पोस्ट्स

‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

इमेज
 ‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर   सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे २४ जुलै रोजी अकोला येथे विशेष भक्तिसंगीत कार्यक्रम; आषाढी एकादशीनिमित्त अभंग, भक्तिगीते आणि वारकरी परंपरेचा भावस्पर्शी आविष्कार  अकोला दि. 22 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘गजर माऊलीचा ’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. वारकरी संप्रदायाची अखंड भक्तिपरंपरा, संतांच्या अभंगांचे आध्यात्मिक चिंतन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून भक्तिभाव जागविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या विचारांचा आणि विठ्ठलभक्तीच्या समृद्ध वारशाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध श्री विठ्ठलाचे निशिंह भक्त अनेकांना व्यसनमुक्त क...

लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी

  लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी   अकोला दि. 22  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन दि. ३ ऑगस्ट, रोजी सकाळी ११ वाजता  जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्ष तिसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिस- या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरीकांना तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करता येतो. अर्जासोबत तहसिलदार यांचे आदेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे.   दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. संबंधितांनी अर्ज करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. --

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन अकोला दि. 22 : मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही योजना मच्छीमार, मत्स्यपालक, शेतकरी आणि संबंधित उद्योजकांना आर्थिक, तांत्रिक व संरचनात्मक सहाय्य प्रदान करणारी सर्वसमावेशक योजना आहे. याबाबत दि.९ मार्च २०२६ रोजी या संदर्भात शासन निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच मच्छिमारांना योजनेतील विविध घटकाद्वारे अनुदान दिले जाणार आहे. "विकसित महाराष्ट्र २०४७" चे ध्येय गाठण्यासाठी सदर योजना मैलाचा दगड ठरणार आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हा स्तरीय योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसेच ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील मत्स्यपालक, मच्छीमार व इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, दुसरा मजला, भूविकास बँक, जुने पोलीस अ...

रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण

इमेज
  रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण अकोला, दि. २२ जुलै  : जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल विकास भवन, अकोला येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र राज्य  रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अनंत केदारे, अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती यांच्या हस्ते झाले. यावेळी समिती सदस्य  महेन्द्र कवीश्वर,  सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, नागेश देशपांडे, कौशल्य विकास अधिकारी, श्रीमती पूनम रजाने, कौशल्य विकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रफुल्ल शेळके सहाय्यक आयुक्त, संचालन श्रीमती सोनाली भो...

माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
  माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश अकोला, दि. २२  : माय भारत पोर्टल वरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले.   जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  मेरा युवा भारत केंद्र (MY Bharat Kendra), अकोला जिल्हा सल्लागार समितीची बैठक सोमवारी झाली त्यावेळी त्या बोलत  होत्या. बैठकीत  जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे  यांनी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मेरा युवा भारतचे प्रमुख उपक्रम, युवकांसाठी उपलब्ध विविध संधी, मेरा युवा भारत ( mybharat.gov.in ) पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियानाची रूपरेषा तसेच आगामी जिल्हास्तरीय कृती आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस डॉ. ए. एल. कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, श्री. दिगंबर लोखंडे, अतिरिक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, डॉ. एस. आर. कोहचळे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. एस. एस. हाडोळे, जिल्हा सम...

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जि...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन अकोला, दि.२२ : महाराष्ट्र राज्याचे  दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्याम धनमने यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००

जिल्ह्यात पावसाची शक्यता पाऊस हवामान केंद्राची अंदाज

  जिल्ह्यात पावसाची शक्यता पाऊस हवामान केंद्राची अंदाज अकोला, दि. 21 : जिल्ह्यात दि. 21 जुलै ते 22 जुलैपर्यंत काही ठिकाणी पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. पुर असतांना पुलावरून गाडी नेवू नये. खराब दुश्यमानता व मुसळधार पावसात वाहन चालवू  नये. रोडवे, अंडरपास जेथे पाणी साठते तेथे जाणे टाळावे. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक; अर्जाची मुदत २२ जुलैपर्यंत

  स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक; अर्जाची मुदत २२ जुलैपर्यंत अकोला, दि. 21 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असल्याचे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश अर्जाची मुदत आता दि. २२ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असताना शासकीय वसतिगृहांमध्ये जागांची मर्यादा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. परिणामी अनेक विद्यार्थी वसतिगृह सुविधेपासून वंचित राहत असून उच्च शिक्षणासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२...

कन्व्हेयन्स अभावी अकोल्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या धोक्यात; डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्या - उपनिबंधक ज्योती मलिये

  कन्व्हेयन्स अभावी अकोल्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या धोक्यात; डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्या -  उपनिबंधक ज्योती मलिये अकोला, दि. 21 : शहरासह जिल्ह्यातील अनेक जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फ्लॅटधारकांना आपल्या घराचा ताबा असला तरी सोसायटीच्या नावावर जमीन व इमारतीचा मालकी हक्क हस्तांतरित (कन्व्हेयन्स) झालेला नसल्याने भविष्यात गंभीर कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सोसायट्यांनी वेळेत कन्व्हेयन्स अथवा आवश्यक असल्यास डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तालुका सहकारी संस्थेच्या उपनिबंधक ज्योती मलिये यांनी केले आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या संदर्भात कन्व्हेयन्स म्हणजे बिल्डर किंवा विकासकाकडून सोसायटीच्या नावावर जमीन व इमारतीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया होय. फ्लॅटधारकांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा मिळत असला तरी संपूर्ण इमारत व जमिनीचा मालकी हक्क सोसायटीकडे येण्यासाठी कन्व्हेयन्स आवश्यक असते. विकासकाने हा हक्क देण्यास टाळाटाळ केल्यास "डिम्ड कन्व्हेयन्स" या कायदेशीर प्रक्रियेद्वारे सोसायटीला हा हक्क मिळवता येतो. महाराष...