अतिवृष्टीचा इशारा

 


अकोला,दि.21(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार सोमवार (दि.24 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. 

काटेपुर्णा प्रकल्प पुर नियंत्रण यांच्या सुचनेनुसार काटेपुर्णा प्रकल्पामध्ये शुक्रवार (दि.21) रोजी सकाळी 7 वा. 97.66 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे व सकाळी 11 वाजता काटेपुर्णा प्रकल्पाचे  एकूण दोन वक्रव्दारे 20 सेमी उघडली असून नदीपात्रात 34.11 घ.मी./से. एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.  तसेच मोर्णा प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे.

 प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.  तरी याबाबत नदीपात्रा जवळील  गावांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेवून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी नदी नाल्यांना पूर पाहण्यास जावू नये करिता त्याअनुषंगाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ