प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीक कर्ज उपलद्धतेसाठी विशेष मोहिम
अकोला,दि.12(जिमाका): शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN ) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत
प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष 6000/- इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये
उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत
आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील एक लक्ष 95 हजार 470 शेतक-यांची नोंदणी
पी.एम. किसान पोर्टलवर करण्यात आली आहे. वेगवेगळया वित्तीय संस्था, बँकाकडून
यापैकी एक लाख 72 हजार 157 लाभार्थी शेतक-यांना पिक कर्ज पुरवठा करण्यात
आला आहे. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम
राबविण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अकोला
यांनी यंत्रणांना दिलेआहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी अद्याप
कोणत्याही वित्तीय संस्था व बँकाकडून पिक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतक-यांनी या
विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे. या शेतक-यांना बँकिंग क्षेत्रापासून पिककर्ज
उपलब्ध करुनदेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या
आहेत.
या शेतक-यांना सुटसुटितरित्या अर्ज करता यावा यासाठी आयबीए
संस्थेकडून एक पानीअर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लाभार्थी शेतक-यांनी या
अर्जासोबतशेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषण पत्र घेऊन ज्या बँकेतून पीएम किसान योजनेचा
लाभघेतला आहे, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बॅक अथवा वित्तीय संस्था येथे पिककर्ज
नसणा-यापीएम किसान लाभार्थी शेतक-यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च हा
बँकाकडून माफकरण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15
दिवसामध्ये
शेतक-यांना बँका मार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पिक कर्ज उपलद्ध करुनदेण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायक यांनी गावपावतळीवर यासाठी विशेषमोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
शेतक-यांना बँका मार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पिक कर्ज उपलद्ध करुनदेण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायक यांनी गावपावतळीवर यासाठी विशेषमोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा