फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक
फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक
अकोला, दि. २९
: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना भारतीय
कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली
इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत
मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन
वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.
मृग बहार सन 2025 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष (क), चिकू, पेरु, सिताफळ व
लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2025-26 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व
स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या
निकषानुसार राबविण्यात येत आहे.
दि. 11 एप्रिल, 2025
रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. 15 मे, 2025 रोजी पार पडलेल्या
राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार कृषि
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी
ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. 15/04/2025 पासून अनिवार्य
करण्यात आलेला आहे. तद्नुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व
आंबिया बहार सन 2025-26 मध्ये सदर योजनेत सहभागी होण्याकरीता
अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तात्काळ काढुन घेणेकरीता सुचित
करण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा