जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम; दक्षता घेण्याचे आवाहन
अकोला दि.18(जिमाका)- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार बुधवार
दि. 20 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे
नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरीक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा
स्थुलपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण
कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. उष्णेतेच्या लाटेच्या अनुषंगानी सर्व
यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा