नदी काठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा
अकोला,दि.31(जिमाका)- हवामान
विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि.4 सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरुपाचे
पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
जिल्हयामध्ये एक मोठा,
तीन मध्यम व इत्तर लघु प्रकल्पामध्ये जवळपास 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतरही
प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये
वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ
झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी
याबाबत नदीपात्रा जवळील गावांतील
नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेवून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी
उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी
नदी नाल्यांना पूर पाहण्यास जावू नये. तसेच पुल ओलांडण्याचा
प्रयत्न करु नये करीता त्याअनुषंगाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा