नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


      अकोला, दि.13 (जिमाका)- भारतीय मौसम विभाग ,नागपुर यांच्या संदेशानुसार ‍दि. 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2019 दरम्यान  विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होणे अशी शक्यता वर्तविली आहे.  तसेच 29 जुलै 2019 पासुन  पुर्णा नदीच्या   पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इतरही नदी नाल्यांना पुर आलेला आहे. पोपटखेड, वान प्रकल्पातुन तसेच  अमरावती जिल्हयातील पुर्णा,  चंद्रभागा, शाहानुर या प्रकल्पातुन कोणत्याही क्षणी पाण्याचा  विसर्ग केला जाऊ शकतो.
      नदी, नाला काठावरील गावांना  सतर्कतेचा  इशारा देण्यात येत आहे. तसेच क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात येते असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ