राष्ट्रीय लोकअदालत 14 डिसेंबर रोजी
अकोला, दि.13 (जिमाका)- राष्ट्रीय
विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुंबई यांच्या सुचनेनुसार 2019 चे
चौथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दि.14 डिसेंबर रोजी
अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान होणार आहे.
लोक न्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्यातील पक्षकारांना खालील प्रमाणे फायदे होतात.
लोकन्यायालयाच्या निवाडयाविरूध्द अपील नाही. एकाच
निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका
होते., खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ
युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो., लोकन्यायालयात होणारा निवाडा
हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा
जय होतो ना कुणाची हार, लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.,
परस्पर संमतीने निकाल होत असल्याने
एकमेकातील व्देष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. , कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते., वेळ आणि
पैसा यांची बचत होते., लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये
कायद्यानुसार कोर्टफीची रक्कम परत मिळते.
तरी ज्या पक्षकारांचे प्रलंबित किंवा
खटलापुर्व प्रकरणे न्यायालयात
दाखल आहेत त्यांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे
राष्ट्रीय लोक अदालतीत सुनावणीसाठी
ठेवण्यासाठी
संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण , अकोला (0724-2410145) यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले
वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष
वाय. जी. खोब्रागडे व सचिव स्वरूप बोस यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा