अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
अकोला,दि.२३(जिमाका)- जिल्ह्यामध्ये झालेल्या
अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठया प्रमाणात
नुकसान झाले आहे. तसेच शहरात व ग्रामीण भागात नदी नाल्यांना पुर आलामुळे लोकांच्या
घरामध्ये पाणी शिरुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पाऊस
सातत्याने सूरु असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थिती पाहता व विभागीय
आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील
सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा