पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बळीराजाला बळ देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

    बळीराजाला बळ देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नैसर्गिक आपत्ती, नापिकी यांच्या दुष्टचक्रात अ़़डकलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी 'शेतकरी कर्जमुक्ती' हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी पाऊल ठरते. कर्जमुक्ती म्हणजे केवळ बँकांचे देणे माफ करणे नव्हे, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने बळकटी देणारी एक संजीवनी असते.   कृषी क्षेत्रातील कर्जमुक्तीची आवश्यकता आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा एखादा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा तो बँकेच्या दृष्टीने थकबाकीदार बनतो. थकबाकीदार झाल्यामुळे त्याला पुढील हंगामासाठी नवीन पीककर्ज मिळणे बंद होते. पर्यायाने, शेती चालू ठेवण्यासाठी त्याला सावकाराच्या दारात जावे लागते. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्याचे बँक खाते पुन्हा 'नियमित' होते, ज्यामुळे त्याला नव्या दमाने शेती करण्यासाठी बँकांकडून अधिकृत पतपुरवठा उपलब्ध होतो. याशिवाय, कर्जबाजारीपणामुळे ग्रामीण भागात निर्माण होणारा मानसिक...

स्वाधार अर्जाची पूर्तता करण्याचे आवाहन

 स्वाधार अर्जाची पूर्तता करण्याचे आवाहन अकोला, दि. 1 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. स्वाधार योजनेंतर्गत काही विद्यार्थ्यांचे परिक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे जे विद्यार्थी अर्ज सेंड बॅक करू शकले नाही असे विद्यार्थी सदर योजना लाभापासून वंचित राहणार नाहीत या करिता स्वाधार योजनेतील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता करणेकरिता दि.7 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शैक्षणिक सत्र 2024-2025 व 2025-2026 करिता विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमधील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता लवकरात लवकर करुन स्वाधार योजनेतील इन्सपेक्टर लेवल लॉगीन ला व कार्यालयात सादर करावी. या पत्राद्वारे देण्यात येणारी मुदत ही अंतीम असुन आपल्या लॉगीनमधील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता तात...

कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सीईओ अनय नावंदर यांच्या हस्ते मृदापूजन; २१ प्रगतशील शेतकरी व पीक स्पर्धा विजेत्यांचा गौरव

इमेज
  कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सीईओ अनय नावंदर यांच्या हस्ते मृदापूजन; २१ प्रगतशील शेतकरी व पीक स्पर्धा विजेत्यांचा गौरव अकोला, दि. १ जुलै : माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनय नावंदर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मातीपूजन करण्यात आले. भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनय नावंदर होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, मृदापरीक्...

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

    जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज अकोला, दि. 1 : जिल्ह्यात दि. 1 जुलै ते 5 जुलैपर्यंत काही ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

 आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य...

‘पॉश ॲक्ट’ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची उपस्थिती नियोजनभवनात गुरूवारी कार्यशाळा

  ‘पॉश ॲक्ट’ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण   राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची उपस्थिती नियोजनभवनात गुरूवारी कार्यशाळा अकोला, दि. १ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ‘पॉश ॲक्ट’अन्वये गठित तक्रार निवारण समित्यांच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण गुरुवार, दि. 2 जुलै रोजी दु. 1.30 वा. नियोजनभवनात होणार आहे.   राष्ट्रीय महिला आयोगातर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 (पॉश ॲक्ट) अन्वये विविध आस्थापनांमध्ये गठित तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या कार्यशाळेमुळे पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक व लैंगिक छळमुक्त वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे. 000

वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळाच्या योजना वि.जा. व भ. ज., विमाप्र प्रवर्गासाठी स्वयंरोजगार कर्ज योजना

  वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळाच्या योजना वि.जा. व भ. ज., विमाप्र प्रवर्गासाठी स्वयंरोजगार कर्ज योजना अकोला, दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता योजना राबवल्या जातात. महामंडळाअंतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ,ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपन्यांमार्फत समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघूउधोग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय पारंपारिक व्यवसाय, अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत जास्तीत जास्त रु. १५ लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्य...

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण नागरिकांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन

इमेज
      मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण नागरिकांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन अकोला, दि. ३० : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू झाले असून, ‘बीएलओं’कडून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत. नागरिकांनी बीएलओ यांना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. याअनुषंगाने सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हाधिका-यांनी कामकाजाचा आढावाही घेतला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आजपासून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत. यावेळी बीएलओ अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या गणनापत्रात नागरिकांनी आपली अचूक माहिती भरून फॉर्म त्यांच्याकडे जमा करावा. हा फॉर्म जलद भरून होतो. त्यामुळे सर्वांनी मतदान केंद्रस्तरीय अधिका...

माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक

इमेज
 माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा  कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक मुंबई, दि. ३० : मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण येथील माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या, वेतनवाढ, थकीत मजुरी तसेच कामगारांच्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असून संबंधित सर्व संघटनांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश मंत्री श्री फुंडकर यांनी यावेळी दिले.  बैठकीत संबंधित आस्थापनांमध्ये कार्यरत माथाडी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव, थकीत मजुरीची वसुली, कामगारांच्या नोंदणीची स्थिती तसेच रोजगाराशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा मंत्री श्री फुंडकर यांनी घेतला. कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री श्री फुंडकर म्हणाले, कामगारांचे हित जपणे आणि कामगारांना न्याय मिळवून देणे ही शासनाच...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’

इमेज
  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ‘आधार’ची माहिती बँकेत द्या : सहकार कार्यालयाचे आवाहन अकोला, दि. ३० : राज्यशासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातील माहिती बँकेच्या शाखेत देण्याचे आवाहन जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बॅकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे #आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर दिला जाणार आहे. पात्...

शेतकरी कर्जमुक्ती म्हणजे काय भाऊ ?

  शेतकरी कर्जमुक्ती म्हणजे काय भाऊ ?           मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ जाहीर केली आहे. शेतकरी बांधवाना कर्जमुक्ती देण्याचा हा ऐतिहासिक महानिर्णय आहे. यामुळे शेतकरी राजा आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे कृषक प्रशासक रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासन होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडीत या महत्वपूर्ण योजनेस ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ हे नाव देवून शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.                              कर्जमुक्ती योजना काय आहे ?   2017 मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर 2019 मध्ये दोन लाख रु...

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ;

इमेज
  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण अमरावती, दि. 29 : कधी अवेळी पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अतिवृष्टी... अशा एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील बळिराजाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची घोषणा केली असून, या महाकर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटु...

महाकर्जमुक्तीची संजीवनी

      महाकर्जमुक्तीची संजीवनी                                                                                                                                         नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे....