‘त्या’ तिघांपैकी एकाचा संपर्क झाला


अकोला,दि.२१ (जिमाका)- विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या तिघा प्रवाशांपैकी एकाने आज जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला अन्य दोघांशी अद्यापही संपर्क झालेला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. दरम्यान आज अखेर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
                        केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून प्राप्त यादीनुसार, अकोला जिल्ह्यात  दाखल व अद्याप प्रशासनाशी संपर्क न झालेले  पटेल जलपाल पंकज हे ह्युस्टन मधून आलेले, शुभम तिवारी हे इंडोनेशियातून आलेले आणि रितेश (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे शारजाह हून आलेले  तिघे प्रवासी आहेत. पैकी जलपाल पटेल यांनी आज प्रशासनाशी संपर्क केला.  उर्वरित दोघे अद्याप संपर्कात नाहीत. या व्यक्तिंना ओळखणारे अथवा त्यांचे कुटूंबिय नातेवाईक यांनी तात्काळ त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
                        दरम्यान आज अखेर एकूण प्रवाशांची संख्या ७५ झाली आहे. त्यापैकी ७३ जणांचा संपर्क झाला असून ४४ जण गृह अलगीकरण करुन निरीक्षणात आहे.  २४ जणांचे निरीक्षणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत, पाच जण अलगीकरण कक्षात निरिक्षणात आहेत. अद्याप आठ जणांचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचे चाचणी अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आणि चौघांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ