पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत

 पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत

अकोला, दि. 28 : पीकस्पर्धा योजनेत सहभागासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.  

पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरसोयाबीनभुईमुग व सुर्यफुल या प्रमुख पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ