महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषी विभागाचे आवाहन


अकोला,दि. 8(जिमाका)-  कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची व सोडत 15 मे 2023 पर्यंत असल्याचे तसेच 15 मे नंतर जवळपास दोन ते तीन महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही. अशा आशयाचे संदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे. महाडिबीटी पोर्टल संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. तसेच महाडिबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवडयाला काढण्यात येते. तरी https://mahadbt.maharashtra.gov.in /शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. तसेच शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ