उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत अंतिम मुदत
अकोला,दि.
18 (जिमाका)- माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,
उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि
स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर
करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते
31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या
लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका
पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी,
2020 होती. प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 28
फेब्रुवारी 2020 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे.
विविध भागातील
स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त
करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांसाठी पत्रकारांची
मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक
जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या
वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची
निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व
विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ
महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड
झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र
प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिका राज्यस्तर
किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख
असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची
कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा
वाचता येणार नाहीत,
अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष
पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली
जाणार नाही.
प्रत्येक गट व भाषेसाठी
संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास
त्याचा विचार केला जाणार नाही. तरी इच्छूक पत्रकारांनी स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन
जिल्हा माहिती कार्यालय अकोलाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा