शिवभक्तांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार

 

अकोला,दि.17(जिमाका)-  जिल्ह्यातील परपंरागत असलेल्या राजराजेश्वराची पालखी व कावड यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी काढण्यात येते. हजारोच्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पुर्णा नदीतून  कावडव्दारे जल आणून राजराजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.

 परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तसेच जिल्हा प्रशासनाने  केलेल्या आवाहनानुसार शिवभक्तांनी कावड यात्रेस मानाची एक पालखी काढून, मर्यादित संख्या व सामाजिक अंतर राखून प्रतिसाद दिला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शिवभक्तांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानले आहे. यापुढेही जिल्ह्यातील नागरिकांनी अशाच प्रकारचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ