मानवी आहारातील पोषक तत्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी पौष्टिक तृणधान्य ही काळाजी गरज असून त्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’साजरे करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीसह २४ विभागाच्या सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला, भाषण इ. स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ वर्षारंभी मकर संक
अकोला , दि. 11 (जिमाका)- भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले तसेच भारतीय ल ढ्यात मोलाचे योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक यांना तसेच भारत छोडो आंदोलन , हैद्राबाद मुक्ती संग्राम तसेच गोवा व दादरा नगरहवेली मुक्ती संग्राम या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेऊन देशासाठी योगदान दिले आहे , अशा स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या पश्चात स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांना केंद्र व राज्य शासनाकडून निवृत्तीवेतन दिले जात असल्याने सदयःस्थितीत हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी यांची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार शासनास सादर करावयाची आहे . तसेच माहिती शासनास विहीत विवरणपत्रात सादर न केल्यास शासनामार्फत संबंधित निवृत्तीवेतन बाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने हयात असलेले व शासनामार्फत निवृत्तीवेतन घेत असलेले स्वातंत्र्य सैनिक तसेच त्यांचे मृत्यु पश्चात निवृत्तीवेतन घेत असलेल्या त्यांच्या विधवा पत्नी यांची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार आवश्यक कागदपत्रासह आधार कार्ड , बँक पासबुक (मागील ६ महिन्यांची पेन्शन प्राप्त झाल्याच्या प्रिंट सह) , राशन कार्ड , स्वातंत्र्य
विशेष लेखः- जीवन जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे. शरिरास विवधि क्रियांसाठी लागाणाऱ्या उर्जेसाठी अन्न हे प्रमुख व आवश्यक असा घटक आहे. बाजारात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि आपण सर्वजण भाज्या , फळे , तरणधान्ये , कडधान्ये , शेंगा इत्यादीसह विविध अन्न स्रोतांवर अवलंबून असतो. सामान्य जिवनात अन्न पदार्थ खरेदी करतांना कधी कधी आपणास भेसळयुक्त अन्न पदार्थ वापरात येतात. कधी धान्यात लहान खडे किंवा दुधात पाण्याची भेसळ असल्याचा संशय होतो. आधुनिकरणामुळे आर्थीक फायद्यासाठी होणारी भेसळ अत्यंत नगण्य प्रमाणात झाली तरी आजही ग्रहकांना याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. अन्न भेसळ म्हणजे काही बाह्य पदार्थ टाकून , किंवा काही घटक वगळून अन्न पदार्थाचा दर्जा कमी करणे किंवा अन्न पदार्थ असुरक्षित बनवणे. भेसळकारी पदार्थ (Adulterant) म्हणजे कोणतीही सामग्री जी अन्न असुरक्षित किंवा कमी दर्जाचे बनवण्यासाठी वापरली जाते. भेसळकारी पदार्थ हे खाद्य किंवा अखाद्य असु शकतात. अन्नात भेसळ करण्याचे वेगवेगळे कारण असु शकतात जसे की , व्यवसाय धोरणाचा एक भाग म्हणून इतर काही खाद्य पदार्थांचे अनुकरण , योग्य अन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा