‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार


 

 

‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार

अकोला, दि. २३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यातील १ हजार २०० हे. क्षेत्रावर फळबागा लागवडीचे उद्दिष्ट आहे.

 

त्यात फळबागेसाठी खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचन आदी कामांसाठी  कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदान देय आहे. प्रति हे. कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्याला ३ वर्षांच्या कालावधीत ५० : ३० : २० या प्रमाणे वितरित होईल. इच्छूकांनी जुलैअखेरपर्यंत ग्रामपंचायत किंवा कृषी सहायकांकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

योजनेतील फळपीकांमध्ये आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभुळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकडो, केळी, निशिगंध, मोगरा, गुलाब, तसेच बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. कमाल २ हे. क्षेत्र मर्यादेत सलग लागवड, बांधावर लागवड आदींसाठी अनुदान देय आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा