वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय जिल्ह्यासाठी प्रकल्प ठरणार वरदान

 

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय

 जिल्ह्यासाठी प्रकल्प ठरणार वरदान

            अकोला, दि. ५ : विदर्भातील  सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, प्रकल्प अकोला जिल्ह्यासह व-हाडासाठी वरदान ठरणार आहे.

            या प्रकल्पातून गोदावरी खोऱ्याच्या प्राणहिता उपखोऱ्यातील वैनगंगा नदीचे अखर्चित पाणी तापी खोऱ्याच्या पूर्णा उपखोऱ्यापर्यंत वळते करण्याचे प्रस्तावित आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पातून तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्धारे वळविण्यात येणार आहे. 

यामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.  या प्रकल्पासाठी 62.57 टीएमसी पाण्याची गरज असून गोदावरी पाणी तंटा लवादाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी महाराष्ट्रास पूर्ण वापरास परवानगी दिली आहे.  त्यामुळे या प्रकल्पासाठी 75 टक्के विश्वासार्हतेने 29.23 टीएमसी पाणी उपलब्ध असून 62.57 टीएमसी पाणी 63 टक्के विश्वासार्हतेस उपलब्ध आहे.

             वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यातील सिंचन, घरगुती, औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार असल्याने पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून अवर्षणप्रवण व अनुशेषातील काही भागास पाणी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.  त्यामुळे पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती विभागातील निम्न वर्धा, बेंबळा, अमरावती, उमा, काटेपूर्णा, मन या नद्यांना वैनगंगेचे पाणी मिळणार आहे. या नद्यांच्या माध्यमातूनच पुढे तापी खोऱ्यातील नळगंगा नदीला पाणी मिळेल. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, मन, उमा या नद्यांमध्ये पाणी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने टंचाईवर मात करता येणे शक्य होईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ