पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई
अकोला,दि.२०(जिमाका)- कोरोना विषाणूच्या
पार्श्वभुमिवर पाळीव प्राण्यांना मोकळे सोडून दिल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास
आले आहे, असे पाळीव प्राण्याच्या पालकाने केल्यास हे कृत्य प्राण्यांना निर्दयतेने
वागविण्याचे समजले जाऊन प्राण्यांना क्रुरतेने
वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० नुसार कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हा
प्रशासनाला पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून
प्राप्त झाले आहेत.
पाळीव प्राणी जसे कुत्रा, मांजर, कोंबड्या इ. च्या मार्फत कोरोना
विषाणूचा संसर्ग फैलावतो हा गैरसमज असून
या प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे कोणतेही शास्त्रीय
पुरावे नाहीत. त्यामुळे या प्राण्यांचे पालकत्व पत्करलेल्या लोकांनी घाबरुन आपल्याकडील पाळीव प्राण्यास सोडून देऊ
नये. त्यामुळे प्राण्यांची उपासमार होऊ शकते. उपासमारीमुळे अथवा आजारामुळे वा अपघातामुळे त्यांना अपंगत्व
अथवा मृत्युस कारणीभूत ठरणार नाही याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी. याबाबत अफवा पसरणार नाहीत याचीही दक्षता
घ्यावी. असे झाल्यास प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
नुसार कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा