खरीप हंगाम सन २०२५ साठी पीकस्पर्धा योजना
खरीप हंगाम सन २०२५
साठी पीकस्पर्धा योजना
अकोला, दि. ७ : राज्यामध्ये पिकाची
उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात
येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या
उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने
नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर
घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर
शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व
आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी,
मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन,
भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे.
पिकस्पर्धेची
ठळक वैशिष्टे व बाबी :
·
पीकस्पर्धेसाठी उडीद, मुंग या
पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे
·
पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका,
नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज
दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५
आहे.
·
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक
पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.
१५० राहिल.
·
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती
जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत
भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता
येईल.
·
पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता
स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर
पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
·
पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात
येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग
घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधार भूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड
करण्यात येणार आहे.
अर्ज
कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
३) ७/१२, ८-अ चा उतारा
४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित
केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
६) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
पिकस्पर्धा
बक्षिसाचे स्वरूप- सर्वसाधारण व आदिवासी
गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व
तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र |
स्पर्धापातळी |
सर्वसाधारण
व आदिवासी गट बक्षिस रुपये |
||
पहिले |
दुसरे |
तिसरे |
||
1 |
तालुकापातळी |
5,000 |
3,000 |
2,000 |
2 |
जिल्हापातळी |
10,000 |
7,000 |
5,000 |
३ |
राज्यपातळी |
50,000 |
40,000 |
30,000 |
खरीप
हंगाम सन २०२५ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा असे
आवाहन (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अकोला) यांनी
केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा