274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चित; 4 मार्चपर्यंत दावे हरकती दाखल करा
अकोला,दि.25(जिमाका)- राज्य निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक
निवडणुकांकरीता प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार
प्रारुप प्रभाग रचना
(नमुना ब) शुक्रवारी (दि. 25) संबंधीत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचनावर हरकती किंवा सूचना आक्षेप दाखल करावयाचा असेल तर संबंधीत तहसीलदार यांचेकडे शुक्रवार
दि. 4 मार्च रोजी दाखल करावे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे
यांनी दिली.
प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते
डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच आयोगाचा
प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे
निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 274 ग्रामपंचायतीची
प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहे. ते
याप्रमाणे :
तेल्हारा तालुक्यातील 23, अकोट तालुक्यातील 44, मुर्तिजापूर तालुक्यातील 51, अकोला तालुक्यातील 54, बाळापूर तालुक्यातील 27, बार्शीटाकळी
तालुक्यातील 47,
पातूर तालुक्यातील 28 अशा एकूण 274 ग्रामपंचायत
प्रभागांच्या सीमा निश्चित केल्या आहे.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा