जलद व्यवहारांसाठी टपाल कार्यालयात ‘आयटी २.०’

  

 जलद व्यवहारांसाठी टपाल कार्यालयात  ‘आयटी २.०’

 

अकोला, दि. २२ : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आय.टी २.० उपक्रमात एटीपी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू केली असून, येत्या ५ ऑगस्ट रोजी अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व शाखा व उप टपालघरांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. याबाबत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील टपाल कार्यालये ४ ऑगस्टला बंद राहतील.

 

 

नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास प्रवर अधिक्षकांनी व्यक्त केला.

त्यासाठी डेटा स्थलांतराची प्रक्रिया ४ ऑगस्ट रोजी होणार असून, त्या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सेवा ४ ऑगस्टपूर्वीच मिळविण्याचे आवाहन  प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

टपाल कार्यालय एक दिवस बंद राहणार असले तरी भविष्यातील सेवा अनुभव अधिक सक्षम व डिजिटल होईल, अशी ग्वाही विभागाने व्यक्त केली आहे.

00

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा