अतिवृष्टीमुळे पिकांचे 8 हजार 124 हेक्टरचे नुकसान
अकोला, दि.12(जिमाका)- जिल्ह्यामध्ये
दि. 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे
सोयाबीन, कापुस, तुर व भाजीपालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राप्त
झालेल्या अहवालानुसार तेल्हारा, मुर्तिजापूर व अकोट तालुक्यातील 8 हजार 124 हेक्टर
क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार दि. 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
बाधीत झालेले सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाल्यांचे तालुकानिहाय नुकसान याप्रमाणे :
तेल्हारा तालुक्यात 1 हजार 413 हेक्टर आर, अकोट तालुक्यात 1 हजार 356 हेक्टर आर,
तर मुर्तिजापूर येथे 5 हजार 355 हेक्टर
असे एकूण 8 हजार 124 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच 1 जून पासून आजपर्यंत
747.5 एमएम पाऊसाची नोंद झाली असून त्याचे प्रमाण 104.6 टक्के आहे, अशी माहिती आपत्ती
व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा