अकोला शहरात २९ पानटपरीधारकांवर कारवाई


अकोला,दि.२१ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मनाई आदेश असतांनाही पान टपरी सुरु ठेवणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात कोराना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पानटपरी व पान तंबाखूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कारण पान, तंबाखू खाऊन थुंकणे यामुळेही कोरोना संसर्गाची शक्यता बळावते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय शेळके, तहसिलदार लोखंडे, मनपा आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर तसेच कर्मचाऱ्यांनी रतनलाल प्लॉट ,दुर्गा चौक, जठारपेठ, राऊतवाडी आदी भागात पाहणी करुन उघडी असलेली दुकाने बंद केली. तसेच २९ जणांवर कारवाईही केली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ