पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी(दि.19)रोजी जनता तक्रार निवारण दिन


अकोला,दि.16 (जिमाका)-  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सोमवार दि.19 ऑगस्ट रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती सभागृह(जिल्हा नियोजन कार्यालय इमारत) येथे हा जनता तक्रार निवारण दिन सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या तक्रारी/समस्या/निवेदने  घेवून सोमवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती सभागृह(जिल्हा नियोजन कार्यालय इमारत) समक्ष उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
***********

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन