पोस्ट्स

जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण जिल्ह्यात १०० टक्के घरगणना पूर्ण

 जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण जिल्ह्यात १०० टक्के घरगणना पूर्ण अकोला, दि. १२ : राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने   घरगणनेचा टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्यात  घरगणनेचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.  प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात घरगणनेची प्रक्रिया परिपूर्ण नियोजन, जलद गतीने व समन्वय ठेवून  राबविण्यात आली. जिल्ह्यात १४ चार्ज अधिका-यांच्या नेतृत्वात गावोगाव प्रगणक (गणक) कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एकुण २ हजार ३९९ घरगटांचे काम मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर पुर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, घरात उपलब्ध असलेल्या सुविधा (उदा. पिण्याचे पाणी, वीज, शौचालय) आणि मालमत्ता यांची नोंद मोबाईल ॲपद्वारे (डिजिटल पद्धतीने) करण्यात आली.  कुलूपबंद घरे किंवा काही अडचणींमुळे राहिलेल्या घरांचे सर्वेक्षण फेरतपासणी करून पूर्ण करण्यात आले. उन्हातान्हात फिरून कर्मचा-यांनी माहितीचे संकलन केले व जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सर्व चार्ज अधिकारी व जिल्ह...

गावपातळीवर निर्माण होणार गोदामे कार्यवाहीला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

इमेज
    जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना गावपातळीवर निर्माण होणार गोदामे कार्यवाहीला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. १२ : सहकार व महसूल विभागामार्फत 'गाव तिथे गोदाम' आणि 'जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना' अंतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गावपातळीवर गोदाम बांधकामासाठी   शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संस्थांचे प्रस्ताव, जागेचा शोध व इतर कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा उपनिबंधक हितेशचंद्र साबळे, उपजिल्हाधिकारी निखील खेमनार, अभय कटके व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की,   जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना व 'गाव तिथे गोदाम' उपक्रमाद्वारे गावातच सुरक्षित धान्य साठवणूक व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी सहकार विभागाने संस्थांचे प्राप्त प्रस्ताव तपासून अचूक व परिपूर्ण...

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य संवर्धनासाठी अभियानाद्वारे महत्वाचे कार्य - खासदार अनुप धोत्रे

इमेज
  ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य संवर्धनासाठी अभियानाद्वारे महत्वाचे कार्य   -         खासदार अनुप धोत्रे अकोला, दि. १२ : निरामय आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता, पोषण आणि जनजागृती यांचा समन्वय साधत गावोगावी आरोग्यक्रांती घडवण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे व्यक्त केला. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन खासदार श्री. धोत्रे यांच्या हस्ते जि. प. कर्मचारीभवन संविधान सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे आदी उपस्थित होते.   जिल्ह्यात सध्या ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७६ आरोग्य उपकेंद्रे   कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालये व सामुदायिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून गावपातळीवर विविध आरो...

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक   मुंबई , दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता , सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला , ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी ( नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड ) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.      या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून आज अखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी , असे आवाहन करण्यात आले आहे.   प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्...

चला, पाल्यांना मराठी शाळेत घालू या! जि.प.च्या शाळांना प्रवेशासाठीनिवडूया !

इमेज
 विशेष लेख   चला, पाल्यांना मराठी शाळेत घालू या!   जि.प.च्या शाळांना प्रवेशासाठीनिवडूया !      जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी एक मराठी माणूस, एक जबाबदार पालक आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणारा नागरिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे – "आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश का देऊ नये?"     आज आपल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम शिक्षक, आधुनिक सुविधा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहेत. याला आणखी उंचीवर पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे तो पालकांचा विश्वास ! आणि पालक म्हणून आपला सक्रिय सहभाग ! केवळ अफवा आणि यंत्रणेसंदर्भातील नकारात्मक दृष्टिकोन यामुळे ग्रामीण भागातील कमी खर्चाची, योग्य गुणवत्तेची आणि संस्कार करणारी एक यंत्रणा आम्ही कमकुवत तर करत नाही ना ? हा प्रश्न एकदा स्वत...

जिल्हाधिका-यांची तेल्हारा येथे भेट विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा

इमेज
 जिल्हाधिका-यांची तेल्हारा येथे भेट  विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा अकोला, दि. ११ : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सजग राहून प्रत्येक तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. मान्सूनच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची वेळीच पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. जिल्हाधिका-यांनी आज तेल्हारा येथे भेट देऊन विविध यंत्रणांचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार महेश रामगुंडे, कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपअभियंता श्री. भांगडिया यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दौ-यात मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. त्यांनी वाण प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची क्षमता, उपलब्ध पाणी साठा, दरवाजे खुले करण्याची प्रक्रिया व कॅचमेंट एरिया आदी विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली. कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे उपस्थित होते. तेथील रेल्वेच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली. तहसील कार्यालय येथे भेट देऊन त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला व अधिका-यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे...

संविधानभवनमध्ये आज ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ जिल्हास्तरीय मेळावा

    संविधानभवनमध्ये आज ‘ माझं गाव , आरोग्यसंपन्न गाव’ जिल्हास्तरीय मेळावा अकोला, दि. ११ : ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘ माझं गाव , आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अकोला जिल्हास्तरीय मेळावा उद्या (१२ जून) सकाळी ११ वा. संविधानभवन येथे होणार आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर मेळाव्याला उपस्थित राहतील. मेळाव्यात अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, विविध विभागांची भूमिका, जिल्हास्तरीय अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, माता व बाल आरोग्य पोषण, स्वच्छता, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार यावर अभियानाद्वारे भर दिला जात आहे. या अभियानात विविध शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केले आहे. ०००

अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना यंत्र, अवजारांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

  अनु . जाती व अनु. जमाती च्या शेतकऱ्यां साठी योजना यंत्र, अवजारांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन अकोला, दि. ११ : राज्यात केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ,राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प या योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविल्या जात आहेत .   महाडीबीटी प्रणालीवर ट्रँक्टर चलित औजारे,पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र औजारे,पिक संरक्षण साधने मनुष्य व बैल चलित औजारे,प्रक्रिया युनिट.भाडे तत्वावर कृषि यंत्र व   औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी ( CHC ) औजारे   बँक,ईतर यंत्र सामुग्री करिता 50 टक्के अनुदान मर्यादा व मार्गदर्शक सुच ने नुसार जे कमी असेल ते या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी   ( https://mahadbtmahait.gov.in ) या वेबसाईटवर जाऊन अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   महाडीबीटी पोर्टलवरील लाभार्थी निवड सोडत लॉटरी ऐवजी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य निवड लागू राहील असे आवाहन डॉ.मुरली इंगळे,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला ...

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

इमेज
  मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* • *राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार* • *एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी* क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्...

बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. ११ : बालकांचे हक्क सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, तसेच महिला व बालविकास विभागाने केले आहे. दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात "जागतिक बालमजुरी विरोधी दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट बालमजुरीचे निर्मूलन करणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच त्यांना शिक्षण, आरोग्य व सुरक्षित बालपणाचा अधिकार मिळवून देणे हे आहे. बालमजुरी ही एक गंभीर सामाजिक समस्या असून ती बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व शैक्षणिक विकासाला बाधा आणते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा, खेळण्याचा, सुरक्षित वातावरणात वाढण्याचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे 18 वर्षांखालील बालकांकडून कोणत्याही प्रकारची मजुरी करून घेणे हे कायद्याने दंडनीय आहे.   या निमित्ताने सर्व नागरिक, पालक, व्यावसायिक, संस्था व सामाजिक संघटनांनी बालमजु...