कावड यात्रेबाबत मंदिर समिती व कावड, पालखी मंडळांनी समन्वयाने निर्णय घ्यावा- पालकमंत्री ना.बच्चू कडू



           अकोला, दि.११(जिमाका)- येथील ७६ वर्षांची परंपरा असलेला श्रीराजराजेश्वर कावड महोत्सव यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे करावे याबाबत राजराजेश्वर मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी  कावड यात्रोत्सवासंदर्भात आयोजित बैठकीत बोलतांना केले.
या बैठकीस  आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक गजान शेळके, मंदिर समितीचे विश्वस्त नरेश लोहिया,  गजानन घोगे, ॲड राम पाटील, डॉ. गोपाळ नागपुरे, चंद्रकांत सावजी, राजेश चव्हाण आदी तसेच कावड व पालखी मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सांगण्यात आले की,  दरवर्षी १२० मंडळे आपापल्या पालख्या व कावड यात्रा घेऊन श्रावण महिन्यात येत असतात. त्यात पालखी व कावड यांचा समावेश असतो. तथापि यंदा कोविड महामारीच्या आपत्तीच्या प्रसंगी ही परंपरा कशा पद्धतीने  पाळली जावी? याबाबत सर्व भाविक, मंदिर समिती, कावड व पालखी उत्सव समितीचे सदस्य, मंडळांचे प्रतिनिधी यांनी सामोपचाराने निर्णय घेऊन प्रशासनास प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, असे आवाहन ना. कडू यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ