भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना
अकोला,दि.२२ (जिमाका)- अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश
न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅटि्कोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः
उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
सुरु केली आहे. सन २०१८-१९ तसेच सन
२०१९-२० मधील ज्या पात्र विद्यार्थ्यांना प्रथम टप्याचा लाभ मिळाला आहे व ज्या
विद्यार्थ्यांना अद्यापही व्दितीय टप्याचा लाभ मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी प्रपत्र १ व ३ अर्ज परिपूर्ण भरुन (प्राचार्यांच्या
सहि व शिक्यानिशी) या कार्यालयात दिनांक १० जुलै पूर्वी सादर करावा. जेणेकरुन संबंधित विद्यार्थ्यांना
व्दितीय टप्याची रक्कम त्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यामध्ये जमा करणे
या कार्यालयास सोईचे होईल. कार्यालयात प्रपत्र १ व ३ सादर करतांना विद्यार्थ्यांनी
स्वतःचे बॅंकेचे पासबूक अपडेट करुन सोबत घेवून यावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त
झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,अधिक माहितीसाठी
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालयाशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा