राष्ट्रसंतांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्रविकासासाठी कार्य करणारी पिढी घडेल – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर









अकोला, दि. ३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्यास राष्ट्रविकासासाठी कार्य करणारी नवी पिढी निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.
पाटसूळ रेल्वे येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सर्वांगीण सुसंस्कार वर्गाचा समारोप आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. सेवाश्रमाचे संचालक शुकदास गाडेकर, राजेंद्र वैद्य, शिवम सेवाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन सेवाश्रम कार्य करीत आहे. राष्ट्रसंतांचे विचार हे विद्यार्थ्यांना देशकार्यासाठी प्रेरणा देतात. अशा विचारांनी ही पिढी घडली तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल. त्यादृष्टीने सेवाश्रम विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांनीही सुसंस्कार वर्गातून मिळालेल्या शिकवणीचा मित्रांमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी पू. संत महादेवराव गाडेकर साधूबुवा, तसेच संत डॉ. उद्धवराव गाडेकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, गुरूदेवभक्त उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा