अतिवृष्टीमुळे पिकांचे 8 हजार 124 हेक्टरचे नुकसान


अकोला, दि.12(जिमाका)-  जिल्ह्यामध्ये दि. 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कापुस, तुर व भाजीपालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार तेल्हारा, मुर्तिजापूर व अकोट तालुक्यातील 8 हजार 124 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार दि. 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेले सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाल्यांचे तालुकानिहाय नुकसान याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यात 1 हजार 413 हेक्टर आर, अकोट तालुक्यात 1 हजार 356 हेक्टर आर, तर  मुर्तिजापूर येथे 5 हजार 355 हेक्टर असे एकूण 8 हजार 124 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच 1 जून पासून आजपर्यंत 747.5 एमएम पाऊसाची नोंद झाली असून त्याचे प्रमाण 104.6 टक्के आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ