शेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी

            अकोला,दि.13 (जिमाका)-   शेतकरी शेतात विविध रासायनिक औषधे फवारतात, याच रासायनिक औषधांमुळे तीन प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. रासायनिक औषधांचे झाडांवर अत्यंत बारीक कण हवे बरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात, फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्याव्दारे शरीरात जातात, फवारणी करतांना नकळत तोंडाव्दारे खातांना ,बिडी पितांना शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे विषबाधा होऊन प्राणावर संकट येऊ शकते. ही स्थिती टाळण्यासाठी किटकनाशके, तणनाशके आदी फवारतांना कोणती काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर माहिती देत आहोत.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी- गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरूस्त करून वापरावे, किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाच्या वापर  करावा.,  तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये, किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे वापरावे, फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे,  झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून  घ्यावेत, किटकनाशकला  हुंगणे किंवा  त्याचा  वास घेणे टाळावे. , फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा  किंवा काठीचा वापर करावा,किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण  करतांना अथवा  फवारणीच्यावेळी तंबाखू खाणे अथवा  धुम्रपान करणे टाळावे, फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर  हात साबणाने स्वच्छ धुऊन खाणे, पिणे करावे, फवारणीच्यावेळी लहान मुले, जनावरे पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासुन  दुर ठेवावे, उपाशी पोटी फवारणीन करता  फवारणीपुर्वी न्याहरी करावी, फवारणी करतांना वापरलेली  भांडी इ. साहित्य  नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुउू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत,किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर  नष्ट करून टाकाव्यात , फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी त्यास तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोईस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी, किटकनाशके फवारणीचे काम  दर दिवशीआठ तासांपेक्षा जास्तवेळ करू नये. हे काम करणा-या प्रत्येक  व्यकतीने  ठरावीक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे, किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावे व वेळोवेळी स्वच्छ धुऊन काढावेत, किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्या विरूध्द दिशेने फवारणी करून नये, किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना किमान दोन आठवडे  चरण्यास जाऊ देऊ नये,  जमिनीवर सांडलेले किटकनाशक  हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती /चिखल यांच्या सहाय्याने शोषून  घ्यावेत व जमिनीत  गाडून टाकाव्यात,  डब्यांवरील मार्गदर्शक   चिन्हांकडे काळजीपुर्वक  लक्ष द्यावे.  लाल रंगाचे चिन्ह/ खुण असलेली  औषधी सर्वांत अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा , निळा व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाय योजना-विषबाधा हि किटकनाशके / तणनाशके यांच्या त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते.  विषबाधा व इतर आजार  यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहु शकते.
लक्षणे-अशक्तपणा व चक्कर येणे, त्वेचेची जळजळ होणे,  डाग पडणे, घाम येणे, डोळयांची  जळजळ होणे, पाणी येणे,  अंधुक दिसणे, तोंडातुन  लाळ गळणे,  तोंडाची  आग होणे, उलटी येणे, मळमळणे,  हगवण होणे, पोटात दुखणे.,  डोळेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी  , जीभ लूळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे , खोकला येणे.
विषबाधेची शंका असल्यास खात्री करा-रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय?, नेमके कोणते किटकनाशक वापरले? शरीरात किती गेले व केव्हा गेले? डॉक्टरांसाठी  ही माहिती महत्वाची आहे?
विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार- किटकनाशके/तणनाशके डोळ्यात उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटांपर्यंत पाण्याची  धार सोडून धुवा. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ  धुवा व  दवाखान्यात न्या, विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुद्धीवर असेल  तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करा अन्यथा नाही.तीन चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातुन पाजा व लगेच दवाखान्यात न्या, विषारी  औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या  लवकर दवाखान्यात पोहचवा.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ