अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी 2678. 73 लक्ष निधीचे वितरण

 


अकोला,दि. 9 (जिमाका)- जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे एकूण 999 गावे बाधित झाले आहे. या बाधित गावातील एकूण शेतकरी संख्या 68 हजार 571 असून एकूण बाधित  क्षेत्र 51562.58 हेक्टर आहे.  या बाधित गावाकरीता अपेक्षीत नुकसान भरपाई एकूण रक्कम रु 5157.46 लक्ष असून मा. विभागीय आयुक्त अमरावतीव्दारे 2678. 73 लक्ष रुपयाचा निधी जिल्ह्याकरीता देण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील  अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  संबंधित तहसिलदार यांना दिल्यात. जून ते ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे तसेच बहुवार्षिक पिकांचे 33 टक्केच्यावर नुकसान झालेले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 10 हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये या दराने दोन हेक्टर मर्यादापर्यंत मदत देण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ