अतिवृष्टी झालेल्या भागात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी
अकोला,दि.25 (जिमाका)- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अतिवृष्टीत बाधीत झालेल्या म्हैसांग, रामगांव, दापुरा, अंबिकापूर, आपातापा, घुसर, उगवा व सुकोडा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली.
यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी निलेश
अपार, जिल्हा कृषि अधिकारी कोताप्पा खोत आदींची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा