जिल्हा नियोजन समितीची बैठक














जिल्हा नियोजन समितीची बैठक

जिल्ह्यासाठी ४९१ कोटी ७० लाखांचा नियतव्यय मंजूर;

आवश्यक विकासकामांचे प्रस्ताव वेळेत सादर करा

-        पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. ५ : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ मध्ये ४९१ कोटी ७० लक्ष रू. नियतव्यय मंजूर आहे. विकासाच्या दृष्टीने आवश्यक व व्यापक लोकहित साधणा-या विकासकामांचा आराखड्यात समावेश करावा. जिल्ह्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी मान्यता व इतर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, नितीन देशमुख, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, साजिद खान पठाण, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, सन २०२६-२७ या वर्षात सर्वसाधारण योजनेत ३८७ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ८७ कोटी व आदिवासी उपयोजनेत १७.७० कोटी नियतव्यय मंजूर आहे. कामांचे नियोजन करताना जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्याचा समावेश आराखड्यात करावा. आवश्यक कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रक्रिया गतीने राबवावी.

सेल्फ ऑडिट करा

ते पुढे म्हणाले की, सर्वांगीण विकासाला चालना मिळेल व व्यापक लोकहिताच्या कामांचा समावेश व्हावा. कार्यालयांनी अवास्तव प्रस्ताव पाठवू नये. कुठलेही अवास्तव प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत. कामांना मान्यता व निधी दिला जातो; तथापि, अनेकदा कामांत गंभीर चुका झाल्याचे आढळते. अशा चुका करणा-यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाईल. तसे कदापि घडता कामा नये. त्यासाठी कार्यालयांनी ‘सेल्फ ऑडिट’ करून वेळीच चुका दुरूस्त केल्या पाहिजेत.

अनुपस्थितांना कारणे दाखवा नोटीसा

लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचे अनुपालन तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील बैठकीची वाट पहावी लागू नये. बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

सन २०२५-२६ या वर्षातील सर्वसाधारण योजनेत ३३३ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ८८ कोटी, आदिवासी उपयोजनेतील १६ कोटी ५१ लक्ष रू. निधीतून अनेक विकासकामांवर झालेल्या एकूण ४३७ कोटी ५१ लक्ष रू. खर्चाला सभेत मान्यता देण्यात आली. सन २०२६-२७ या वर्षात ४९१ कोटी ७० लक्ष रू. मंजूर नियतव्यय असून, २४२ कोटी ८२ लक्ष निधी प्राप्त आहे. त्यानुसार विकासकामांना चालना देण्यात निर्देश देण्यात आले.

 

लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध सूचनांवर यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वनविभागाने आवश्यक परवानग्या वेळेत द्याव्यात. आवश्यक रस्ते व विकासकामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

००० 

टिप्पण्या

  1. जीव, शिव, आत्मा, परमात्मा: जीवन के इस महाविज्ञान को समझें
    अक्सर हम अपने जीवन की भागदौड़ में यह भूल जाते हैं कि हम वास्तव में कौन हैं और हमारा इस ब्रह्मांड से क्या संबंध है। भारतीय दर्शन (अध्यात्म) में चार प्रमुख शब्दों का वर्णन मिलता है जो पूरी सृष्टि को परिभाषित करते हैं: जीव, शिव, आत्मा और परमात्मा।
    आइए, बहुत ही सरल शब्दों में इनके रहस्य को समझते हैं।
    1. जीव (The Living Being)
    जीव का अर्थ है वह 'अस्तित्व' जो शरीर में रहकर सुख-दुख का अनुभव करता है। जो पैदा होता है, सांस लेता है और अंत में मृत्यु को प्राप्त होता है।
    सरल अर्थ: आपका शरीर, आपका मन और आपकी बुद्धि का मेल ही 'जीव' है। यह संसार के बंधनों में उलझा हुआ होता है।
    2. आत्मा (The Individual Self)
    आत्मा वह है जो शरीर के अंदर रहने वाली 'ऊर्जा' या 'चेतना' (Consciousness) है। जैसे बिजली के बिना बल्ब नहीं जल सकता, वैसे ही आत्मा के बिना शरीर एक निर्जीव वस्तु है।
    सरल अर्थ: आत्मा वह है जो कभी मरती नहीं, जिसे कोई शस्त्र काट नहीं सकता और जिसे अग्नि जला नहीं सकती। यह 'जीव' का वास्तविक स्वरूप है।
    3. परमात्मा (The Supreme Consciousness)
    परमात्मा का अर्थ है 'परम आत्मा' या संपूर्ण ब्रह्मांड की महा-चेतना। जैसे समुद्र की एक बूंद आत्मा है, तो पूरा समुद्र परमात्मा है।
    सरल अर्थ: जो कण-कण में व्याप्त है, जो इस सृष्टि का रचयिता और संचालक है, वही परमात्मा है।
    4. शिव (The Absolute Truth)
    शिव का अर्थ केवल एक देवता नहीं है, बल्कि 'शिव' का अर्थ है "जो है ही नहीं" (शून्य) और साथ ही "जो सब कुछ है"। शिव शुद्ध चेतना का प्रतीक है जहाँ जीव और परमात्मा एक हो जाते हैं।
    सरल अर्थ: जब एक बूंद (आत्मा) समुद्र (परमात्मा) में गिरती है, तो वह समुद्र ही हो जाती है। यह मिलन की अवस्था ही 'शिव' है।
    जड़ और चेतन का रहस्य
    दर्शनशास्त्र में पूरी सृष्टि को दो भागों में बांटा गया है:
    जड़ (Inanimate): जिसमें चेतना या जीवन नहीं है। जैसे—पत्थर, लकड़ी, मिट्टी या आपका शरीर (जब तक आत्मा इसमें है)। इसे 'माया' का विस्तार भी कहा जा सकता है।
    चेतन (Conscious): जिसमें जीवन है, जो अनुभव कर सकता है और जिसमें संवेदना है। आत्मा ही वह तत्व है जो जड़ शरीर को 'चेतन' बनाती है।
    निष्कर्ष:
    हम सभी इस संसार की यात्रा कर रहे जीव हैं। हमारा लक्ष्य अपनी आत्मा को पहचानकर उस 'परमात्मा' (ब्रह्मांडीय शक्ति) से जुड़ना है। जिस दिन हम यह समझ जाते हैं कि हम केवल शरीर (जड़) नहीं, बल्कि अनंत ऊर्जा (चेतन) हैं, उसी क्षण हम 'शिव' भाव यानी मोक्ष और शांति को प्राप्त करते हैं।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन