केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे आवाहन


अकोला,दि.२५ (जिमाका)-  केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की, देशात लागू करण्यात आलेली संचार बंदी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे. केवळ एकमेकांचा संपर्क टाळणे हाच हा संसर्ग टाळण्याचा उपाय आहे. तरी लोकांनी घरातच रहावे. आपल्यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे घरातील शक्यतो एकाच व्यक्तीने जवळच्या ठिकाणी जाऊन घराला लागणाऱ्या अन्न धान्य भाजीपाला आदी वस्तू आणाव्या व नंतर घरातच थांबावे, असे आवाहन ना. धोत्रे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ