स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार स्पर्धा; प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

अकोला,दि.७(जिमाका)- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२१ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या प्रवेशिका मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि.३१ जानेवारी २०२२पर्यंत पाठविता येतील, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई येथील सचिव यांनी कळविले आहे.

या स्पर्धेसाठी दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाश्ति झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२१ नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व ‘Whats new’ व्हॉटस् न्यु या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2021 Rules Book and Application Form’ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२१ स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके या शिर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ या विहीत कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहीत नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदीर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – २५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधीत जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ या विहीत कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२१ साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतीम दिनांक ३१ जानेवारी २०२२ हा राहील. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ