पातूर तालुक्यात ’मनरेगा’द्वारे मोठी रोजगारनिर्मिती
अकोला, दि. २२ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पातूर तालुक्यात सन 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यंदा 4 लक्ष 30 हजार 706 मनुष्य दिवस निर्मिती झाल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.
तालुक्यामध्ये अद्यापही मग्रारोहयोअंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, तुती लागवड, वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, रस्ता खडीकरण, शेत/पाणंद रस्ते आदी वैयक्तीक व सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू असून सदर कामावर ग्राम पंचायत स्तरावरील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येते. तालुक्यात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत एकूण 4 लक्ष 30 हजार 706 मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा