पोस्ट्स

मतदान केंद्र सुसूत्रीकरणाबाबत राजकीय पक्षांची सभा जिल्ह्यात २० नवी मतदान केंद्रे प्रस्तावित; निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार

इमेज
  मतदान केंद्र सुसूत्रीकरणाबाबत राजकीय पक्षांची सभा जिल्ह्यात २० नवी मतदान केंद्रे प्रस्तावित; निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार          अकोला, दि. २८ : मतदार याद्यां च्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्र मात मतदान केंद्रांतील प्रस्तावित बदलाची माहिती राजकीय पक्षांना करून देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष प्रतिनिधींची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.   मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्‍यासह १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविण्यात येत आहेत. त्यात मतदान केद्र सुसु्त्रीकरण व पुनर्रच ना करण्यात येत आहे. अकोला जिल्‍ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्‍त मतदान केंद्राचे प्रस्‍तावानुसार मतदान केंद्रामध्‍ये प्रस्‍तावित बदल हे मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांना अवगत होण्‍याचे द्दष्‍टीने ही बैठक झाली. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना अध्यक्षस्थानी होत्या.  यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, अतुल अमानकर , मनिष गावंडे, रमेश गायकवाड , प...

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

  जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि.२८ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पाऊस, तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. या काळात आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००

परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी मंजुर 'वंदे भारत'सह मालवाहतुकीलाही मिळणार गती

  परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी मंजुर 'वंदे भारत'सह मालवाहतुकीलाही मिळणार गती   नवी दिल्ली,28    : भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेताना   १६३ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत मार्गावरील विद्यमान इलेक्ट्रीक ट्रॅक्शन (विद्युत पुरवठा) प्रणालीचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे या मार्गावरील प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, भविष्यात 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचे अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १६४ ट्रॅक रेल्वे मार्गावर सध्या कार्यरत असलेली १x२५ केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली बदलून अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेची २x२५ केव्ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाढीव वीजभार हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वीज पुरवठा यंत्रणा, उपकेंद्रे आणि संबंधित पायाभू...

लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना वेळेत सेवा द्या; विलंब व दिरंगाई टाळा - राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे

इमेज
  लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना वेळेत सेवा द्या; विलंब व दिरंगाई टाळा -         राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण   डोंगरे अकोला, दि. २८ : शासनाच्या सेवा पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित पद्धतीने मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क आहे. त्यानुसार नागरिकांना वेळेत सेवा द्यावी व दिरंगाई टाळावी. प्रत्येकाने आपले उत्तरदायित्व जाणून कार्यवाही करण्याचे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.   लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अकोला जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्य सेवा हक्क आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक ,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. डोंगरे म्हणाले की, कायद्यानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागा...

· ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार अंतिम यादी १९ ऑक्टोबर रोजी

             ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार   अंतिम यादी १९ ऑक्टोबर रोजी   अकोला,   दि. २८   : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून ,   सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत ,   असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.   वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.   प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ (आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह) भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधि...

समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य न्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव

इमेज
      समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य न्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव अकोला, दि २७ : समान नागरी कायदा मसुदा समितीवर महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते त्यांना आज गौरविण्यात आले.   यावेळी इंडियन रेड   क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजीतसिंह बछेर, ॲड.महेंद्र साहू, ॲड. सुभाष मुंगी, संदेश रांदड,रामहरी डांगे, अमर गौड,कपिल रावदेव, राजू बुडकले, मोहन काजळे आदी उपस्थित होते. समान नागरी कायद्याचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना समान नियमांच्या कक्षेत आणणे आहे. याबाबत नागरिकांची मते व अभिप्राय मागविण्यात येत असून, नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाची भूमिका बजावतील असे प्रतिपादन समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी केले. प्रास्ताविक ॲड.सुभाषसिंग ठाकूर यांनी केले. श्री.बछेर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए मनोज चांडक यांनी मानले...

जागतिक हिपॅटायटिस दिन लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य

    जागतिक हिपॅटायटिस दिन लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य   अकोला, दि. २७ : हिपॅटायटिस हा गंभीर आजार असला तरी योग्य माहिती, लसीकरण, स्वच्छता आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. जागतिक हिपॅटायटिस दिन हा केवळ एक दिवस नसून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने या आजाराविषयी जागरूक राहून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य जपावे, असे आवाहन अकोला येथील जिल्हा आरोग्य कार्यालयाने केले आहे. जगभरात 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हिपॅटायटिस या आजाराविषयी जनजागृती करणे, त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगणे आणि वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यानिमित्त संदेश प्रसारित करण्यात आला आहे. हिपॅटायटिस म्हणजे काय? हिपॅटायटिस म्हणजे यकृताला (लिव्हरला) होणारी सूज. हा आजार मुख्यतः हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई या विषाणूंमुळे होतो. यापैकी हिपॅटायटिस बी आणि सी हे गंभीर स्वरूपाचे असून ते दीर्घकालीन यकृतविकार, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग...

खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

      खरीप हंगाम २०२६   पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. २७ ; कृषी विभागामार्फत अन्नधान्य , कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.                 यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने रा...

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा

इमेज
  राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा   नवी दिल्ली, 27 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय)  मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.   केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   बैठकीत श्री. चौहान म्हणाले की, केंद्र सरकारने आरकेव्हीवायअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटींचा निधी मंजूर केला होता. राज्याने निर्धारित 75 टक्के खर्चाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करत सुमारे 260 कोटींचा निधी वेळेत खर्च केल्याने महाराष्...

मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' मध्ये मुलाखत

    मतदार याद्यांच्या ' विशेष सखोल पुनरीक्षण ( SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची ' जय महाराष्ट्र ' आणि ' दिलखुलास ' मध्ये मुलाखत                                                                                                                              मुंबई , दि. 27 : भारत निवडणूक आयोग राबवित असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण ( Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्य...