पोस्ट्स

समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य न्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव

इमेज
      समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य न्या. मेहरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव अकोला, दि २७ : समान नागरी कायदा मसुदा समितीवर महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते त्यांना आज गौरविण्यात आले.   यावेळी इंडियन रेड   क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजीतसिंह बछेर, ॲड.महेंद्र साहू, ॲड. सुभाष मुंगी, संदेश रांदड,रामहरी डांगे, अमर गौड,कपिल रावदेव, राजू बुडकले, मोहन काजळे आदी उपस्थित होते. समान नागरी कायद्याचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना समान नियमांच्या कक्षेत आणणे आहे. याबाबत नागरिकांची मते व अभिप्राय मागविण्यात येत असून, नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाची भूमिका बजावतील असे प्रतिपादन समान नागरी कायदा मसुदा समितीचे सदस्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी केले. प्रास्ताविक ॲड.सुभाषसिंग ठाकूर यांनी केले. श्री.बछेर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए मनोज चांडक यांनी मानले...

जागतिक हिपॅटायटिस दिन लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य

    जागतिक हिपॅटायटिस दिन लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य   अकोला, दि. २७ : हिपॅटायटिस हा गंभीर आजार असला तरी योग्य माहिती, लसीकरण, स्वच्छता आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. जागतिक हिपॅटायटिस दिन हा केवळ एक दिवस नसून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने या आजाराविषयी जागरूक राहून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य जपावे, असे आवाहन अकोला येथील जिल्हा आरोग्य कार्यालयाने केले आहे. जगभरात 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हिपॅटायटिस या आजाराविषयी जनजागृती करणे, त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगणे आणि वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यानिमित्त संदेश प्रसारित करण्यात आला आहे. हिपॅटायटिस म्हणजे काय? हिपॅटायटिस म्हणजे यकृताला (लिव्हरला) होणारी सूज. हा आजार मुख्यतः हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई या विषाणूंमुळे होतो. यापैकी हिपॅटायटिस बी आणि सी हे गंभीर स्वरूपाचे असून ते दीर्घकालीन यकृतविकार, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग...

खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

      खरीप हंगाम २०२६   पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. २७ ; कृषी विभागामार्फत अन्नधान्य , कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.                 यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने रा...

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा

इमेज
  राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा   नवी दिल्ली, 27 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय)  मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.   केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   बैठकीत श्री. चौहान म्हणाले की, केंद्र सरकारने आरकेव्हीवायअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटींचा निधी मंजूर केला होता. राज्याने निर्धारित 75 टक्के खर्चाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करत सुमारे 260 कोटींचा निधी वेळेत खर्च केल्याने महाराष्...

मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' मध्ये मुलाखत

    मतदार याद्यांच्या ' विशेष सखोल पुनरीक्षण ( SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची ' जय महाराष्ट्र ' आणि ' दिलखुलास ' मध्ये मुलाखत                                                                                                                              मुंबई , दि. 27 : भारत निवडणूक आयोग राबवित असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण ( Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्य...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस नियमावलीत मोठे बदल; नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार

  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस नियमावलीत मोठे बदल; नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार अकोला, २४  : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्कूल बस नियमावलीमध्ये सुधारणा करत 'महाराष्ट्र मोटार व्हिईकल्स (स्कूल बस करिता विनियम), २०२६ पहिली सुधारणा' लागू केली आहे. या नवीन नियमांचे पालन करणे सर्व शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांसाठी बंधनकारक करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत याची पूर्तता न केल्यास वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल, असा इशारा अकोला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. शाळेत 'शालेय वाहतूक समिती' स्थापन करणे अनिवार्य नवीन नियमांनुसार प्रत्येक शाळेमध्ये 'शालेय वाहतूक समिती' स्थापन करावी लागणार आहे. ही समिती आर.टी.ओ.ने निश्चित केलेल्या दरानुसार स्कूल बस आणि व्हॅनचे भाडे तपासणे, पालकांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि प्रत्येक तिमाहीचा अहवाल जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीला सादर करण्याचे काम करेल. स्कूल बस आणि व्हॅनचे भाडेदर प्रति विद्यार्थी प्रति किलोमीटर याप्रमाणे प्रादेशिक पर...

जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) – २५ जुलै

 जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) – २५ जुलै "पालकत्वाचा प्रवास प्रत्येकासाठी सारखा नसतो; पण आशा, विज्ञान आणि योग्य उपचार यांच्या मदतीने अनेकांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात." दरवर्षी २५ जुलै रोजी जागतिक वंध्यत्व जागरूकता दिन (World IVF Day) साजरा केला जातो. १९७८ साली जगातील पहिले आयव्हीएफ (In Vitro Fertilization – IVF) बाळ जन्माला आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे लाखो निःसंतान जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश वंध्यत्वाबाबत समाजामध्ये योग्य जनजागृती निर्माण करणे. वंध्यत्वाशी संबंधित गैरसमज, अंधश्रद्धा आणि सामाजिक कलंक दूर करणे. वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या व्यक्ती व जोडप्यांना मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार देणे. आयव्हीएफ (IVF), आययूआय (IUI) यांसारख्या आधुनिक प्रजनन उपचारांबाबत विश्वासार्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. वेळेवर तपासणी आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करणे. वंध्यत्व किती सामान्य आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, जगभरातील प्रत्येक ६ पैकी १ व...

‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

इमेज
 ‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर   सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे २४ जुलै रोजी अकोला येथे विशेष भक्तिसंगीत कार्यक्रम; आषाढी एकादशीनिमित्त अभंग, भक्तिगीते आणि वारकरी परंपरेचा भावस्पर्शी आविष्कार  अकोला दि. 22 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘गजर माऊलीचा ’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. वारकरी संप्रदायाची अखंड भक्तिपरंपरा, संतांच्या अभंगांचे आध्यात्मिक चिंतन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून भक्तिभाव जागविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या विचारांचा आणि विठ्ठलभक्तीच्या समृद्ध वारशाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध श्री विठ्ठलाचे निशिंह भक्त अनेकांना व्यसनमुक्त क...

लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी

  लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी   अकोला दि. 22  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन दि. ३ ऑगस्ट, रोजी सकाळी ११ वाजता  जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्ष तिसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिस- या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरीकांना तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करता येतो. अर्जासोबत तहसिलदार यांचे आदेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे.   दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. संबंधितांनी अर्ज करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. --

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन अकोला दि. 22 : मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही योजना मच्छीमार, मत्स्यपालक, शेतकरी आणि संबंधित उद्योजकांना आर्थिक, तांत्रिक व संरचनात्मक सहाय्य प्रदान करणारी सर्वसमावेशक योजना आहे. याबाबत दि.९ मार्च २०२६ रोजी या संदर्भात शासन निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच मच्छिमारांना योजनेतील विविध घटकाद्वारे अनुदान दिले जाणार आहे. "विकसित महाराष्ट्र २०४७" चे ध्येय गाठण्यासाठी सदर योजना मैलाचा दगड ठरणार आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हा स्तरीय योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसेच ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील मत्स्यपालक, मच्छीमार व इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, दुसरा मजला, भूविकास बँक, जुने पोलीस अ...