पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना -- सहभागासाठी ३० जून मुदत

 

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

      शासनाने मृग बहार २०२५ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

      अकोला जिल्ह्यात पुनर्ररचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता खालील कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.


.क्र.

कंपनीचे नाव

संपर्क तपशील

युनिवर्सल सोम्पो जनरल इन्सुरन्स कं लि.

पत्ता  - १०३, पहिला मजला MAIDC,आकृती स्टार, सेंट्रल रोड, अंधेरी (पूर्व) – मुंबई ४०००९३

दूरध्वनी क्रमांक १८०० २२४०३०/१८०० २००४०३०

इमेल:-  contactus@universalsompo.com                     

 

 

             पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी  भरावयाचा  विमा हप्ता खालीलप्रमाणे आहे.

.क्र.

फळपिकाचे नाव

विमा संरक्षित रक्कम ( रु. / हेक्टर)

शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)

संत्रा

१०००००

५०००

लिंबू

८००००

४०००

मोसंबी

१०००००

५०००

डाळिंब

१६००००

८०००

पेरू

७००००

३५००

अधिसूचित फळपिके, तालुका व समाविष्ट मंडळ

.क्र.

अधिसूचित फळपिके

तालुका

महसूल मंडळाचे नाव

डाळिंब

अकोला

शिवणी

पेरू, मोसंबी

पातुर

पातुर

लिंबू

अकोला, बार्शीटाकळी, मूर्तीजापुर, अकोट, तेल्हारा, पातूर, बाळापुर 

बोरगाव मंजू, शिवणी, सांगळूद, कापशी – रोड, कौलखेड, राजंदा, धाबा, महान, खर्डा बु , बार्शीटाकळी, पिंजर, निंभा, जामठी बु, कुरूम, मूर्तीजापुर, हातगाव, अकोलखेड, आसेगाव बा, उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु, हिवरखेड, माळेगाव बा, पातूर, बाभूळगाव, आलेगाव, सस्ती, चान्नी, वाडेगाव, बाळापुर, व्याळा

संत्रा

अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तीजापुर

अकोलखेड, उमरा, पणज, अकोट, अडगाव बु, हिवरखेड, माळेगाव बा, तेल्हारा, पातूर, आलेगाव, राजंदा, धाबा, महान, खर्डा बु , बार्शीटाकळी, पिंजर, कुरूम, हातगाव, निंभा

 

योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी आवश्यक आहेत.

१. Agristack नोंदणी क्रमांक

2. आधार कार्ड

3. बँक पासबुक

4. जमीन धारणा उतारा

5. Geo tag फोटो

६. ई - पिक पहाणी बंधनकारक आहे.(ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.ई पीक नोंदणी योजनेत भाग घेतल्यानंतर जुलै - ऑगस्ट महिन्यात करू शकतात.)

चालू मृग बहारातील १४ जूनला सहभाग मुदत संपलेल्या लिंबू, संत्रा, पेरू या पिकांच्या  शेतकरी सहभागासाठी  30 जून  पर्यंत केंद्रशासनाने अंतिम मुदत वाढवलेली आहे.

तरी शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळणेस्तव संत्रा, लिंबू,पेरू या फळपिकाकरिता दिनांक ३० जुन २०२५ तर डाळिंब करिता १४ जुलै २०२५ व मोसंबी करिता ३० जून २०२५ या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी,उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.अजित कुंभार,जिल्हाधिकारी,अकोला व श्री.शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

 

 

                                                                                     जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

                                                                                                                       अकोला

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा