जलद व्यवहारांसाठी टपाल कार्यालयात ‘आयटी २.०’

  

 जलद व्यवहारांसाठी टपाल कार्यालयात  ‘आयटी २.०’

 

अकोला, दि. २२ : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आय.टी २.० उपक्रमात एटीपी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू केली असून, येत्या ५ ऑगस्ट रोजी अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व शाखा व उप टपालघरांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. याबाबत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील टपाल कार्यालये ४ ऑगस्टला बंद राहतील.

 

 

नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास प्रवर अधिक्षकांनी व्यक्त केला.

त्यासाठी डेटा स्थलांतराची प्रक्रिया ४ ऑगस्ट रोजी होणार असून, त्या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सेवा ४ ऑगस्टपूर्वीच मिळविण्याचे आवाहन  प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

टपाल कार्यालय एक दिवस बंद राहणार असले तरी भविष्यातील सेवा अनुभव अधिक सक्षम व डिजिटल होईल, अशी ग्वाही विभागाने व्यक्त केली आहे.

00

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा