अमरावती, दि.१९- सामान्य नागरिकांनी राज्य माहिती आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतः च्या ई - मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे . प रंतू आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता नमूद करावा , असे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती संभाजी सरकुं डे यांनी कळविले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड - १९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन जनजीवन ठप्प झाले आहे . अनेकविध आवश्यक वस्तूचे उत्पादन करणारे कारखाने , अनेकविध सरकारी कार्यालये , बँक , दळवळण ठप्प झाले आहे . राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावती हे कार्यालय देखील कोणत्याही काम करण्याविना बंद करण्यात आले आहे . अन्यथा दर महिन्याला या कार्यालयात केंद्रीय माहितीचा अधिकार आधीनियमांचे कलम १९ ( ३ ) च्या तरतुदींनु सा र ३५० चे आसपास व्दितीय अपील अर्ज व कलम १८ नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात . ही आवक पोस्टाचे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा