पोस्ट्स

पंतप्रधान यशस्वी यांच्या नेतृत्वाखाली "ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण

  पंतप्रधान यशस्वी यांच्या नेतृत्वाखाली "ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण भारत सरकार सामाजिक न्याय विभागामार्फत इयत्ता ९ वी ते ११ वी वर्गात शिकणा-या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकुण २.५ लक्ष पेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ( https://scholarships.gov.in ) भरण्याबाबत सुचना देण्यात याव्यात. असे निर्देश प्राप्त आहेत. अकोला जिल्ह्यातील २०१ शाळांची व ८७ कनिष्ठ महाविद्यालय निवड करण्यात आली असुन ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी PM यशस्वी Top Class Education in School शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी ते १० वी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५०००/- तर ११ वी च्या विद्यार्थ्यांना १२५०००/- आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृ...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस नियमावलीत मोठे बदल; नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार

  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस नियमावलीत मोठे बदल; नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार अकोला, २४  : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्कूल बस नियमावलीमध्ये सुधारणा करत 'महाराष्ट्र मोटार व्हिईकल्स (स्कूल बस करिता विनियम), २०२६ पहिली सुधारणा' लागू केली आहे. या नवीन नियमांचे पालन करणे सर्व शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांसाठी बंधनकारक करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत याची पूर्तता न केल्यास वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल, असा इशारा अकोला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. शाळेत 'शालेय वाहतूक समिती' स्थापन करणे अनिवार्य नवीन नियमांनुसार प्रत्येक शाळेमध्ये 'शालेय वाहतूक समिती' स्थापन करावी लागणार आहे. ही समिती आर.टी.ओ.ने निश्चित केलेल्या दरानुसार स्कूल बस आणि व्हॅनचे भाडे तपासणे, पालकांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि प्रत्येक तिमाहीचा अहवाल जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीला सादर करण्याचे काम करेल. स्कूल बस आणि व्हॅनचे भाडेदर प्रति विद्यार्थी प्रति किलोमीटर याप्रमाणे प्रादेशिक पर...

जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) – २५ जुलै

 जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) – २५ जुलै "पालकत्वाचा प्रवास प्रत्येकासाठी सारखा नसतो; पण आशा, विज्ञान आणि योग्य उपचार यांच्या मदतीने अनेकांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात." दरवर्षी २५ जुलै रोजी जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) साजरा केला जातो. १९७८ साली जगातील पहिले आयव्हीएफ (In Vitro Fertilization – IVF) बाळ जन्माला आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे लाखो निःसंतान जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश वंध्यत्वाबाबत समाजामध्ये योग्य जनजागृती निर्माण करणे. वंध्यत्वाशी संबंधित गैरसमज, अंधश्रद्धा आणि सामाजिक कलंक दूर करणे. वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या व्यक्ती व जोडप्यांना मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार देणे. आयव्हीएफ (IVF), आययूआय (IUI) यांसारख्या आधुनिक प्रजनन उपचारांबाबत विश्वासार्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. वेळेवर तपासणी आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करणे. वंध्यत्व किती सामान्य आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, जगभरातील प्रत्येक ६ पैकी १ व...

‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

इमेज
 ‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर   सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे २४ जुलै रोजी अकोला येथे विशेष भक्तिसंगीत कार्यक्रम; आषाढी एकादशीनिमित्त अभंग, भक्तिगीते आणि वारकरी परंपरेचा भावस्पर्शी आविष्कार  अकोला दि. 22 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘गजर माऊलीचा ’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. वारकरी संप्रदायाची अखंड भक्तिपरंपरा, संतांच्या अभंगांचे आध्यात्मिक चिंतन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून भक्तिभाव जागविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या विचारांचा आणि विठ्ठलभक्तीच्या समृद्ध वारशाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध श्री विठ्ठलाचे निशिंह भक्त अनेकांना व्यसनमुक्त क...

लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी

  लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी   अकोला दि. 22  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन दि. ३ ऑगस्ट, रोजी सकाळी ११ वाजता  जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्ष तिसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिस- या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरीकांना तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करता येतो. अर्जासोबत तहसिलदार यांचे आदेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे.   दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. संबंधितांनी अर्ज करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. --

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन अकोला दि. 22 : मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही योजना मच्छीमार, मत्स्यपालक, शेतकरी आणि संबंधित उद्योजकांना आर्थिक, तांत्रिक व संरचनात्मक सहाय्य प्रदान करणारी सर्वसमावेशक योजना आहे. याबाबत दि.९ मार्च २०२६ रोजी या संदर्भात शासन निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच मच्छिमारांना योजनेतील विविध घटकाद्वारे अनुदान दिले जाणार आहे. "विकसित महाराष्ट्र २०४७" चे ध्येय गाठण्यासाठी सदर योजना मैलाचा दगड ठरणार आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हा स्तरीय योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसेच ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील मत्स्यपालक, मच्छीमार व इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, दुसरा मजला, भूविकास बँक, जुने पोलीस अ...

रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण

इमेज
  रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण अकोला, दि. २२ जुलै  : जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल विकास भवन, अकोला येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र राज्य  रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अनंत केदारे, अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती यांच्या हस्ते झाले. यावेळी समिती सदस्य  महेन्द्र कवीश्वर,  सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, नागेश देशपांडे, कौशल्य विकास अधिकारी, श्रीमती पूनम रजाने, कौशल्य विकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रफुल्ल शेळके सहाय्यक आयुक्त, संचालन श्रीमती सोनाली भो...

माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
  माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश अकोला, दि. २२  : माय भारत पोर्टल वरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले.   जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  मेरा युवा भारत केंद्र (MY Bharat Kendra), अकोला जिल्हा सल्लागार समितीची बैठक सोमवारी झाली त्यावेळी त्या बोलत  होत्या. बैठकीत  जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे  यांनी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मेरा युवा भारतचे प्रमुख उपक्रम, युवकांसाठी उपलब्ध विविध संधी, मेरा युवा भारत ( mybharat.gov.in ) पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियानाची रूपरेषा तसेच आगामी जिल्हास्तरीय कृती आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस डॉ. ए. एल. कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, श्री. दिगंबर लोखंडे, अतिरिक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, डॉ. एस. आर. कोहचळे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. एस. एस. हाडोळे, जिल्हा सम...

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जि...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन अकोला, दि.२२ : महाराष्ट्र राज्याचे  दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्याम धनमने यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००