मयत व्यक्तीच्या परिवारांला चार लाखाचा धनादेश सुपूर्त
अकोला, दि.15(जिमाका)- समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून
जुने शहरात दोन गटात झालेल्या वादात हरिहर पेठ येथील विलास गायकवाड यांचे दुखद निधन
झाले होते. त्याच्या परिवाराला मानवनिर्मित आपत्ती दंगलीमध्ये दुख:द निधन झाल्याने
सानुग्रह मदत म्हणून चार लाख रुपयांची शासकीय मदत मंजुर झाली आहे. सानुग्रह मदतीचा
धनादेश विधानपरिषद आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर
सावरकर यांच्या हस्ते मयत परिवारांला सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी
शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा