिती द्यावी, कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव...

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवाव्यात  -निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे अकोला, दि. २८ : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वाटचाल व्हावी. नागरिकांना सेवा पुरविताना विहित कालमर्यादेचे पालन व्हावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी आज येथे केले. लोकसेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, अधिक्षक श्याम धनमने, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ आदी उपस्थित होते.   यावेळी विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याची लोकसेवा हक्क शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली. पारदर्शकता, तत्परता व लोकाभिमुखता ही त्रिसुत्री आपल्या कामात अवलंबवावी, असे...

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापनादिन मुख्य शासकीय समारंभ शास्त्री क्रीडांगणावर

  महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापनादिन मुख्य शासकीय समारंभ शास्त्री क्रीडांगणावर अकोला, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापनादिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.१० वा. ध्वजवंदन समारंभ होईल. मुख्य शासकीय समारंभाच्या अनुषंगाने शास्त्री क्रीडांगणाची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट आदी कामे तत्काळ पूर्ण करावीत. पथसंचलनाच्या सरावाच्या दृष्टीने मैदान परिसर सुस्थितीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीद्वारे संबंधित यंत्रणाप्रमुखांना दिले. पथसंचलन तयारी, पेयजल, आरोग्य पथक, रूग्णवाहिका, चित्ररथ आदी सुविधा व तयारीच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आले. ०००  

पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो; भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी

  ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अ नेक संधी   अकोला , दि. २४   : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे चा कणा म्हणून समोर येत असून , राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा २.८% , तर कृषी उत्पन्नातील वाटा तब्बल २५.१% इतका मोठा आहे. एकीकडे राज्याची श्रमशक्ती (१५-५९ वयोगट) २०३६ पर्यंत ९.०५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असताना , दुसरीकडे दुग्धव्यवसायातील वाढत्या संधी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची ' मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ' ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सध्या दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे उत्पादन १६.६२ MMT ( ६.७%) इतके असून वार्षिक उत्पादन वाढीचा दर ३.६% असला , तरी भारतीय आरोग्य परिषदेच्या मानकांनुसार प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन ३५८ ग्रॅम दुधाची गरज आहे. सद्यस्थितीत ही उपलब्धता केवळ ३०० ग्रॅम असून , ही ५८ ग्रॅमची तूट भरून काढण्यासाठी राज्यात दुग्धोत्पादनाला ...

खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

इमेज
 खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा  निविष्ठांची उपलब्धता ठेवा; गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करणार जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २४ : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नये, तसेच बोगस बियाणे, खते, किटकनाशक यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी  येथे दिले. खरीप पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिका-यांनी गुरुवारी बैठकीद्वारे घेतला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. तुषार जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  बियाणे विक्रीत कुठेही गैरप्रकार घडता कामा नये. त्यासाठी कृषी भरारी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. बियाण्याची गुणवत्ता, बियाणे व इतर निविष्ठा उपलब्धता यादृष्टीने परिपूर्ण नियोजन व्हावे, असेही निर्देश त्यांनी दिले. अकोला जिल्ह्यात खरीपासाठी २०२५ या वर्षात ४ लक्ष ३१ हजार ८८४ हे. क्षेत्र होते. आगामी हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ लक्ष ३७ हजार १०० हे. आहे. येत्या खर...

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

  ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान अकोला, दि. २४ : जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणूक होणा-या ग्रामपंचायतींत अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई, करतवाडी अकोट, करतवाडी रेल्वे, मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव, वाईमाना, अकोला तालुक्यातील सांगवी मोहाडी, रामगाव, सोनाळा, येवता, बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना, उजळेश्वर, निंबी बु., राजनखेड, पातूर तालुक्यातील तुलंगा खु., बाभुळगाव आदी गावांचा समावेश आहे. ०००००००

आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ

  आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ अकोला, दि. २३ :   देशभरात राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची सुरूवात होत असून, पहिला टप्प्यात स्वगणना १ मे   ते १५ मे दरम्यान होणार आहे. स्वगणनेद्वारे नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात. अधिकाधिक नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.             स्वगणनेची सुविधेमुळे नागरिकांना स्वत: माहिती भरता येणे शक्य आहे. प्रत्यक्ष घर गणना प्रगणकाद्वारे१६ मे   ते १४ जून दरम्यान होणार आहे.       स्व-गणना प्रक्रिया ऑनलाईन नोंदणीचे टप्पे: https://se.census.gov.in   या अधिकृत पोर्टलवर जा. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करा. आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडा. गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करा. विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. माहितीची खात्री करून 'फायनल सबमिशन' करा. त्या...

अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा · अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल

  अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा ·          अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल    महामंडळाने अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून ,  लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन    अण्णासाहेब   पाटील   आर्थिक   मागास   विकास   महामंडळाचे व्यवस्थापकीय   संचालक   विजयसिंह देशमु ख   यांनी केले आहे.          महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी   www.udyog. mahaswayam.gov.in   हे संकेतस्थळ कार्यान्वित असून ,  महामंडळाची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्यामुळे लाभार्थ्यांना...