पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत
पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत
अकोला, दि. 28 : पीकस्पर्धा योजनेत सहभागासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या प्रमुख पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा