जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

 










           अकोला,दि.१५(जिमाका)-  ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करुन त्यांना उत्तम सेवा मिळावी यासाठी ग्राहक हक्क संरक्षण कायदे आहेत. त्याची माहिती करुन घ्यावी. आपल्या हक्कांबाबत ग्राहकांनी जागरुक रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या अध्यक्ष श्रीमती एस.एम. उंटवाले यांनी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने अकोला तहसिल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ घुगे, तहसिलदार सुनिल पाटील तसेच ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी  व ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते आदी उपस्थित  होते.

           कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती एस. एम. उंटवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात आल्या.

श्रीमती  एस. एम. उंटवाले म्हणाल्या की, ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ग्राहक न्यायमंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. तथापि ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे व अन्यायकारक व्यापार पद्धतीस बळी पडू नये. त्यांनी सांगितले की, यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या सुधारीत कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देन ग्राहक संरक्षणाचे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, तपासणी, तक्रारी, खटला चालविणे, असुरक्षित वस्तु व सेवा परत मागविणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करणे व दिशाभुल करणाऱ्या  जाहीरातीवर दंड आकारणे आदींच्या अधिकाराबाबत श्रीमती उंटवाले यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या  खटल्याबाबत जिल्हा, राज्य व केंद्र यांच्याकडे असणाऱ्या खटले चालवण्या संदर्भातील वित्तीय अधिकाराची जाणीव करुन दिली.  ग्राहकांना त्यांना न्याय मिळविण्यासाठी खटले सर्वोच्च न्यायालयात सुद्धा चालवू शकतात,याची माहिती दिली.

अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे व तक्रार सादर करणे याबाबत माहिती दिली. आणि ग्राहक दिनाचे महत्व समाजावून सांगितले. ग्राहकांच्या हक्क व विविध कायद्यांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचाही नागरिकांनी लाभ घेतला.

प्रास्ताविक  जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका उजाळे यांनी  तर आभार प्रदर्शन सुनिल पाटील यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ