अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी ११५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश
अकोला,दि.२६(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर बाधितांसाठी मदत अनुदान प्राप्त झाले आहे. पीक नुकसानीसाठी ८४ कोटी २६ लक्ष रुपये तर ज्या शेतकऱ्यांची जमीन पुरामुळे खरवडून गेली आहे त्यांच्यासाठी ३१ कोटी चार लक्ष रुपये असे एकूण ११५ कोटी ३० लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून अनुदान वितरीत केले जात आहे.
यासंदर्भात
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत पुनर्वसन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, पिक
नुकसानग्रस्तांसाठी अकोला तालुक्यासाठी ३२ कोटी ७१ लक्ष, बार्शी टाकळी
तालुक्यासाटी १६ कोटी ६७ लक्ष. अकोट ४ कोटी १० लक्ष, तेल्हारा एक कोटी ५१ लक्ष ,
बाळापूर १४ कोटी ६३ लक्ष, पातूर १४ कोटी २१ लक्ष, मुर्तिजापूर ४३ लक्ष असे एकूण ८४
कोटी २६ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
तसेच जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई म्हणून अकोला तालुक्यात २३ लाख ३५
हजार २८ रुपये, बार्शी टाकळी तालुक्यात १ कोती ३७ लाख रुपये, अकोट तालुक्यात १
कोटी ३८ लाख ५५ हजार, तेल्हारा तालुक्यात ४४ लक्ष ९४ हजार रुपये, बाळापुर तालुक्यात ४ कोटी ४७ लाख ७९ हजार रुप्ये
असे एकूण ३१ कोटी चार लक्ष रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ४२३ गावांतील १६
हजार ६४९ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असून
५५३० शेतकऱ्यांची यादी कोषागारात सादर करण्यात आली आहे. उर्वरित प्रक्रिया
वेगाने सुरु आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा