पोस्ट्स

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून आढावा यंत्रणांनी संवेदनशीलतेने कार्य करावे - आयोग अध्यक्ष संजय पुराणिक

    राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा कडून आढावा यंत्रणांनी संवेदनशीलतेने कार्य करावे - आयोग अध्यक्ष संजय पुराणिक अकोला , दि. 9 : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी. बालकांच्या सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्व य आणि संवेदनशीलतेने कार्य करावे , असे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क   आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी आज येथे दिले.   महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगा च्या सदस्यांच्या उपस्थितीत बालगृहातील सोयी सु वि धांची पाहणी , संबंधित सुनावण्या, यंत्रणांचा आढावा आदी विविध कार्यक्रम झाले. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयात   आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना , जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश दी नानाथ दाभाडे , आयोगाचे सदस्य अतुल देसाई , प्रवीण भुजाडे व श्रीमती गी तांजली बुटी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.   यावेळी बैठकीत आयोगाने बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध शासकीय यंत्रणांनी मागील तीन वर्ष...

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून आढावा ; यंत्रणांनी संवेदनशीलतेने कार्य करावे - आयोग अध्यक्ष संजय पुराणिक

इमेज
  राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून आढावा यंत्रणांनी संवेदनशीलतेने कार्य करावे                                    - आयोग अध्यक्ष संजय पुराणिक   अकोला, दि. 9 : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी. बालकांच्या सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी आज येथे दिले.   महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांच्या उपस्थितीत बालगृहातील सोयी सुविधांची पाहणी, संबंधित सुनावण्या, यंत्रणांचा आढावा आदी विविध कार्यक्रम झाले. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयात   आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश दीनानाथ दाभाडे, आयोगाचे सदस्य अतुल देसाई, प्रवीण भुजाडे व श्रीमती गीतांज...

'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार

 'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार अकोला, दि. 9: श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दात्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली असून नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टर आपल्या दारी    या उपक्...

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाचे आवाहन

  शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाचे आवाहन   अकोला, दि. ९ : नागरिकांना अन्न व पोषण सुरक्षा पुरविण्याक रि ता रास्त दरात पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंमलात आहे. शिधापत्रिकेसोबत आरसीएमएस पोर्टलमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांचे आधारकार्ड संलग्न करण्यात येत असून, संगणकीकरण प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आले आहे. धान्याचा लाभ गोरगरीब, गरजू पात्र लाभार्थ्यांना दरमहा मिळावा व कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी रेशनकार्डचे ऑनलाईन काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.   केंद्र शासन व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना-2013 अंतर्गत या जिल्हयामध्ये पात्र अंत्योदय रेशनकार्ड कुंटुंब आणि पात्र लाभार्थी पीएचएच रेशनकार्ड लाभार्थी यांना दरमहा प्रत्येक गावातील स्वस्त रास्तभाव दुकानांमार्फत ई पॉस म शिनमध्ये बोटाचे ठसे अद्ययावत करूनच, धान्याचे वितरण/वाटप मोफत होत आहे.   रेशनचे धान्य पात्र लाभार्थी नागरीकांनांच मिळावे, धान्याचे वाटप / वितरणामध्ये सुसूत्रितपणा येण्य...

#भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह

इमेज
  #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स येत्या १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ अकोला, दि. ०८ : उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अभिजित काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. १२ वी नंतर व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. संकेतस्थळावरील तांत्रिक समस्या आणि ओटीपी पडताळणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण व्हावेत, यासाठी महाआयटीच्या प्रकल्प व्यवस्थापक...

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. ८ सप्टेंबर, २०२६. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) • खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द.  (शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग) • सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी "प्रगती (PRAGATI - Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)" प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग) • ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना भांडवली अनुदान देण्यास मंजुरी. (वस्त्रोद्योग विभाग) • सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग) • मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या...

रोजगार महाकुंभ : कौशल्य विकास, रोजगार विभागाचा भव्य उपक्रम जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळावे; शेकडो पदांची भरती

    रोजगार महाकुंभ : कौशल्य विकास, रोजगार विभागाचा भव्य उपक्रम जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळावे; शेकडो पदांची भरती अकोला , दि. ८ : कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभा गातर्फे ‘ रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र ’ दि. २९ सप्टेंबर ला होणार असून, जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांबरोबरच स्थानिक उद्योगांच्या समावेशासह होणा-या या मेळाव्यांमध्ये शेकडो पदांची भरती होणार आहे.     या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, नोंदणी करणाऱ्या उमेदवारांचे पूर्व प्रशिक्षण , व मुलाखतीची तयारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत क रून घे ण्यात येणार आहे. अकोला येथे अकोला इंडस्ट्री असोसिएशन हॉल ,(औद्योगिक वसाहत), शंकरलाल खंडेलवाल कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय , श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय , गौरक्षण रस्त्यावरील दि प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे मेळावा होईल. त्याचप्रमाणे, मूर्तिजापूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , पातूर तालुक्यातील आलेगाव येथे रसिकला...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद अमरावतीत १७ सप्टेंबरला भेट

इमेज
  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद   ·           सहा विभागांना याच महिन्यात भेटी ·           विद्यार्थी ,   उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद   अमरावतीत १७ सप्टेंबरला भेट             अकोला ,   दि. ८ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित ,   पारदर्शक ,   विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.              या भेटीदरम्यान विद्यार्थी ,   स्पर्धा परीक्षा उमेदवार ,   पालक ,   शिक्षक ,   शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट...

सामाजिक न्याय विभागाकडून आवाहन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘महाडीबीटी २.०’ वर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू

  सामाजिक न्याय विभागाकडून आवाहन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘महाडीबीटी २.०’ वर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू अकोला, दि. ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 'महाडीबीटी २.०' (MahaDBT 2.0) या नवीन पोर्टलवर अधिकृतपणे सुरू झाली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने सर्व विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांनी अर्जात अचूक माहिती भरावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्ज https://mahadbt2.maharashtra. gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे समाजकल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना : सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन 'महाआयडी' तयार करणे बंधनकारक आहे. मागील वर्षाचे आयडी व पासवर्ड आता चालणार नाहीत. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाचा वापर करून नोंदणी करावी...