पोस्ट्स

विशेष लेख जलसंधारण : काळाची गरज

इमेज
जलसंधारण : काळाची गरज  राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा जलसंधारण दिन त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे. या जलसंधारण अभियानाच्या निमित्ताने जलसंधारणाच्या विविध उपाययोजनाविषयी माहिती देणारा हा लेख....  कमी पाण्यामध्ये जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांमध्ये तसेच उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. त्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर केला जाऊ शकतो व कमी पाण्यात बहारदार शेतीचा प्रयोग करता येऊ शकतो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपाययोजनांचा कल्पकतेनं वापर केला पाहिजे.  मृद व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात. ज्...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत मुंबई,दि.१८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होत आहेत. त्यामुळे किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस निकामी झालेल्या अनेक रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली आहे. मात्र, अशा शस्त्रक्रियांसाठी खाजगी रूग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मुख्यमं...

अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा ; रिक्त पदे तातडीने भरा ; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा रिक्त पदे तातडीने भरा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अकोला, दि. १९ : अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असून, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यावर भर द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने आज येथे दिले. त्याचप्रमाणे, रिक्त पदांची भरती तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. समितीचे सदस्य आमदार सर्वश्री. जगन्नाथ अभ्यंकर, डॉ.अशोक माने, संजय मेश्राम, गजानन लवटे उपस्थित होते. समितीच्या अवर सचिव जयश्री म्हात्रे,जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक (वन्यजीव) राहुल तोलिया, महाबीज महाव्यवस्थापक डॉ.संजय गरकल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व अधिकारी...

माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन! ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!"

 विशेष लेख  माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन!   ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!"  ​ पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाची चळवळ आता  मर्यादित स्वरूपात राहिली नसून डिजीटल विश्वातही तितक्याच ताकदीने पोहोचणार आहे. दि १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या ‘जलसंधारण सप्ताहा’चे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने राज्यातील तरुण-तरुणींसाठी ‘रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन’ या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय रील स्पर्धेची घोषणा केली आहे. ​आजची तरुण पिढी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. याच सर्जनशीलतेचा उपयोग करून माती व पाण्याचे महत्त्व सांगणारा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ​ स्पर्धेत भाग कोण घेऊ शकतं?  ​महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील सर्व युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. राज्यभरातून १०,००० हून अधिक रील्स गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स...

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

  महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन अकोला, दि १८: शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure ...

‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या 'जलसंधारण सप्ताहात' रील्स स्पर्धेचे आयोजन

  ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे  -जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या 'जलसंधारण सप्ताहात' रील्स स्पर्धेचे आयोजन अकोला, दि १८: माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६  हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येण...

अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ; प्रलंबित व्याज परतावा वितरणाला गती

                    अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ;                           प्रलंबित व्याज परतावा वितर णाला गती             अकोला, दि. १७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला ₹ ३०० कोटींचा निधी नुकताच महामंडळाच्या खात्यात जमा झाला असून , प्रलंबित व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे , अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.        व्याज परतावा योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून एकूण ₹ ७५० कोटी मंजूर करण्यात आला होते.   पहिला हप्ता २० मे २०२६ रोजी ₹ १५० कोटी प्राप्त झाला होता आणि योजनेतील लाभार्थ्यांना तो वितरित करण्यात आला. त्यानं...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२) ; शेतकरी, बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी ; · प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२) शेतकरी , बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यां साठी विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी ·          प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन अकोला , दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत जिल्ह्यातील कृषी व ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी शेतकरी , महिला स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या , आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट , महिला बचत गट , गाव संघ , प्रभाग संघ , लोकसंचालित साधन केंद्र आणि पेसा क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायती आदी पात्र असून कृषी व्यवसाय विकासासाठी संस्थांना ६० लाखांपर्यंत अनुदा न दिले जाते. गोदाम उभारणी , बीज प्रक्रिया केंद्र , प्राथमिक प्रक्रिया केंद्र , मूल्यवर्धन , पॅकिंग व साठवणूक केंद्र आदी उपक्रमांचा यात समावेश ...

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ; इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित

  जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ; ·          इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित अकोला ,दि. १७ :   प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम , १९६० च्या कलम ४ च्या अन्वये महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती स्थापन केली आहे. प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी सदस्यांनी मिळून ही समिती स्थापन केल्या जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या समितीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले परिपूर्ण अर्ज योग्य त्या कागदपत्रासह (आधार कार्ड व बायोडाटा) १ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या नियम ३(२) ( i) आणि ( ii) अन्वये इतर ११ अशासकीय सद स्यांची नियुक्ती दर तीन वर्षांनी करण्यात येते. तसेच अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहतो. अश...

थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया! (लेख)

  थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया! पर्जन्यमानाची अनिश्चितता पाहता पाण्याची बचत ही काळाची गरज झाली आहे.  पाऊस अनियमित पडणे, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होणे आणि पडलेले पाणी वाहून जाणे हीदेखील मोठी आव्हाने आहेत. अशा काळात पाण्याची जपणूक हा दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि भूजलपातळी वाढवणे आवश्यक आहे.  जलसंधारण ही  केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पाण्याच्या योग्य वापरातून बचत साधता येते. त्याचप्रमाणे, गावातील नाले, ओढे, तलाव आणि जलस्रोत जपणे आवश्यक आहे.   मृदा व पाण्याची बचत सर्वांनी अंगीकारली पाहिजे. पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून, घरापासून केली तर परिसर, गाव, शहर अशी ही कृती व्यापक होत जाते.   याच उद्देशाने जनजागृतीसाठी मृद व जलसंधारण विभागातर्फे महावॉकेथॉन आणि रीळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महावॉकेथॉन हा केवळ चालण्याचा कार्यक्रम नाही. तो जलजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. या माध्यमातून मृदा आणि पाणी  वाचविण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ...