अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश


अकोला,दि.२३(जिमाका)-  जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे. तसेच शहरात व ग्रामीण भागात नदी नाल्यांना पुर आलामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पाऊस सातत्याने सूरु असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण  झाले आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थिती पाहता व विभागीय  आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ