प्रभागांच्या सीमा निश्चित कार्यक्रम रद्द

 अकोला दि.17(जिमाका)-  राज्य शासनाच्या अधिसुचना व  राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 274 ग्रामपंचायती व अकोट, बाळापुर, मुर्तिजापुर व तेल्‍हारा नगरपरिषदेमध्‍ये सार्वत्रिक निवडणुकांकरिता सुरु करण्‍यात आलेली  प्रभागांच्‍या सीमा निश्चित करण्‍याची प्रक्रिया रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढील प्रभागांच्‍या सीमा निश्चित करण्‍याची प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्ह्यातील 274 ग्रामपंचायतीची प्रभागांच्या सीमा निश्चितीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. ते याप्रमाणे : तेल्हारा येथील 23, अकोट येथील 44, मुर्तिजापूर येथील 51, अकोला येथील 54, बाळापूर येथील 27, बार्शीटाकळी येथील 47, पातूर येथील 28 अशा एकूण 274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चितीचे कार्यक्रम रद्द केले आहे. प्रभाग रचनेची पुढील अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रक कळविण्यात आले.  

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ