पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी तत्काळ पूर्ण करावी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन

 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी तत्काळ पूर्ण करावी

                     जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन

      अकोला, दि. 6 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत  14 व्या हप्त्याचे वितरण नुकतेच झाले आहे.  तथापि, अजूनही 22 हजारहून अधिक लाभार्थ्यांचे ई- केवायसी पूर्ण नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही. तरी संबंधित लाभार्थ्यांनी ई- केवायसी व बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.   

पीएम किसानयोजनेत पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे  व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी बंधनकारक आहेत. ते पूर्ण न करणारे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.  कृषी विभागामार्फत नुकतीच याबाबत मोहिमही राबविण्यात आली. तथापि, अद्यापही अकोला जिल्ह्यात 22 हजार 140  लाभार्थ्यांची ई केवायसी  व  12 हजार 741 लाभार्थ्यांचे  बँक खाते आधार संलग्न करणे  प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. विभागाकडून वारंवार सर्वंकष प्रयत्न करून देखील ई-केवायसी व  बँक खाते आधार संलग्नीकरणासाठी प्रतिसाद न देणा-या लाभार्थ्यांना पोर्टलवरून वगळण्याच्या सूचना प्राप्त आहेत.

               त्यामुळे पीएम किसान योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण दि. 10 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिसाद न दिल्यास लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ