आपत्तीग्रस्त शेतकऱ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत


अकोला,दि.१९(जिमाका)-  जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यास राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते मदत प्रदान करण्यात आली. शंकर मोतीराम पाटकर, मु. पाटी ता. अकोला यांच्या शेतातील हरभरा जळाल्याने त्यांचे नुकसान झाले होते. त्यांना तातडीची मदत म्हणून पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ