शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाचे आवाहन
शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाचे आवाहन अकोला, दि. ९ : नागरिकांना अन्न व पोषण सुरक्षा पुरविण्याक रि ता रास्त दरात पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंमलात आहे. शिधापत्रिकेसोबत आरसीएमएस पोर्टलमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांचे आधारकार्ड संलग्न करण्यात येत असून, संगणकीकरण प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आले आहे. धान्याचा लाभ गोरगरीब, गरजू पात्र लाभार्थ्यांना दरमहा मिळावा व कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी रेशनकार्डचे ऑनलाईन काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना-2013 अंतर्गत या जिल्हयामध्ये पात्र अंत्योदय रेशनकार्ड कुंटुंब आणि पात्र लाभार्थी पीएचएच रेशनकार्ड लाभार्थी यांना दरमहा प्रत्येक गावातील स्वस्त रास्तभाव दुकानांमार्फत ई पॉस म शिनमध्ये बोटाचे ठसे अद्ययावत करूनच, धान्याचे वितरण/वाटप मोफत होत आहे. रेशनचे धान्य पात्र लाभार्थी नागरीकांनांच मिळावे, धान्याचे वाटप / वितरणामध्ये सुसूत्रितपणा येण्य...