सुलभ, अडथळामुक्त शेतरस्त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम – जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २७ : जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रशासनाला कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिला असून, त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेमुळे अडथळे दूर होऊन शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे.
अलीकडच्या काळात कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी कमी होत असल्यामुळे शेतकरी यांचा कल त्यांचे शेतातून सुरु असलेली वहिवाट बंद करण्याकडे आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करणेकरीता मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत.
अशा प्रकरणांमध्ये स्थळ निरिक्षण करणे, मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे रस्ते खुले करण्यास ठोस पावले उचलण्यासाठी जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या मार्गदर्शनात मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ग्रामीण भागात उपयोगात असलेले विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाडा, पाऊलवाटा जसे की
ग्रामीण रस्ते (एका गावाहून दुसन्या गावास जाणारे), गाडीमार्ग (पोटखराब) (एका गावाहुन दुसऱ्या गावास जाणारे), शेतावर जाणारे पायमार्ग व गाडी मार्ग असे सर्व तालुक्यामधील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्ध रितीने खुले करण्यासाठी कार्यपद्धती निश्चीत करण्यात आली आहे.
त्यानुसार 26 ते 27 मे दरम्यान संबंधित गावचे तलाठी यांनी उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडुन वरीलप्रमाणे ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग नमुद असलेले गाव नकाशे प्राप्त करुन घेणे, दि 28 व 29 रोजी ल नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराबा), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्याची यादी तयार करणे, दि. 30 व 31 मे दरम्यान बंद असलेले रस्ते ज्या भुमापन क्रमांकातुन जातात त्यांचे भोगवटाधारक यांची यादी तयार करणे, दि 1 जून रोजी भोगवटाधारक व गावातील सरपंच व इतर सहधारक यांची सदर रस्ता खुले करणेबाबत बैठक आयोजित करुन समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये तहसिलदार यांचेकडे दाखल असलेल्या प्रकरणात सर्व पक्षकार गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सेवक यांच्या समवेत त्या-त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करुन बैठक घेऊन संपवुन सर्व सहमतीने रस्ता खुला करण्यासाठी (दावा निकाली काढण्यासाठी) लोकअदालतीच्या निकषानुसार प्रकरणात निर्णय घेणे आदी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे,
वरील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यास उपअधिक्षक भुमी अभिलेख व पोलिस यांच्या सहकार्याने 2 ते 6 जून दरम्यान
सहाय्याने रस्ता निश्चित करुन पोलिसांचे सहाय्याने तो खुला केला जाईल. 7 जून रोजी टप्पा ५ नुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये अर्ज प्राप्त करुन घेऊन पुढील नियमोचित कार्यवाही करण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांना शेतापर्यंत सुलभ आणि अडथळामुक्त प्रवेश मिळावा, यासाठी शेत पाणंद रस्ते खुले करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोर कार्यवाही करावी, तसेच शेतकरी बांधव व सर्व संबंधितांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा