मयत व्यक्तीच्या परिवारांला चार लाखाचा धनादेश सुपूर्त





अकोला, दि.15(जिमाका)-  समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादात हरिहर पेठ येथील विलास गायकवाड यांचे दुखद निधन झाले होते. त्याच्या परिवाराला मानवनिर्मित आपत्ती दंगलीमध्ये दुख:द निधन झाल्याने सानुग्रह मदत म्हणून चार लाख रुपयांची शासकीय मदत मंजुर झाली आहे. सानुग्रह मदतीचा धनादेश विधानपरिषद आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते मयत परिवारांला सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा