274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चित; 4 मार्चपर्यंत दावे हरकती दाखल करा

अकोला,दि.25(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना (नमुना ब) शुक्रवारी (दि. 25) संबंधीत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  प्रारुप प्रभाग रचनावर हरकती‍ किंवा सूचना आक्षेप दाखल करावयाचा असेल तर संबंधीत तहसीलदार यांचेकडे शुक्रवार दि. 4 मार्च रोजी दाखल करावे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच आयोगाचा प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 274 ग्रामपंचायतीची प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहे. ते याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यातील 23, अकोट तालुक्यातील 44, मुर्तिजापूर तालुक्यातील 51, अकोला तालुक्यातील 54, बाळापूर तालुक्यातील 27, बार्शीटाकळी तालुक्यातील 47, पातूर तालुक्यातील 28 अशा एकूण 274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चित केल्या आहे.  

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ