बळीराजाला बळ देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
बळीराजाला बळ देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नैसर्गिक आपत्ती, नापिकी यांच्या दुष्टचक्रात अ़़डकलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी 'शेतकरी कर्जमुक्ती' हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी पाऊल ठरते. कर्जमुक्ती म्हणजे केवळ बँकांचे देणे माफ करणे नव्हे, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने बळकटी देणारी एक संजीवनी असते. कृषी क्षेत्रातील कर्जमुक्तीची आवश्यकता आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा एखादा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा तो बँकेच्या दृष्टीने थकबाकीदार बनतो. थकबाकीदार झाल्यामुळे त्याला पुढील हंगामासाठी नवीन पीककर्ज मिळणे बंद होते. पर्यायाने, शेती चालू ठेवण्यासाठी त्याला सावकाराच्या दारात जावे लागते. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्याचे बँक खाते पुन्हा 'नियमित' होते, ज्यामुळे त्याला नव्या दमाने शेती करण्यासाठी बँकांकडून अधिकृत पतपुरवठा उपलब्ध होतो. याशिवाय, कर्जबाजारीपणामुळे ग्रामीण भागात निर्माण होणारा मानसिक...