पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला,दि.31(जिमाका)- शासनाने मृग बहार २०२२ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
संत्रा-
८० हजार रुपये (४ हजार रुपये), लिंबू-७० हजार रुपये (३५०० रुपये), मोसंबी ८० हजार
रुपये (४ हजार रुपये), डाळींब-एक लाख ३० हजार रुपये (६५०० रुपये), पेरु-६० हजार
रुपये (३ हजार रुपये) याप्रमाणे.
डाळिंब- शिवणी, पेरु, मोसंबी- पातूर ता. पातूर, लिंबू- शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु,कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु.,निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु., हिवरखेड ता. तेल्हारा, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी,वाडेगाव, बाळापूर, संत्रा- राजंदा, धाबा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा,
पातुर, आलेगाव.
इमेल:- pmfby.maharashtra@hdfcergo.com
तरी
शेतकऱ्यांनी
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा
संरक्षण मिळवण्यासाठी संत्रा, लिंबू,पेरू या फळपिकाकरिता दि.१४
जुन, डाळिंब पिकाकरिता दि.१४ जुलै, मोसंबी
करिता दि.३० जून या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी
व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय
कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा व जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी
केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा