महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ : अद्यापही ३४८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित; तात्काळ संपर्क साधण्याचे सहकार विभागाचे आवाहन

 अकोला,दि.२६(जिमाका)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत सर्व संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतरही आज रोजी जिल्ह्यातील ३४८६ खात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. त्यामुळे संबधीत खातेदार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया खोळंबली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहकार विभागामार्फत दि. १५ ऑक्टोबर पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहीम दि.१५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे,असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले असून ही त्यांना शेवटची संधी आहे,असेही सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

याबाबत सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचे मार्फत १,१६,५४४ कर्जखाती योजनेच्या पोर्टल वर आजपर्यत अपलोड करण्यात आली असुन त्यापैकी १,०५,९४४ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रंमाक पोर्टल वर प्राप्त झाला आहे व त्यापैकी १,०२,४५८ खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील १,००,२२५ खात्यावरील ६२८.१७ कोटी रुपयांची कर्ज मुक्तीची रक्कम संबधीत खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आज रोजी जिल्ह्यातील ३४८६ खात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. त्यामुळे संबधीत खातेदार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया खोळंबली आहे.

  प्रलंबित खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहकार विभागामार्फत दि. १५ ऑक्टोबर पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहीम दि.१५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यात संबंधित शेतकऱ्यांशी जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणा व तर संस्था यांच्या मदतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात ये आहे.

 तरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाला आहे त्यापैकी ज्या खातेदार शेतकऱ्यांनी आजपर्यत आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांनी ते ज्या ठिकाणी राहत असतील तेथील नजिकच्या सेवा क्रेदांला भेट देवुन आपला कर्ज खात्यांचे तात्काळ आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा. हा कालावधी हा अंतिम संधी म्हणून देण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण केल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाऊ शकणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच  यात काही अडचण / शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, अकोला कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ