राज्यातील मान्सून व पीक परिस्थिती - कृषी विभागाची माहिती

 

 

राज्यातील मान्सून व पीक परिस्थिती

-          कृषी विभागाची माहिती

दि. 1 जून ते दि.11 सप्टेंबर या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मिमी असून या खरीप हंगामात दि.11.09. 2023 पर्यंत प्रत्यक्षात 766.0 मिमी (दि.11 सप्टेंबर पर्यंतच्या सरासरीच्या 86%) एवढा पाऊस पडलेला आहे. 

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.11.09.2023 अखेर प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर (99 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. आज दि.11.09.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.11 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 15.28 लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

राज्यामध्ये दि.25.07.2023 ते आज दि.11.09.2023 अखेर 613 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 453 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.

खरीप हंगाम 2023 करिता 19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध होते.  त्यानुसार राज्यात 19, 72,182  क्विंटल (102 टक्के) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत 59.47 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 39.41लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 20.06 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

-         कृषी विभाग

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ